शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

‘गेटवे ऑफ इंडिया’चं नाव ‘भारतद्वार’ करा, भाजपा आमदाराची मागणी

By admin | Updated: June 11, 2017 20:24 IST

भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून सुरू झालेली नावं बदलण्याची पद्धत कायम राहण्याची शक्यता आहे. कारण आता भाजपा आमदार राज पुरोहित यांनी ‘गेटवे ऑफ इंडिया’चं नाव बदलून ‘भारतद्वार’

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून सुरू झालेली नावं बदलण्याची पद्धत कायम राहण्याची शक्यता आहे. कारण आता भाजपा आमदार राज पुरोहित यांनी ‘गेटवे ऑफ इंडिया’चं नाव बदलून ‘भारतद्वार’ करण्याची मागणी केली आहे. मुंबईतील कुलाब्याचे भाजप आमदार राज पुरोहित यांनी शनिवारी नाव बदलण्याची मागणी केली. हिंदुस्थान टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे. 
 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मुंबई पोर्ट ट्रस्टला पत्र लिहून गेटवे ऑफ इंडियाचे नाव बदलून भारतद्वार करण्याची विनंती करणार असल्याचं पुरोहित म्हणाले.  ब्रिटिशांनी या शहराचे नाव बॉम्बे ठेवले होते. ते मुंबई करण्यात आले. पारतंत्र्यात असताना ठेवण्यात आलेले हे नाव आता बदलले पाहिजे, त्यामुळे गेटवे ऑफ इंडियाचे नाव बदलून भारतद्वार करावे, असे ते म्हणाले. 
 
राज पुरोहित यांनी यापुर्वीही नावं बदलण्याची मागणी केली होती. ब्रिटिश राजवटीच्या काळात ठेवण्यात आलेली सर्व नावे बदलण्याची ते सातत्याने मागणी करत असताना दिसतात. यापूर्वी मरीन लाइन्स रेल्वे स्थानकाचे नाव बदलून मुंबादेवी करण्याची मागणी केली होती. 
 
यापुर्वीही राज्यातील अनेक ठिकाणांची नावं बदलण्यात आली आहेत. मुंबईतील सीएसटी स्थानकाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर प्रिन्स ऑफ वेल संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज असे नाव देण्यात आले आहे.