शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

महापालिकांमध्ये आता एक वॉर्ड, एक नगरसेवक; पुढील वर्षी 'या' शहरांमध्ये महापालिका निवडणुका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 07:48 IST

municipal corporation: महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर एकल प्रभाग/वॉर्ड रचनेच्या आधारे पालिका निवडणुका घेण्याचे ठरले.

मुंबई : राज्यात पुढील वर्षाच्या सुरुवातीला मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिकसह होणाऱ्या १८ महापालिकांच्या निवडणुका एकल प्रभाग/वॉर्ड रचनेनुसारच होतील, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. त्यानुसार वॉर्डरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. २०११ च्या लोकसंख्येच्या आधारे ही रचना करण्यात येणार आहे. मुंबईत पूर्वीही एकल प्रभाग/वॉर्ड पद्धत होती. मात्र, अन्य महापालिकांमध्ये दोन, तीन किंवा चार वॉर्डांचा एक प्रभाग करून निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी राज्यात भाजपची सत्ता होती आणि या रचनेचा फायदा भाजपला होईल, असा अंदाज बांधून ती रचना करण्यात आली होती. 

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर एकल प्रभाग/वॉर्ड रचनेच्या आधारे पालिका निवडणुका घेण्याचे ठरले. अधिनियमात तशी सुधारणादेखील केली. थेट नगराध्यक्ष व सरपंच निवडणुका फडणवीस सरकारच्या काळात घेण्यात आल्या. तो निर्णयही महाविकास आघाडी सरकारने बदलला व निर्वाचित सदस्यांमधून नगराध्यक्ष, सरपंचांची निवड करण्याचा निर्णय घेतला होता.

पुढील वर्षी या शहरांमध्ये महापालिका निवडणुकामुंबई, नागपूर, पुणे, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मीरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर.

टॅग्स :ElectionनिवडणूकMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका