शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

‘जीवनदायी’ला महात्मा फुले यांचे नाव

By admin | Updated: June 8, 2016 04:49 IST

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव राज्य सरकारने बदलले

मुंबई : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव राज्य सरकारने बदलले असून, आता ही योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना नावाने राबविण्यात येणार आहे. या योजनेला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, त्यांच्या नावे अपघात विमा योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. जीवनदायी योजनेला बाळासाहेबांचे नाव देण्याचे विचाराधीन होते. तसे सूतोवाच आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले होते. मात्र, राजीव गांधींचे नाव बदलून बाळासाहेबांचे नाव दिले, तर राजकीय गदारोळ होईल म्हणून महात्मा फुलेंचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे म्हटले जात आहे. या योजनेची मुदत ३१ आॅक्टोबरला संपणार आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या १२५ व्या पुण्यतिथीचे यंदाचे वर्ष असून त्यानिमित्त हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली. विमा संरक्षण रकमेत वाढ केली असून दरवर्षी प्रतिकुटुंब दीड लाख रु पयांऐवजी आता नव्या योजनेत दोन लाख रुपयांची मर्यादा करण्यात आली आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठीची (किडनी ट्रान्सप्लांट) मर्यादा अडीच लाख रुपयांवरून तीन लाख रुपये करण्यात येणार आहे. समाविष्ट आजारांची (प्रोसिजर्स) संख्या ९७१ वरून ११०० एवढी करण्यात आली आहे. स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू वरील उपचाराचा खर्च तसेच सिकलसेल, अ‍ॅनिमिया, लहान मुलांचे आजार, वार्धक्याचे आजार यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील २ कोटी २६ लाख दारिद्रय रेषेखालील व दारिद्रय रेषेवरील केशरी शिधा पत्रिकाधारक कुटुंब, शासकीय आश्रमशाळा, अनाथालय, वृध्दाश्रम, १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी तसेच पत्रकारांचादेखील समावेश या नव्या योजनेत करण्यात आला आहे. >अपघात विमा योजनाराज्यामध्ये रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या रु ग्णांवर पहिल्या ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीने उपचार व्हावेत, यासाठी बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत रस्ते अपघातातील जखमींवर पहिले तीन दिवस मोफत उपचार करण्यात येतील. त्यानंतर त्या जखमींच्या रुग्णांशी संपर्क साधून त्यांना आवश्यकता वाटल्यास शासकीय रुग्णालय, खासगी किंवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रु ग्णालयात दाखल केले जाईल. राज्यातील २०० ट्रॉमाकेअर रु ग्णालये या योजनेत सहभागी केले जातील. या योजनेतील खर्चाची मर्यादा ३० हजार रुपये एवढी आहे, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.