शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नाणार प्रकल्प होणार नाही!

By अतुल कुलकर्णी | Updated: June 28, 2018 07:43 IST

‘नाणार’वरून शिवसेना-भाजपातील संबंध ताणले गेले असून, कोकणवासीयांना नको असलेला प्रकल्प होणार नाही, असे ठणकावून सांगत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या भेटीचा प्रस्ताव धुडकावला.

अतुल कुलकर्णीमुंबई : ‘नाणार’वरून शिवसेना-भाजपातील संबंध ताणले गेले असून, कोकणवासीयांना नको असलेला प्रकल्प होणार नाही, असे ठणकावून सांगत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या भेटीचा प्रस्ताव धुडकावला. मंत्रिमंडळ बैठकीत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आम्हाला न विचारता परस्पर दिल्लीत करार कसे करता, असे चढ्या आवाजात विचारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बड्या उद्योगपतींची बैठक राजभवनात घेतली, त्याचे निमंत्रणही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना न पाठविल्याचे पडसादही मंत्रिमंडळ बैठकीत उमटले.

नाणार येथे ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी सोमवारी अरबस्तानच्या कंपन्यांशी ३ लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर सह्या झाल्या. त्यानंतर, हा प्रकल्प केल्यास राजीनामा देऊ, असे उद्योगमंत्री देसाई यांनी सांगितले. शिवसेनेच्या नाराजीनंतर दिल्लीतून, गुरुवारी मातोश्रीवर भेटीला येतो, असा निरोप धर्मेंद्र प्रधान यांनी पाठविला. मात्र, करार रद्द करून आल्यासच तुमचे स्वागत करू, असेही ठाकरे यांनी सांगितल्याचे समजते.मंत्रिमंडळ बैठकीत रावते यांनी ‘नाणार’वरून नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, जे विषय मुख्यमंत्र्यांनाच माहीत नसतील, तर आम्हाला तरी कसे कळतील? मुख्यमंत्र्यांनी मात्र अशी काही चर्चाच झाली नाही, असे सांगितले.

काय आहे नेमका हा प्रकल्प?इंडियन आॅइल, भारत पेट्रोलियम व आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तेल कंपन्यांनी ५०:२५:२५ प्रमाणे भागीदारीतून आरआपीसीएल या प्रकल्पाची २२ सप्टेंबर २०१७ रोजी स्थापना केली. सामंजस्य करारामुळे रत्नागिरीतील प्रकल्पाच्या निर्मिती व विकासासाठी भारतीय तेल कंपन्या व सौदी अरामको आणि एडनॉक या विदेशी कंपन्यांमध्ये ५०:५० प्रमाणे भागीदारी निश्चित झाली आहे. या प्रकल्पातून दिवसाला १.२ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्यात येईल. पेट्रोल, डिझेल व अन्य पेट्रोलियम उत्पादने तयार होतील व मोठ्या प्रकल्पांसाठी कच्चा मालही पुरविण्यात येईल.नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. वेळ पडली तर खासदारकीचा राजीनामा फेकून देऊ, अशा शब्दांत भाजपाचे खा. नारायण राणे यांनी घरचा अहेर दिला. शिवसेना नेत्यांत राजीनामा देण्याची धमक नाही, आपल्यात ती आहे, असेही राणे म्हणाले.