शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

नाणार प्रकल्प रायगडला; मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 06:29 IST

शिवसेनेच्या प्रचंड विरोधानंतर नाणारमध्ये प्रकल्प होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील तेलशुद्धिकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यात हलवण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एका लेखी उत्तरात बुधवारी दिले.शिवसेनेच्या प्रचंड विरोधानंतर नाणारमध्ये प्रकल्प होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. या प्रकल्पाबाबत विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी तेलशुद्धिकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यात होणार, असे स्पष्टपणे सांगितले नाही. मात्र, त्या ठिकाणी सिडकोने औद्योगिक टाऊनशिप उभारण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे आणि त्या ठिकाणी भूसंपादनास स्थानिकांकडून कोणताही विरोध झालेला नाही, असेही स्पष्ट केले.अलिबाग, मुरुड, रोहा आणि श्रीवर्धन या चार तालुक्यांमधील ४० गावांमध्ये सिडकोच्या वतीने १३ हजार ४०९ हेक्टरमध्ये औद्योगिक टाऊनशिप उभारणे प्रस्तावित आहे. या प्रकल्पास स्थानिकांनी विरोध केलेला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले मात्र, त्या ठिकाणी तेलशुद्धिकरण प्रकल्पच होणार असल्याचे सांगितले नाही. विरोधी पक्षांच्या वीसहून अधिक सदस्यांनी नाणारचा प्रकल्प रायगड जिल्ह्यात हलविणार का असा प्रश्न उपस्थित केला होता. त्या बाबत मुख्यमंत्र्यांनी हो वा नाही असे ठोस उत्तर न देता संदिग्धता कायम ठेवली. त्यामुळे तेलशुद्धिकरण प्रकल्प रायगडला हलविणार अशी जोरदार चर्चा माध्यमांमधून सुरू झाली. रायगड जिल्ह्यात हा प्रकल्प येऊ देणार नाही, अशी भूमिका शेकापचे नेते जयंत पाटील यांनी जाहीर केली.

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्प