शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या प्रेमाखातर वाचकाने गोंदविले नाव! नवी आवृत्ती लवकरच दिल्लीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 03:24 IST

स्वातंत्र्य चळवळीच्या काळात सुरू झालेले आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याशी नाते सांगणारे ‘लोकमत’ यंदा आपले शताब्दीवर्ष साजरे करत आहे. या शताब्दीनिमित्त येत्या १५ डिसेंबरपासून ‘लोकमत’ची नवी दिल्ली आवृत्ती सुरू होत आहे.

स्वातंत्र्य चळवळीच्या काळात सुरू झालेले आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याशी नाते सांगणारे ‘लोकमत’ यंदा आपले शताब्दीवर्ष साजरे करत आहे. या शताब्दीनिमित्त येत्या १५ डिसेंबरपासून ‘लोकमत’ची नवी दिल्ली आवृत्ती सुरू होत आहे. ‘लोकमत’ची ही १८वी आवृत्ती असेल व १४ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ७ वाजता नवी दिल्लीतील अशोका हॉटेलच्या बँक्वेट हॉलमध्ये होणा-या कार्यक्रमात तिचा शुभारंभ होईल.‘लोकमत’ने या प्रदीर्घ वाटचालीत आपली मूल्ये कटाक्षाने जपली असून, ‘पत्रकारिता परमो धर्म:’ या ध्येयाशी अतूट बांधिलकी ठेवली आहे. यामुळेच वाचकांचे ‘लोकमत’वर उदंड प्रेम आहे. गेली कित्येक वर्षे ‘लोकमत’चे निस्सीम वाचक असलेले केवलचंद कपूरचंद सिंघवी हे वाचकांच्या या अलोट प्रेमाचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. केवलचंद सिंघवी यांनी आपल्या हातावर ‘लोकमत’ हे नाव १९८१मध्येच गोंदवून घेतले आहे. सिंघवी आजही त्याच भक्तिभावाने ‘लोकमत’ वाचतात व ‘लोकमत समूहा’चे अध्यक्ष विजय दर्डा यांच्याविषयीचे प्रेम नि:संकोचपणे व्यक्त करतात.आमच्या असंख्य निष्ठावंत वाचकांनी केवलचंद यांच्याप्रमाणे ‘लोकमत’ हे नाव गोंदवून घेतले नसेलही, तरी त्यांचे प्रेम निष्पक्ष आणि प्रामाणिक पत्रकारितेशी आमच्या बांधिलकीची साक्ष देते. त्यामुळेच आम्हाला लाखो वाचकांचे प्रेम आणि आदर मिळत आला आहे. घडणाºया घटनांच्या निष्पक्षतेने बातम्या देताना आणि त्यावर निर्भीड संपादकीय लिहिताना ‘लोकमत समूहा’ने नेहमीच पत्रकारितेची उच्च मूल्ये पाळली आहेत. बातमीदारी करताना आम्ही आमच्या मूल्यांशी कधीही तडजोड केलेली नाही व कोणाचीही भीडमुर्वत न बाळगता नेहमीच लोकहिताचा विचार केला आहे.आम्ही असा पत्रकारितेचा स्वत:चा ब्रॅण्ड निर्माण केल्यानेच ‘लोकमत’ला आज देशातील १० अग्रगण्य दैनिकांमध्ये स्थान आहे. ‘लोकमत’ हे महाराष्ट्र व गोवा या राज्यांतील सर्वाधिक वाचले जाणारे वृत्तपत्र असून, त्याची दैनंदिन वाचकसंख्या २३.५ दशलक्षांहून अधिक आहे. (आधार : टोटल रीडरशिप, आयआरएस १२ क्यू ४). १७ आवृत्त्या, ५७ उप-आवृत्त्या आणि सुदूर पसरलेले बातमीदारांचे जाळे यामुळे ‘लोकमत’ ख-या अर्थाने महाराष्ट्र आणि गोव्याचा आवाज म्हणून ओळखले जाते.आगळ्या शैलीचा ठसा असलेली पत्रकारिता व नावीन्याचा सातत्याचा ध्यास यामुळेच वाचकांच्या मनात आम्ही प्रेमाचे स्थान मिळवू शकलो आहोत. ‘लोकमत समूहा’तर्फे मराठीतील ‘लोकमत’, हिंदीतील ‘लोकमत समाचार’ आणि इंग्रजीतील ‘लोकमत टाइम्स’ ही तीन दैनिके प्रकाशित केली जातात व त्यांचा रोजचा खप २२ लाख प्रतींहून अधिक आहे.केवलचंद सिंघवी आणि त्यांच्यासारख्या असंख्य वाचकांपुढे कृतज्ञतेने नतमस्तक होतानाच आम्ही त्यांच्या प्रेमाचा व निष्ठेचा विनम्रतेने स्वीकार करतो.- विजय दर्डा, अध्यक्ष, लोकमत समूह

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र