शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील खड्डयामुळे पत्नीच्या हत्येचा पर्दाफाश ! आरोपी पतीसह सात जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 10:22 IST

मुंबई, ठाण्यासह राज्यभरात रस्त्यावर पडलेले खड्डे जीवघेणे ठरत आहेत. अनेक निष्पाप नागरीकांचे खड्ड्यांमुळे बळी जात आहेत.

ठळक मुद्देखड्डयांमुळे हत्येचा गुन्हा उघड झाल्याची एक अजब घटना विरारमध्ये समोर आली आहे.वघ्या तीन तासात हत्येचा पदार्फाश करुन आरोपी पती, दीरासह एकूण सात जणांना अटक केली.

विरार, दि. 12 - मुंबई, ठाण्यासह राज्यभरात रस्त्यावर पडलेले खड्डे जीवघेणे ठरत आहेत. अनेक निष्पाप नागरीकांचे खड्ड्यांमुळे बळी जात आहेत. पण याच खड्डयांमुळे हत्येचा गुन्हा उघड झाल्याची एक अजब घटना विरारमध्ये समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी अवघ्या तीन तासात हत्येचा पदार्फाश करुन आरोपी पती, दीरासह एकूण सात जणांना अटक केली. विरारमध्ये राहणा-या रमाबाई पाटील (54) यांची त्यांच्या पतीनेच नामदेवने (57) हत्येची सुपारी दिली होती. 

दोघा पती-पत्नींमध्ये वाद होते. नामदेव पालघरमध्ये आपल्या दुस-या पत्नीसोबत राहत होता. पण त्याने रमाबाईला घटस्फोट दिला नव्हता. रमाबाई आणि नामदेवमध्ये सध्या देखभाल खर्च आणि संपत्तीतल्या हक्कावरुन वाद सुरु होता. रमाबाईच्या मागण्या नामदेवला मान्य नव्हत्या. त्यामुळे त्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला. यासाठी त्याने आपल्या भावाची पाडुरंग कदमची मदत घेतली. 

पाडुरंगने पाच मारेक-यांना रमाबाईच्या हत्येची सुपारी दिली. त्यासाठी अडीचलाख रुपये देण्याचे ठरले. मारेक-यांना एक लाख रुपये अॅडव्हान्समध्ये दिले. उर्वरित दीड लाख रुपये मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर देण्यात येणार होते. मारेक-यांमध्ये एक महिलादेखील होती. त्यांनी रमाबाईशी संपर्क साधला. तिला नोकरीचे आमिष दाखवून विरारमधल्या एका फार्महाऊसवर नेले. तिथे रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांनी नायलॉन रशिने गळा आवळून रमाबाईची हत्या केली. 

त्यानंतर मध्यरात्री 12.30 च्या सुमारास दोन मारेकरी रमाबाईचा मृतदेह घेऊन बाईकवरुन निघाले. कोणाला संशय येऊन नये, बाईकवर बसलेली व्यक्ती जिवंत आहे असे वाटावे यासाठी त्यांनी रमाबाईचा मृतदेह मध्ये बसवला  होता. पण दुर्देवाने रस्त्यावरील एका खड्डयामुळे त्यांची  मोटारसायकल घसरली आणि मृतदेहासह दोघेही खाली पडले. विरार पूर्वेला मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गापासून तीन किमी अंतरावर बुधहरपाडा कारनजन गावाजवळ खड्डयामुळे त्यांची बाईक घसरली.  

आजूबाजूला गर्दी जमा झाल्याने दोघेही आरोपी घाबरले. त्यांनी मृतदेह तिथेच सोडला व बाईक घेऊन तिथून पळ काढला. जमलेल्या गर्दीतील एकाने आरोपीला ओळखले व त्याने पोलिसांना माहिती दिली. विरार पोलिसांनी अवघ्या तीन तासात तपास करुन हत्येचा पदार्फाश केला. नामदेव, पाडुरंग यांच्यासह चंद्रकांत पडवळ, लक्ष्मण कोबाद, लक्ष्मण पवार, राकेश पवार आणि वंदना यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

टॅग्स :Murderखून