शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुलांची घरवापसी हे माय होम इंडियाचे पुण्याचे काम

By admin | Updated: August 27, 2016 04:23 IST

१२५० मुलांना आपल्या आईवडिलांपर्यंत पोहोचवणाऱ्या माय होम इंडिया या संस्थेचा विशेष कार्यक्रम शुक्रवारी ठाण्यात पार पडला.

ठाणे : विविध कारणांमुळे घर सोडून पळालेल्या आणि नंतर आपल्या माणसांच्या भेटीची स्वप्ने पाहणाऱ्या सुमारे १२५० मुलांना आपल्या आईवडिलांपर्यंत पोहोचवणाऱ्या माय होम इंडिया या संस्थेचा विशेष कार्यक्रम शुक्रवारी ठाण्यात पार पडला. या वेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण विशेष उपस्थित होते. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये रंगलेल्या या कार्यक्रमाला माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर, समाजसेवक विजय कडणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माय होम इंडियाच्या कार्यावर आधारित एक शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली. तसेच राज्यमंत्री चव्हाण यांचा सत्कार देवधर यांनी केला.या वेळी माय होम इंडियाच्या कार्यात सहभागी होणाऱ्या शंकर शेठ, शेखर फडके, विलास शिंदे, ज्योती सातपुते, निर्माण राठी, राजेंद्र मेहता, जयवंत मालणकर, दिलीप मालणकर, गजानन रत्नपारखी, स्पार्क इंडिया संस्था यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. काही मुले घरातील भांडण, राग, क्लेष यामुळे घर सोडतात. बालगृहातील अशा मुलांना सांभाळून, त्यांच्यात मानसिक परिवर्तन घडवून त्यांची घरवापसी करणे, हे मोठे पुण्याचे काम माय होम इंडिया करते आहे, असे मत राज्यमंत्री चव्हाण यांनी व्यक्त केले. तसेच एखादा मुलगा १० वी नापास झाला की, त्याला आजूबाजूच्या लोकांकडून वारंवार बोलणे ऐकावे लागते आणि त्याचा परिणाम मानसिकतेवर होऊन ती मुले घर सोडून जातात. हेच ओळखून सरकारने विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने तत्काळ दुबार परीक्षा घेऊन संस्थेच्या कार्याला एक प्रकारे हातभारच लावला आहे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)माय होम इंडियाच्या माध्यमातून ईशान्य भारतातील जनतेला आपल्याशी जोडले आहे. त्यांच्या चेहऱ्यावरून, बोलण्यावरून देशातच अनेक ठिकाणी त्यांना विदेशी समजले जाते. मात्र, हा त्यांचा अपमान आहे. आपल्याइतकेच देशप्रेम, राष्ट्रभक्ती त्यांच्याही मनात आहे. त्यामुळे त्यांचा अपमान आपण थांबवला पाहिजे, असे मत देवधर यांनी व्यक्त केले. केवळ ईशान्य भारतातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्याचे काम ‘माय होम इंडिया’ २०१३ पासून करते आहे, असे त्यांनी सांगितले. भारतमातेच्या जयजयकाराने देवधर यांनी आपले मनोगत संपवले.