शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

नाणारची रिफायनरी विदर्भात उभारा; विजय दर्डा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:42 IST

पेट्रोल-डिझेल, एलपीजी गॅस व विमानाचे इंधन (एटीएफ) मुंबईहून रेल्वेद्वारे विदर्भात येते. याचा वाहतूक खर्च लीटरला ४ रुपये पडतो. त्यामुळे विदर्भात या इंधनांच्या किमती देशात सर्वाधिक आहेत.

नागपूर : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे प्रस्तावित पेट्रोलियम रिफायनरीला गावकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेता, ही रिफायनरी विदर्भात उभारावी, अशी विनंती ‘लोकमत’ मीडियाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारा केली आहे.नाणार येथील ग्रामस्थ व शिवसेनेचा या रिफायनरीला विरोध आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी काढलेली अधिसूचना रद्द करण्यात आल्याची घोषणा केली आहे, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही रिफायनरी विदर्भात घेऊन जा, असे वक्तव्य केले आहे.नाणार प्रकल्पावरून या घडामोडी होण्याआधीच माजी खा. दर्डा यांनी ५ एप्रिल २०१८ रोजी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात ही रिफायनरी विदर्भात उभारावी, अशी विनंती केली आहे. पत्रात दर्डा यांनी म्हटले आहे की, पेट्रोल-डिझेल, एलपीजी गॅस व विमानाचे इंधन (एटीएफ) मुंबईहून रेल्वेद्वारे विदर्भात येते. याचा वाहतूक खर्च लीटरला ४ रुपये पडतो. त्यामुळे विदर्भात या इंधनांच्या किमती देशात सर्वाधिक आहेत. विदर्भात दरवर्षी १२ कोटी लीटर इतके इंधन लागते. विदर्भात रिफायनरी आली, तर वाहतुकीवर होणारा ४८,००० कोटी रुपयांचा खर्च वाचेल व इंधनही स्वस्त होईल.स्वस्तातील इंधन विदर्भानजीकच्या मध्य भारतातील १५ सिमेंट कारखान्यांना पुरविता येईल. याशिवाय नागपूर, जबलपूर व रायपूर ही तिन्ही विमानतळे या रिफायनरीशी पाइप लाइनने जोडता येतील व त्यांना स्वस्त एटीएफ पुरविता येईल. त्यामुळे विमान वाहतुकीला बळ मिळेल. विदर्भातील या रिफायनरीतून बहुमोल पेट्रो-केमिकल्सही मिळतील व त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग विदर्भात येतील आणि रोजगार उपलब्ध होतील. या रिफायनरीमुळे नागपूरच्या मिहान-एसईझेड प्रकल्पाला नवी ऊर्जा मिळेल.विदर्भातील रिफायनरीचे समर्थन करताना, दर्डा यांनी समुद्री बंदरापासून लांब असलेल्या बीना, मथुरा, पानीपत, भटिंडा व बटौनीमध्ये या पाच रिफायनरी सुरू असल्याचे नमूद केले आहे. या सर्व रिफायनरीज समुद्री बंदरांशी पाइपलाइनने जोडल्या आहेत. त्यामुळे वाहतूक खर्च खूपच कमी झाला आहे. विदर्भातील रिफायनरीसुद्धा अशा प्रकारे मुंबई बंदराशी पाइपलाइनने जोडणे शक्य आहे व ही पाइपलाइन समृद्धी महामार्गाच्या बाजूला उभारता येईल, हेही नमूद केले आहे.सध्या भारतातील सर्व रिफायनरीजची क्षमता २४५ दशलक्ष टन आहे. २०३० पर्यंत ही क्षमता ४३९ दशलक्ष टनापर्यंत वाढवावी लागणार आहे. त्यामुळे नव्या रिफायनरीज उभ्या करणे क्रमप्राप्त आहे. त्यापैकी एक रिफायनरी महाराष्टÑ सरकारने विदर्भात उभारावी, अशी विनंती दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

विदर्भात रिफायनरी सहज शक्यजगातील सर्वात मोठी रिफायनरी, रिलायन्स उद्योग समूहाने जामनगर येथे उभारला आहे. या रिफायनरीची क्षमता ६० दशलक्ष टन आहे. रिलायन्स समूहाची जवळपास ५०० एकर जागा मौदा गावात आहे व तिथे रिलायन्स जियोचे दोन डेटा सेंटर्स काम करीत आहेत. या प्रकल्पाच्या आजूबाजूला हजारो एकर जमीन रिफायनरीसाठी अधिग्रहित करता येण्याजोगी आहे, त्या ठिकाणी खासगी रिफायनरी येऊ शकते.याशिवाय, सुमारे १० वर्षांपूर्वी केंद्र सरकारने नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग सेंटर्स उभे करण्यासाठी उमरेडजवळ सुमारे ५,००० एकर जमीन अधिग्रहित केली होती. हा प्रकल्प नंतर बारगळला, पण जमीन मात्र अजून कायम आहे. प्रस्तावित समृद्धी महामार्गापासून जवळ ही जमीन आहे. त्या ठिकाणी सरकारी रिफायनरी उभारणे शक्य आहे. 

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पVijay Dardaविजय दर्डा