शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

नामशेष होतोय हेमाडपंती मंदिरांचा ठेवा : निधी मंजूर; मुहूर्त मिळेना

By अझहर शेख | Updated: July 31, 2017 22:15 IST

अझहर शेख / लोकमत आॅनलाइन, नाशिक -  यादवकाळात त्या क्षेत्राची राजधानीचा नावलौकिक आणि रामायणात अंजनीपुत्र हनुमानाचे जन्मस्थळ होण्याचा अभिमान बाळगणाºया नाशिक जिल्ह्यातील ...

ठळक मुद्देप्राचीन हेमाडपंती स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली जैन व हिंदू मंदिरांचा अमूल्य व दुर्मीळ ठेवा संरक्षित वास्तू म्हणून घोषित केलेल्या १६ मंदिरांच्या पुनर्विकासासाठी १६.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर मंदिराची दुरवस्था कायम असून फलक मात्र चकाचक असल्याचे चित्र निधी मंजूर होऊन वर्षभराचा कालावधी उलटलामंदिरे काळानुरूप जीर्ण झाली असून त्यांची पडझड सुरूच आहे

अझहर शेख / लोकमत आॅनलाइन, नाशिक -  यादवकाळात त्या क्षेत्राची राजधानीचा नावलौकिक आणि रामायणात अंजनीपुत्र हनुमानाचे जन्मस्थळ होण्याचा अभिमान बाळगणाºया नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या अंजनगिरी पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या अंजनेरी गावातील सुमारे एक हजार वर्षाहुन अधिक प्राचीन हेमाडपंती स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली जैन व हिंदू मंदिरांचा अमूल्य व दुर्मीळ ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हा ठेवा जतन व्हावा, यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाकडून भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारितीत गेल्या वर्षी सुमारे १६ कोटी ७५ लाखांचा निधी केंद्राकडून मंजूर करण्यात आला; मात्र अद्याप येथील १६ हेमाडपंती मंदिरांच्या पुनर्विकासाच्या कामाला मुहूर्त मिळत नसल्याने मंदिरांची पडझड रोखण्यास प्रशासनाला अपयश येत आहे.नाशिक शहरापासून अवघ्या २१ किलोमीटर आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरपासून सहा किलोमीटर अलीकडे असलेल्या अंजनेरी तीर्थक्षेत्र एकेकाळी जैन धर्मीय समाजबांधवांची वसाहत म्हणूनदेखील ओळखले जात होते. या अंजनेरी गावाच्या वेशीवर असलेल्या विविध जैन व हिंदू धर्मीय हेमाडपंतीय पुरातन मंदिरे आजही गौरवशाली धार्मिक इतिहासाची साक्ष देतात. येथील मंदिरांमध्ये आढळलेल्या शिलालेखावरील उल्लेखानुसार इसवी सन ११४२ (शके १०६३)मध्ये यादवकालीन राजाच्या एका मंत्र्याकडून येथील पुरातन मंदिरांचा जीर्णोध्दाराचा प्रयत्न झाल्याचे पुरावे आढळतात. तसेच १७०८ साली जेव्हा अंजनेरी राजधानी मराठा पेशव्यांच्या साम्राज्यात विलीन झाली तेव्हादेखील येथील मंदिरांच्या विकासाचा प्रयत्न केला गेला. येथील सर्व मंदिरांच्या सभोवताली संरक्षक जाळ्यांचे कुंपण भारतीय पुरातत्व विभागाकडून करण्यात आले आहे. सदर मंदिरे ही प्राचीन स्मारके घोषित करून ३ एप्रिल १९१६ साली इंग्रज राजवटीत भारतीय पुरातत्व विभागाकडून संरक्षित वास्तू म्हणून जाहीर करण्यात आले. तेव्हापासून आजतागायत या मंदिरांभोवती पुरातत्व विभागाने संरक्षण कुंपण घालण्याखेरीज दुसरी कुठलीही उपाययोजना हा ठेवा जतन करण्याच्या दृष्टीने केल्याचे दिसत नाही.

old Temple

गेल्या वर्षी ११ मार्च रोजी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी कें द्रीय पुरातत्व विभाग निधीअंतर्गत अंजनेरी परिसरातील जीर्ण झालेल्या पुरातन संरक्षित वास्तू म्हणून घोषित केलेल्या १६ मंदिरांच्या पुनर्विकासासाठी १६.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या ठिकाणी थाटामाटात मंदिरांचे नूतनीकरण व विकासकामाचे उद्घाटन के ले; मात्र हे उद्घाटन सध्या येथे झळकत असलेल्या माहिती फलकाचेच झाले की काय? अशी शंका नाशिककरांसह परराज्यातून येणाºया भाविक व पर्यटकांकडून उपस्थित केली जात आहे. कारण मंदिराची दुरवस्था कायम असून फलक मात्र चकाचक असल्याचे चित्र नजरेस पडते. त्यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. निधी मंजूर होऊन वर्षभराचा कालावधी उलटला असतानाही अद्याप मंदिरांच्या विकासकामाला कुठलीही सुरूवात होऊ शकली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मंदिरांची मोठ्या प्रमाणात पडझडयेथील ऐतिहासिक प्राचीन संरक्षित वास्तू म्हणून भारतीय पुरातत्व विभागाने घोषित केलेल्या मंदिरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. काही मंदिरे नामशेष झाली असून सर्वत्र विखुरलेल्या दगडांवरून मंदिरांचे अवशेष लक्षात येतात. काही मंदिरे काळानुरूप जीर्ण झाली असून त्यांचीदेखील पडझड सुरूच आहे. हा दुर्मीळ प्राचीन व उत्कृष्ट स्थापत्यक लेचा नमुना असलेला ठेवा वेळीच जतन करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न लवकर सुरू न झाल्यास हा ठेवा संपूर्णपणे नामशेष होण्याचा धोका आहे.