पुणो : नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) गेल्या 1क् दिवसांपासून खोळंबला आहे. अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात अनुकूलता नसल्याने मान्सून पुढे सरकत नसल्याने यंदा 28 जून उजाडला तरी मान्सूनने केवळ अर्धाच भारत व्यापला आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.
1क् दिवसांपासून मान्सून गुजरातच्या सुरत, महाराष्ट्राच्या नाशिक, वाशीम तर मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशच्या दामोह व सुलतानपूर येथेच अडकला आहे. 19 जूनला मान्सूनने शेवटची दमदार आगेकूच केली होती. अरबी समुद्रात जूनच्या दुस:या आठवडय़ात आलेल्या ‘नानौक’ चक्रीवादळामुळे बाष्पयुक्त वारे ओमानकडे गेल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम येथून येणा:या मान्सूनवर पडला आहे. त्यातच लक्षद्वीप बेटांवरती हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने तो बाष्पयुक्त वारे ओढून घेत आहे. त्यामुळे अरबी समुद्राच्या नैर्ऋत्य भागातून येणारे बाष्पयुक्त वारे पुढे सरकण्यासाठी अनुकूलताच नसल्याचे चित्र आहे. पुढील 3 ते 4 दिवस ही स्थिती कायम राहील असा अंदाज आहे.
यंदा मान्सून नियोजित वेळेअगोदरच अंदमानच्या समुद्रात दाखल झाला. पण त्यानंतर त्याचा लहरीपणा प्रत्येक टप्प्यावर जाणवला. त्यामुळे केरळामध्ये तो नियोजित वेळेपेक्षा 6 दिवस उशिरा 6 जूनला दाखल झाला. त्यानंतर त्याची वाटचाल ही धीम्या गतीनेच झाली. महाराष्ट्रातही तो 4 दिवस उशिरा नावापुरता दाखल झाला.
मान्सून साधारणत: 15 जूनर्पयत अध्र्याहून जास्त भारत आणि 1 जुलैर्पयत बहुतांशी भारत व्यापतो. मात्र गुजरातमधील सुरत शहर वगळता इतर कोठेही, अर्धा मध्य प्रदेश, पाऊण उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये अजूनही मान्सून पोहोचलेला नाही. (प्रतिनिधी)
मान्सूनच्या पहिल्याच महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे गेल्या दशकभरातील हा सर्वात कमी पावसाळी महिना ठरला आह़े एवढेच नव्हेतर, 1951पासून तुलना केल्यास यंदाचा जून महिना हा 63 वर्षातील तिसरा भीषण पावसाळी महिना म्हणून नोंद होणार आह़े यामुळे मुंबईकरांना यंदा भीषण पाणी संकटाचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत़