शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

नागरी तक्रारींवर पालिका उदासीन

By admin | Updated: May 14, 2017 01:23 IST

नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन तक्रारींचीही वेळेत दखल घेण्यात महापालिका उदासीन असल्याचे समोर आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जलवाहिनी फुटली आहे, गटार वाहतेय, अतिक्रमणाचा त्रास आहे, अशा सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन तक्रारींचीही वेळेत दखल घेण्यात महापालिका उदासीन असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत मुंबईकरांकडून आलेल्या तक्रारींपैकी निम्म्यांवर अद्याप कोणतीच पावले उचलण्यात आलेली नाहीत. यामुळे स्थानिक नागरिक मात्र हैराण आहेत.प्रजा फाउंडेशनमार्फत गेल्या महिन्यात महापालिकेच्या कारभारावर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये नागरी तक्रारींची दखल घेण्यात पालिका कमी पडत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. महिन्याभरानंतरही यात सुधारणा झालेली नाही, असे दिसून येत आहे. जानेवारी ते एप्रिल २०१७ या चार महिन्यांत महापालिकेकडे २८ हजार २०३ नागरी तक्रारी दाखल झाल्या होत्या. यापैकी जेमतेम १४ हजार तक्रारींची दखल घेऊन पालिकेने त्यावर कारवाई केली आहे.या तक्रारींमध्ये अतिक्रमण, जलवाहिनी व मलनि:सारण वाहिनींशी संबंधित तक्रारींचा समावेश आहे. नियमानुसार पाणी, कचरा आणि सांडपाण्याशी संबंधित तक्रारींची दखल एक ते आठ दिवसांमध्ये घेणे अपेक्षित आहे. मात्र या तक्रारींचे निराकरण करण्यात पालिका सरासरी १६ दिवस लावत असल्याचे प्रजा या संस्थेने उघड केले होते. यापैकी सर्वाधिक तक्रारी अंधेरी विभागातून आल्या असून यापैकी ५३ टक्क्यांची अद्याप दखल घेतलेली नाही. >एका दिवसाने प्रगती़़़नागरी समस्या सोडवण्यासाठी २०१४ मध्ये सरासरी १७ दिवस लागले होते. वर्षभरात महापालिकेने यामध्ये प्रगती केली खरी, मात्र एका दिवसाचीच. २०१६मध्ये नागरी समस्या सोडविण्यासाठी सरासरी १६ दिवस लागले आहेत़ >नियम काय सांगतो?पाणी, सांडपाणी आणि कचरा या संबंधित तक्रारींचे निराकरण १ ते ८ या दिवसांमध्ये करणे अपेक्षित आहे. मात्र पालिका सरासरी १६ दिवसांचा कालावधी लावत आहे.187 सेवांबाबत कोणत्याही तक्रारी असल्यास नागरिक त्याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे आपले गाऱ्हाणे मांडू शकतात. यामध्ये आरोग्य, पाणी, रस्ते, कचरा यासंबंधित तक्रारींचा समावेश आहे.2372नागरी तक्रारी अंधेरी विभागातून पालिकेकडे आल्या होत्या. यापैकी ५३ टक्के तक्रारींवर सुनावणी नाही.