शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

नाणार प्रकल्प होणार नाही!

By अतुल कुलकर्णी | Updated: June 28, 2018 07:43 IST

‘नाणार’वरून शिवसेना-भाजपातील संबंध ताणले गेले असून, कोकणवासीयांना नको असलेला प्रकल्प होणार नाही, असे ठणकावून सांगत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या भेटीचा प्रस्ताव धुडकावला.

अतुल कुलकर्णीमुंबई : ‘नाणार’वरून शिवसेना-भाजपातील संबंध ताणले गेले असून, कोकणवासीयांना नको असलेला प्रकल्प होणार नाही, असे ठणकावून सांगत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या भेटीचा प्रस्ताव धुडकावला. मंत्रिमंडळ बैठकीत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आम्हाला न विचारता परस्पर दिल्लीत करार कसे करता, असे चढ्या आवाजात विचारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बड्या उद्योगपतींची बैठक राजभवनात घेतली, त्याचे निमंत्रणही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना न पाठविल्याचे पडसादही मंत्रिमंडळ बैठकीत उमटले.

नाणार येथे ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी सोमवारी अरबस्तानच्या कंपन्यांशी ३ लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर सह्या झाल्या. त्यानंतर, हा प्रकल्प केल्यास राजीनामा देऊ, असे उद्योगमंत्री देसाई यांनी सांगितले. शिवसेनेच्या नाराजीनंतर दिल्लीतून, गुरुवारी मातोश्रीवर भेटीला येतो, असा निरोप धर्मेंद्र प्रधान यांनी पाठविला. मात्र, करार रद्द करून आल्यासच तुमचे स्वागत करू, असेही ठाकरे यांनी सांगितल्याचे समजते.मंत्रिमंडळ बैठकीत रावते यांनी ‘नाणार’वरून नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, जे विषय मुख्यमंत्र्यांनाच माहीत नसतील, तर आम्हाला तरी कसे कळतील? मुख्यमंत्र्यांनी मात्र अशी काही चर्चाच झाली नाही, असे सांगितले.

काय आहे नेमका हा प्रकल्प?इंडियन आॅइल, भारत पेट्रोलियम व आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तेल कंपन्यांनी ५०:२५:२५ प्रमाणे भागीदारीतून आरआपीसीएल या प्रकल्पाची २२ सप्टेंबर २०१७ रोजी स्थापना केली. सामंजस्य करारामुळे रत्नागिरीतील प्रकल्पाच्या निर्मिती व विकासासाठी भारतीय तेल कंपन्या व सौदी अरामको आणि एडनॉक या विदेशी कंपन्यांमध्ये ५०:५० प्रमाणे भागीदारी निश्चित झाली आहे. या प्रकल्पातून दिवसाला १.२ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्यात येईल. पेट्रोल, डिझेल व अन्य पेट्रोलियम उत्पादने तयार होतील व मोठ्या प्रकल्पांसाठी कच्चा मालही पुरविण्यात येईल.नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. वेळ पडली तर खासदारकीचा राजीनामा फेकून देऊ, अशा शब्दांत भाजपाचे खा. नारायण राणे यांनी घरचा अहेर दिला. शिवसेना नेत्यांत राजीनामा देण्याची धमक नाही, आपल्यात ती आहे, असेही राणे म्हणाले.