शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

नाणार प्रकल्प होणार नाही!

By अतुल कुलकर्णी | Updated: June 28, 2018 07:43 IST

‘नाणार’वरून शिवसेना-भाजपातील संबंध ताणले गेले असून, कोकणवासीयांना नको असलेला प्रकल्प होणार नाही, असे ठणकावून सांगत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या भेटीचा प्रस्ताव धुडकावला.

अतुल कुलकर्णीमुंबई : ‘नाणार’वरून शिवसेना-भाजपातील संबंध ताणले गेले असून, कोकणवासीयांना नको असलेला प्रकल्प होणार नाही, असे ठणकावून सांगत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या भेटीचा प्रस्ताव धुडकावला. मंत्रिमंडळ बैठकीत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आम्हाला न विचारता परस्पर दिल्लीत करार कसे करता, असे चढ्या आवाजात विचारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बड्या उद्योगपतींची बैठक राजभवनात घेतली, त्याचे निमंत्रणही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना न पाठविल्याचे पडसादही मंत्रिमंडळ बैठकीत उमटले.

नाणार येथे ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी सोमवारी अरबस्तानच्या कंपन्यांशी ३ लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर सह्या झाल्या. त्यानंतर, हा प्रकल्प केल्यास राजीनामा देऊ, असे उद्योगमंत्री देसाई यांनी सांगितले. शिवसेनेच्या नाराजीनंतर दिल्लीतून, गुरुवारी मातोश्रीवर भेटीला येतो, असा निरोप धर्मेंद्र प्रधान यांनी पाठविला. मात्र, करार रद्द करून आल्यासच तुमचे स्वागत करू, असेही ठाकरे यांनी सांगितल्याचे समजते.मंत्रिमंडळ बैठकीत रावते यांनी ‘नाणार’वरून नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, जे विषय मुख्यमंत्र्यांनाच माहीत नसतील, तर आम्हाला तरी कसे कळतील? मुख्यमंत्र्यांनी मात्र अशी काही चर्चाच झाली नाही, असे सांगितले.

काय आहे नेमका हा प्रकल्प?इंडियन आॅइल, भारत पेट्रोलियम व आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तेल कंपन्यांनी ५०:२५:२५ प्रमाणे भागीदारीतून आरआपीसीएल या प्रकल्पाची २२ सप्टेंबर २०१७ रोजी स्थापना केली. सामंजस्य करारामुळे रत्नागिरीतील प्रकल्पाच्या निर्मिती व विकासासाठी भारतीय तेल कंपन्या व सौदी अरामको आणि एडनॉक या विदेशी कंपन्यांमध्ये ५०:५० प्रमाणे भागीदारी निश्चित झाली आहे. या प्रकल्पातून दिवसाला १.२ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्यात येईल. पेट्रोल, डिझेल व अन्य पेट्रोलियम उत्पादने तयार होतील व मोठ्या प्रकल्पांसाठी कच्चा मालही पुरविण्यात येईल.नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. वेळ पडली तर खासदारकीचा राजीनामा फेकून देऊ, अशा शब्दांत भाजपाचे खा. नारायण राणे यांनी घरचा अहेर दिला. शिवसेना नेत्यांत राजीनामा देण्याची धमक नाही, आपल्यात ती आहे, असेही राणे म्हणाले.