शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

‘लोकमत’च्या प्रेमाखातर वाचकाने गोंदविले नाव! नवी आवृत्ती लवकरच दिल्लीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 03:24 IST

स्वातंत्र्य चळवळीच्या काळात सुरू झालेले आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याशी नाते सांगणारे ‘लोकमत’ यंदा आपले शताब्दीवर्ष साजरे करत आहे. या शताब्दीनिमित्त येत्या १५ डिसेंबरपासून ‘लोकमत’ची नवी दिल्ली आवृत्ती सुरू होत आहे.

स्वातंत्र्य चळवळीच्या काळात सुरू झालेले आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याशी नाते सांगणारे ‘लोकमत’ यंदा आपले शताब्दीवर्ष साजरे करत आहे. या शताब्दीनिमित्त येत्या १५ डिसेंबरपासून ‘लोकमत’ची नवी दिल्ली आवृत्ती सुरू होत आहे. ‘लोकमत’ची ही १८वी आवृत्ती असेल व १४ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ७ वाजता नवी दिल्लीतील अशोका हॉटेलच्या बँक्वेट हॉलमध्ये होणा-या कार्यक्रमात तिचा शुभारंभ होईल.‘लोकमत’ने या प्रदीर्घ वाटचालीत आपली मूल्ये कटाक्षाने जपली असून, ‘पत्रकारिता परमो धर्म:’ या ध्येयाशी अतूट बांधिलकी ठेवली आहे. यामुळेच वाचकांचे ‘लोकमत’वर उदंड प्रेम आहे. गेली कित्येक वर्षे ‘लोकमत’चे निस्सीम वाचक असलेले केवलचंद कपूरचंद सिंघवी हे वाचकांच्या या अलोट प्रेमाचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. केवलचंद सिंघवी यांनी आपल्या हातावर ‘लोकमत’ हे नाव १९८१मध्येच गोंदवून घेतले आहे. सिंघवी आजही त्याच भक्तिभावाने ‘लोकमत’ वाचतात व ‘लोकमत समूहा’चे अध्यक्ष विजय दर्डा यांच्याविषयीचे प्रेम नि:संकोचपणे व्यक्त करतात.आमच्या असंख्य निष्ठावंत वाचकांनी केवलचंद यांच्याप्रमाणे ‘लोकमत’ हे नाव गोंदवून घेतले नसेलही, तरी त्यांचे प्रेम निष्पक्ष आणि प्रामाणिक पत्रकारितेशी आमच्या बांधिलकीची साक्ष देते. त्यामुळेच आम्हाला लाखो वाचकांचे प्रेम आणि आदर मिळत आला आहे. घडणाºया घटनांच्या निष्पक्षतेने बातम्या देताना आणि त्यावर निर्भीड संपादकीय लिहिताना ‘लोकमत समूहा’ने नेहमीच पत्रकारितेची उच्च मूल्ये पाळली आहेत. बातमीदारी करताना आम्ही आमच्या मूल्यांशी कधीही तडजोड केलेली नाही व कोणाचीही भीडमुर्वत न बाळगता नेहमीच लोकहिताचा विचार केला आहे.आम्ही असा पत्रकारितेचा स्वत:चा ब्रॅण्ड निर्माण केल्यानेच ‘लोकमत’ला आज देशातील १० अग्रगण्य दैनिकांमध्ये स्थान आहे. ‘लोकमत’ हे महाराष्ट्र व गोवा या राज्यांतील सर्वाधिक वाचले जाणारे वृत्तपत्र असून, त्याची दैनंदिन वाचकसंख्या २३.५ दशलक्षांहून अधिक आहे. (आधार : टोटल रीडरशिप, आयआरएस १२ क्यू ४). १७ आवृत्त्या, ५७ उप-आवृत्त्या आणि सुदूर पसरलेले बातमीदारांचे जाळे यामुळे ‘लोकमत’ ख-या अर्थाने महाराष्ट्र आणि गोव्याचा आवाज म्हणून ओळखले जाते.आगळ्या शैलीचा ठसा असलेली पत्रकारिता व नावीन्याचा सातत्याचा ध्यास यामुळेच वाचकांच्या मनात आम्ही प्रेमाचे स्थान मिळवू शकलो आहोत. ‘लोकमत समूहा’तर्फे मराठीतील ‘लोकमत’, हिंदीतील ‘लोकमत समाचार’ आणि इंग्रजीतील ‘लोकमत टाइम्स’ ही तीन दैनिके प्रकाशित केली जातात व त्यांचा रोजचा खप २२ लाख प्रतींहून अधिक आहे.केवलचंद सिंघवी आणि त्यांच्यासारख्या असंख्य वाचकांपुढे कृतज्ञतेने नतमस्तक होतानाच आम्ही त्यांच्या प्रेमाचा व निष्ठेचा विनम्रतेने स्वीकार करतो.- विजय दर्डा, अध्यक्ष, लोकमत समूह

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र