शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

नामशेष होतोय हेमाडपंती मंदिरांचा ठेवा : निधी मंजूर; मुहूर्त मिळेना

By अझहर शेख | Updated: July 31, 2017 22:15 IST

अझहर शेख / लोकमत आॅनलाइन, नाशिक -  यादवकाळात त्या क्षेत्राची राजधानीचा नावलौकिक आणि रामायणात अंजनीपुत्र हनुमानाचे जन्मस्थळ होण्याचा अभिमान बाळगणाºया नाशिक जिल्ह्यातील ...

ठळक मुद्देप्राचीन हेमाडपंती स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली जैन व हिंदू मंदिरांचा अमूल्य व दुर्मीळ ठेवा संरक्षित वास्तू म्हणून घोषित केलेल्या १६ मंदिरांच्या पुनर्विकासासाठी १६.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर मंदिराची दुरवस्था कायम असून फलक मात्र चकाचक असल्याचे चित्र निधी मंजूर होऊन वर्षभराचा कालावधी उलटलामंदिरे काळानुरूप जीर्ण झाली असून त्यांची पडझड सुरूच आहे

अझहर शेख / लोकमत आॅनलाइन, नाशिक -  यादवकाळात त्या क्षेत्राची राजधानीचा नावलौकिक आणि रामायणात अंजनीपुत्र हनुमानाचे जन्मस्थळ होण्याचा अभिमान बाळगणाºया नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या अंजनगिरी पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या अंजनेरी गावातील सुमारे एक हजार वर्षाहुन अधिक प्राचीन हेमाडपंती स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली जैन व हिंदू मंदिरांचा अमूल्य व दुर्मीळ ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हा ठेवा जतन व्हावा, यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाकडून भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारितीत गेल्या वर्षी सुमारे १६ कोटी ७५ लाखांचा निधी केंद्राकडून मंजूर करण्यात आला; मात्र अद्याप येथील १६ हेमाडपंती मंदिरांच्या पुनर्विकासाच्या कामाला मुहूर्त मिळत नसल्याने मंदिरांची पडझड रोखण्यास प्रशासनाला अपयश येत आहे.नाशिक शहरापासून अवघ्या २१ किलोमीटर आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरपासून सहा किलोमीटर अलीकडे असलेल्या अंजनेरी तीर्थक्षेत्र एकेकाळी जैन धर्मीय समाजबांधवांची वसाहत म्हणूनदेखील ओळखले जात होते. या अंजनेरी गावाच्या वेशीवर असलेल्या विविध जैन व हिंदू धर्मीय हेमाडपंतीय पुरातन मंदिरे आजही गौरवशाली धार्मिक इतिहासाची साक्ष देतात. येथील मंदिरांमध्ये आढळलेल्या शिलालेखावरील उल्लेखानुसार इसवी सन ११४२ (शके १०६३)मध्ये यादवकालीन राजाच्या एका मंत्र्याकडून येथील पुरातन मंदिरांचा जीर्णोध्दाराचा प्रयत्न झाल्याचे पुरावे आढळतात. तसेच १७०८ साली जेव्हा अंजनेरी राजधानी मराठा पेशव्यांच्या साम्राज्यात विलीन झाली तेव्हादेखील येथील मंदिरांच्या विकासाचा प्रयत्न केला गेला. येथील सर्व मंदिरांच्या सभोवताली संरक्षक जाळ्यांचे कुंपण भारतीय पुरातत्व विभागाकडून करण्यात आले आहे. सदर मंदिरे ही प्राचीन स्मारके घोषित करून ३ एप्रिल १९१६ साली इंग्रज राजवटीत भारतीय पुरातत्व विभागाकडून संरक्षित वास्तू म्हणून जाहीर करण्यात आले. तेव्हापासून आजतागायत या मंदिरांभोवती पुरातत्व विभागाने संरक्षण कुंपण घालण्याखेरीज दुसरी कुठलीही उपाययोजना हा ठेवा जतन करण्याच्या दृष्टीने केल्याचे दिसत नाही.

old Temple

गेल्या वर्षी ११ मार्च रोजी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी कें द्रीय पुरातत्व विभाग निधीअंतर्गत अंजनेरी परिसरातील जीर्ण झालेल्या पुरातन संरक्षित वास्तू म्हणून घोषित केलेल्या १६ मंदिरांच्या पुनर्विकासासाठी १६.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या ठिकाणी थाटामाटात मंदिरांचे नूतनीकरण व विकासकामाचे उद्घाटन के ले; मात्र हे उद्घाटन सध्या येथे झळकत असलेल्या माहिती फलकाचेच झाले की काय? अशी शंका नाशिककरांसह परराज्यातून येणाºया भाविक व पर्यटकांकडून उपस्थित केली जात आहे. कारण मंदिराची दुरवस्था कायम असून फलक मात्र चकाचक असल्याचे चित्र नजरेस पडते. त्यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. निधी मंजूर होऊन वर्षभराचा कालावधी उलटला असतानाही अद्याप मंदिरांच्या विकासकामाला कुठलीही सुरूवात होऊ शकली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मंदिरांची मोठ्या प्रमाणात पडझडयेथील ऐतिहासिक प्राचीन संरक्षित वास्तू म्हणून भारतीय पुरातत्व विभागाने घोषित केलेल्या मंदिरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. काही मंदिरे नामशेष झाली असून सर्वत्र विखुरलेल्या दगडांवरून मंदिरांचे अवशेष लक्षात येतात. काही मंदिरे काळानुरूप जीर्ण झाली असून त्यांचीदेखील पडझड सुरूच आहे. हा दुर्मीळ प्राचीन व उत्कृष्ट स्थापत्यक लेचा नमुना असलेला ठेवा वेळीच जतन करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न लवकर सुरू न झाल्यास हा ठेवा संपूर्णपणे नामशेष होण्याचा धोका आहे.