शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

नाणारची रिफायनरी विदर्भात उभारा; विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:42 IST

पेट्रोल-डिझेल, एलपीजी गॅस व विमानाचे इंधन (एटीएफ) मुंबईहून रेल्वेद्वारे विदर्भात येते. याचा वाहतूक खर्च लीटरला ४ रुपये पडतो. त्यामुळे विदर्भात या इंधनांच्या किमती देशात सर्वाधिक आहेत.

नागपूर : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे प्रस्तावित पेट्रोलियम रिफायनरीला गावकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेता, ही रिफायनरी विदर्भात उभारावी, अशी विनंती ‘लोकमत’ मीडियाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारा केली आहे.नाणार येथील ग्रामस्थ व शिवसेनेचा या रिफायनरीला विरोध आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी काढलेली अधिसूचना रद्द करण्यात आल्याची घोषणा केली आहे, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही रिफायनरी विदर्भात घेऊन जा, असे वक्तव्य केले आहे.नाणार प्रकल्पावरून या घडामोडी होण्याआधीच माजी खा. दर्डा यांनी ५ एप्रिल २०१८ रोजी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात ही रिफायनरी विदर्भात उभारावी, अशी विनंती केली आहे. पत्रात दर्डा यांनी म्हटले आहे की, पेट्रोल-डिझेल, एलपीजी गॅस व विमानाचे इंधन (एटीएफ) मुंबईहून रेल्वेद्वारे विदर्भात येते. याचा वाहतूक खर्च लीटरला ४ रुपये पडतो. त्यामुळे विदर्भात या इंधनांच्या किमती देशात सर्वाधिक आहेत. विदर्भात दरवर्षी १२ कोटी लीटर इतके इंधन लागते. विदर्भात रिफायनरी आली, तर वाहतुकीवर होणारा ४८,००० कोटी रुपयांचा खर्च वाचेल व इंधनही स्वस्त होईल.स्वस्तातील इंधन विदर्भानजीकच्या मध्य भारतातील १५ सिमेंट कारखान्यांना पुरविता येईल. याशिवाय नागपूर, जबलपूर व रायपूर ही तिन्ही विमानतळे या रिफायनरीशी पाइप लाइनने जोडता येतील व त्यांना स्वस्त एटीएफ पुरविता येईल. त्यामुळे विमान वाहतुकीला बळ मिळेल. विदर्भातील या रिफायनरीतून बहुमोल पेट्रो-केमिकल्सही मिळतील व त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग विदर्भात येतील आणि रोजगार उपलब्ध होतील. या रिफायनरीमुळे नागपूरच्या मिहान-एसईझेड प्रकल्पाला नवी ऊर्जा मिळेल.विदर्भातील रिफायनरीचे समर्थन करताना, दर्डा यांनी समुद्री बंदरापासून लांब असलेल्या बीना, मथुरा, पानीपत, भटिंडा व बटौनीमध्ये या पाच रिफायनरी सुरू असल्याचे नमूद केले आहे. या सर्व रिफायनरीज समुद्री बंदरांशी पाइपलाइनने जोडल्या आहेत. त्यामुळे वाहतूक खर्च खूपच कमी झाला आहे. विदर्भातील रिफायनरीसुद्धा अशा प्रकारे मुंबई बंदराशी पाइपलाइनने जोडणे शक्य आहे व ही पाइपलाइन समृद्धी महामार्गाच्या बाजूला उभारता येईल, हेही नमूद केले आहे.सध्या भारतातील सर्व रिफायनरीजची क्षमता २४५ दशलक्ष टन आहे. २०३० पर्यंत ही क्षमता ४३९ दशलक्ष टनापर्यंत वाढवावी लागणार आहे. त्यामुळे नव्या रिफायनरीज उभ्या करणे क्रमप्राप्त आहे. त्यापैकी एक रिफायनरी महाराष्टÑ सरकारने विदर्भात उभारावी, अशी विनंती दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

विदर्भात रिफायनरी सहज शक्यजगातील सर्वात मोठी रिफायनरी, रिलायन्स उद्योग समूहाने जामनगर येथे उभारला आहे. या रिफायनरीची क्षमता ६० दशलक्ष टन आहे. रिलायन्स समूहाची जवळपास ५०० एकर जागा मौदा गावात आहे व तिथे रिलायन्स जियोचे दोन डेटा सेंटर्स काम करीत आहेत. या प्रकल्पाच्या आजूबाजूला हजारो एकर जमीन रिफायनरीसाठी अधिग्रहित करता येण्याजोगी आहे, त्या ठिकाणी खासगी रिफायनरी येऊ शकते.याशिवाय, सुमारे १० वर्षांपूर्वी केंद्र सरकारने नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग सेंटर्स उभे करण्यासाठी उमरेडजवळ सुमारे ५,००० एकर जमीन अधिग्रहित केली होती. हा प्रकल्प नंतर बारगळला, पण जमीन मात्र अजून कायम आहे. प्रस्तावित समृद्धी महामार्गापासून जवळ ही जमीन आहे. त्या ठिकाणी सरकारी रिफायनरी उभारणे शक्य आहे. 

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पVijay Dardaविजय दर्डा