शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

नागरी तक्रारींवर पालिका उदासीन

By admin | Updated: May 14, 2017 01:23 IST

नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन तक्रारींचीही वेळेत दखल घेण्यात महापालिका उदासीन असल्याचे समोर आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जलवाहिनी फुटली आहे, गटार वाहतेय, अतिक्रमणाचा त्रास आहे, अशा सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन तक्रारींचीही वेळेत दखल घेण्यात महापालिका उदासीन असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत मुंबईकरांकडून आलेल्या तक्रारींपैकी निम्म्यांवर अद्याप कोणतीच पावले उचलण्यात आलेली नाहीत. यामुळे स्थानिक नागरिक मात्र हैराण आहेत.प्रजा फाउंडेशनमार्फत गेल्या महिन्यात महापालिकेच्या कारभारावर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये नागरी तक्रारींची दखल घेण्यात पालिका कमी पडत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. महिन्याभरानंतरही यात सुधारणा झालेली नाही, असे दिसून येत आहे. जानेवारी ते एप्रिल २०१७ या चार महिन्यांत महापालिकेकडे २८ हजार २०३ नागरी तक्रारी दाखल झाल्या होत्या. यापैकी जेमतेम १४ हजार तक्रारींची दखल घेऊन पालिकेने त्यावर कारवाई केली आहे.या तक्रारींमध्ये अतिक्रमण, जलवाहिनी व मलनि:सारण वाहिनींशी संबंधित तक्रारींचा समावेश आहे. नियमानुसार पाणी, कचरा आणि सांडपाण्याशी संबंधित तक्रारींची दखल एक ते आठ दिवसांमध्ये घेणे अपेक्षित आहे. मात्र या तक्रारींचे निराकरण करण्यात पालिका सरासरी १६ दिवस लावत असल्याचे प्रजा या संस्थेने उघड केले होते. यापैकी सर्वाधिक तक्रारी अंधेरी विभागातून आल्या असून यापैकी ५३ टक्क्यांची अद्याप दखल घेतलेली नाही. >एका दिवसाने प्रगती़़़नागरी समस्या सोडवण्यासाठी २०१४ मध्ये सरासरी १७ दिवस लागले होते. वर्षभरात महापालिकेने यामध्ये प्रगती केली खरी, मात्र एका दिवसाचीच. २०१६मध्ये नागरी समस्या सोडविण्यासाठी सरासरी १६ दिवस लागले आहेत़ >नियम काय सांगतो?पाणी, सांडपाणी आणि कचरा या संबंधित तक्रारींचे निराकरण १ ते ८ या दिवसांमध्ये करणे अपेक्षित आहे. मात्र पालिका सरासरी १६ दिवसांचा कालावधी लावत आहे.187 सेवांबाबत कोणत्याही तक्रारी असल्यास नागरिक त्याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे आपले गाऱ्हाणे मांडू शकतात. यामध्ये आरोग्य, पाणी, रस्ते, कचरा यासंबंधित तक्रारींचा समावेश आहे.2372नागरी तक्रारी अंधेरी विभागातून पालिकेकडे आल्या होत्या. यापैकी ५३ टक्के तक्रारींवर सुनावणी नाही.