शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

नागरी तक्रारींवर पालिका उदासीन

By admin | Updated: May 14, 2017 01:23 IST

नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन तक्रारींचीही वेळेत दखल घेण्यात महापालिका उदासीन असल्याचे समोर आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जलवाहिनी फुटली आहे, गटार वाहतेय, अतिक्रमणाचा त्रास आहे, अशा सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन तक्रारींचीही वेळेत दखल घेण्यात महापालिका उदासीन असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत मुंबईकरांकडून आलेल्या तक्रारींपैकी निम्म्यांवर अद्याप कोणतीच पावले उचलण्यात आलेली नाहीत. यामुळे स्थानिक नागरिक मात्र हैराण आहेत.प्रजा फाउंडेशनमार्फत गेल्या महिन्यात महापालिकेच्या कारभारावर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये नागरी तक्रारींची दखल घेण्यात पालिका कमी पडत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. महिन्याभरानंतरही यात सुधारणा झालेली नाही, असे दिसून येत आहे. जानेवारी ते एप्रिल २०१७ या चार महिन्यांत महापालिकेकडे २८ हजार २०३ नागरी तक्रारी दाखल झाल्या होत्या. यापैकी जेमतेम १४ हजार तक्रारींची दखल घेऊन पालिकेने त्यावर कारवाई केली आहे.या तक्रारींमध्ये अतिक्रमण, जलवाहिनी व मलनि:सारण वाहिनींशी संबंधित तक्रारींचा समावेश आहे. नियमानुसार पाणी, कचरा आणि सांडपाण्याशी संबंधित तक्रारींची दखल एक ते आठ दिवसांमध्ये घेणे अपेक्षित आहे. मात्र या तक्रारींचे निराकरण करण्यात पालिका सरासरी १६ दिवस लावत असल्याचे प्रजा या संस्थेने उघड केले होते. यापैकी सर्वाधिक तक्रारी अंधेरी विभागातून आल्या असून यापैकी ५३ टक्क्यांची अद्याप दखल घेतलेली नाही. >एका दिवसाने प्रगती़़़नागरी समस्या सोडवण्यासाठी २०१४ मध्ये सरासरी १७ दिवस लागले होते. वर्षभरात महापालिकेने यामध्ये प्रगती केली खरी, मात्र एका दिवसाचीच. २०१६मध्ये नागरी समस्या सोडविण्यासाठी सरासरी १६ दिवस लागले आहेत़ >नियम काय सांगतो?पाणी, सांडपाणी आणि कचरा या संबंधित तक्रारींचे निराकरण १ ते ८ या दिवसांमध्ये करणे अपेक्षित आहे. मात्र पालिका सरासरी १६ दिवसांचा कालावधी लावत आहे.187 सेवांबाबत कोणत्याही तक्रारी असल्यास नागरिक त्याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे आपले गाऱ्हाणे मांडू शकतात. यामध्ये आरोग्य, पाणी, रस्ते, कचरा यासंबंधित तक्रारींचा समावेश आहे.2372नागरी तक्रारी अंधेरी विभागातून पालिकेकडे आल्या होत्या. यापैकी ५३ टक्के तक्रारींवर सुनावणी नाही.