शहरं
Join us  
Trending Stories
1
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
9
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
10
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
11
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
12
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
13
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
14
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
15
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
16
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
17
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
18
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
19
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
20
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला

मुस्लीम आरक्षण रद्द

By admin | Updated: March 4, 2015 02:34 IST

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारने लागू केलेले अल्पसंख्याकांसाठीचे ५ टक्के आरक्षण भाजपा-शिवसेना सरकारने अखेर अधिकृतपणे रद्द केले.

मिलिंदकुमार साळवे ल्ल श्रीरामपूरविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारने लागू केलेले अल्पसंख्याकांसाठीचे ५ टक्के आरक्षण भाजपा-शिवसेना सरकारने अखेर अधिकृतपणे रद्द केले. आघाडी सरकारच्या २४ जुलै २०१४ रोजीच्या शासन निर्णयानुसार अल्पसंख्याकांसाठी सरळसेवेच्या पदभरतीमध्ये ५ टक्के आरक्षण लागू केले होते. अल्पसंख्याक विकास विभागाच्या १९ जुलै २०१४ च्या शासन निर्णयानुसार राज्यात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या समाजासाठी विशेष मागास प्रवर्ग-अ (एसबीसी-ए) तयार करण्यात आला. त्यात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लिमांचा समावेश केल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्याप्रमाणे सरकारी-निमसरकारी नोकऱ्यांमध्ये सरळसेवा भरतीच्या पदांमध्ये ५ टक्के आरक्षण मुस्लीम समाजासाठी लागू झाले होते. ९ जुलै २०१४ पासून पदभरती करण्याचेही आदेश सामान्य प्रशासन विभागाचे सचिव प्रमोद नलावडे यांनी काढले होते.आता २ मार्च २०१५ रोजी याच विभागाचे उपसचिव टिकाराम करपते यांच्या सहीने काढलेल्या शासन निर्णयानुसार २४ जुलै २०१४ चा निर्णयच रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आपोआपच मुस्लीम आरक्षणही रद्द झाले आहे. तसेच १४ नोव्हेंबर २०१४ पासून या निर्णयाच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्यात आली आहे. मुस्लीम आरक्षणासाठी २३ डिसेंबर २०१४ रोजी काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर न झाल्यामुळे तो अध्यादेश व्यपगत झाला होता. त्यावर नव्याने अध्यादेश काढण्याची अगर मराठा आरक्षणाच्या कोर्टबाजीदरम्यान मुस्लीम आरक्षणाविषयी भूमिका मांडण्याची तसदी राज्य सरकारने घेतली नव्हती.