शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

नगरचे साखर साम्राज्य खालसा; सोलापूर नवी पंढरी

By admin | Updated: May 4, 2016 02:14 IST

पहिला सहकारी व खासगी सहकारी साखर कारखाना सुरू करून महाराष्ट्रातच नाही तर भारतात साखर कारखानदारीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याचे साखर साम्राज्य काळाच्या ओघात

- मिलिंदकुमार साळवे,  श्रीरामपूर

पहिला सहकारी व खासगी सहकारी साखर कारखाना सुरू करून महाराष्ट्रातच नाही तर भारतात साखर कारखानदारीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याचे साखर साम्राज्य काळाच्या ओघात खालसा झाले आहे. देशातील साखरेचे आगार म्हणून असलेली अहमदनगरची ओळख पुसून दुष्काळी म्हणून ओळख असलेला सोलापूर जिल्हा आता साखर कारखानदारीची नवी पंढरी बनला आहे. सोलापूरच्या ३४ खासगी कारखान्यांच्या धडाक्यामुळे २२ साखर कारखान्यांच्या अहमदनगर जिल्ह्याची साखर कारखानदारीत पिछेहाट झाली आहे. दिवंगत धनंजयराव गाडगीळ, वैकुंभाई मेहता, पद्मश्री विठ्ठलराव विखे व माजी केंद्रिय कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे आदींच्या प्रयत्नातून प्रवरानगरमध्ये भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झाला. त्याहीपूर्वी श्रीरामपूरजवळच्या हरेगावात ब्रॅडी कंपनीने देशातील पहिला खासगी साखर कारखाना सुरू केला.आतापर्यंत सर्वाधिक साखर कारखान्यांमुळे नगरला साखरेचे आगार म्हटले जात होते. नंतर साईकृपाच्या रुपाने सहकाराच्या बरोबरीने खासगी साखर कारखानेही नगरमध्ये पुन्हा सुरू झाले. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या माहितीनुसार १९५०-५१ मध्ये देशात १४३ साखर कारखाने होते. आता २०१४-१५ मध्ये ही संख्या ५३८ वर पोहोचली आहे. त्यातील निम्मे राज्यातील आहेत. २०१४-१५ मध्ये महाराष्ट्रात १७८ सहकारी कारखाने होते. २०१५ अखेरीस राज्यात १९८ कारखाने होते.