शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

नाणार जमीन अधिग्रहणाची सूचना रद्द केलेली नाही, मुख्यमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 04:18 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या तेल शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल्स प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची नोटीस उद्योग विभागाने काढलेली आहे.

नागपूर : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या तेल शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल्स प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची नोटीस उद्योग विभागाने काढलेली आहे. ती अद्याप रद्द करण्यात आलेली नाही. भूसंपादन भूधारकांच्या संमतीखेरीज करण्यात येणार नाही, अशी मािहती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली. विशेष म्हणचे याआधी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी नाणार येथील सभेत उद्योग विभागाने काढलेली अधिसूचना रद्द करण्यात आल्याची घोषणा केली होती.सदस्य हुस्नबानू खलिफे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी स्थानिक लोकांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प उभारला जाईल, अशी ग्वाही दिली. शिवसेनेचे अनिल परब म्हणाले, स्थानिक लोकांचा प्रकल्पाला विरोध आहे. ग्रामपंचायतीने याबाबतचा निर्णय घेतला आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले, जेव्हा समृद्धी महामार्ग हाती घेतला तेव्हा त्यालाही विरोध झाला होता. विश्वासात घेतल्यानंतर लोक तयार झाले. मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने नाराज झालेल्या शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहात नाणारच्या विरोधात घोषणा देण्याला सुरुवात केली. यावर ठरल्याप्रमाणे नारे द्यायचेच असेल तर द्या, अशी नाराजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. सदस्य संजय दत्त म्हणाले, आमचा विकासाला विरोध नाही. पण या प्रकल्पामुळे प्रदूषणाचे प्रश्न निर्माण होतील. प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.>तटकरेंना सरकार कसे चालते माहीत नाही ?विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात नाणार प्रकल्पावर चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी नाणार प्रकल्पाची अधिसूचना कोणत्या विभागाने काढली, मंत्री कोण होते, यासंदर्भात बैठक झाली होती का, असे प्रश्न उपस्थित केले. तटकरे यांचा रोख उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे असल्याने यावर नाराज झालेले शिवसेनेचे अनिल परब म्हणाले, तटकरे आधीच्या सरकारमध्ये मंत्री होते.असे असूनही त्यांना अधिसूचना कोणत्या विभागाकडून काढली याची माहिती नाही का?

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस