शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

महापालिकेच्या नोटिसा, पोलिसही सतर्क उल्हासनगरातील फटाक्यांचे दुकाने महापालिकेच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 15:50 IST

याप्रकारने एकच खळबळ उडाली असून फटाक्यांच्या दुकानावर कारवाईचे संकेत महापालिकेने दिले.

सदानंद नाईक

उल्हासनगर: ऐन दसरा-दिवाळीच्या सणासमोर नेहरू चौक व कॅम्प नं-४ च्या मुख्य मार्केट मधिल फटाक्यांचे दुकाने महापालिकेच्या रडारवर येऊन, अग्निशमन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी नोटिसा दिल्या. याप्रकारने एकच खळबळ उडाली असून फटाक्यांच्या दुकानावर कारवाईचे संकेत महापालिकेने दिले.

 उल्हासनगरात जपानी मार्केट,गजानन मार्केट, फर्निचर मार्केट, इलेक्ट्रॉनिक मार्केट, गाऊन मार्केट, जीन्स मार्केट, बॅग मार्केट प्रसिद्ध असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक खरेदी करण्यासाठी शहरात येतात. याच बरोबर फटाक्याच्या दुकानाची संख्या लक्षणीय असून शहराबाहेरील शेकडो नागरिक सणासुदीला फटाके व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी शहरातील होलसेल फटाक्याच्या दुकानाला येतात. बहुतांश फटाक्यांचे दुकाने ही मुख्य मार्केट व रहिवासी भागात असल्याने, अश्या दुकानावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दिवाळी सणाच्या दरम्यान फटाक्याच्या दुकाना बाहेर उघड्यावर फटाक्यांची विक्री सर्रासपणे होत असल्याने, मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नागरिक व्यक्त करीत आहेत. मात्र महापालिका प्रशासन व पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका होते. 

शहरात ठोक विक्रेत्यांचे फटाके दुकान असल्याने, स्वस्त दरात फटाके मिळतात. त्यामुळे सणासुदीला दुकानात नागरिकांची गर्दी बघायला मिळते. महापालिकेचा कायदा व नियम धाब्यावर बसून दुकानदार दुकाना बाहेर उघड्यावर फटाक्यांची विक्री करीत असल्याने, मोठी घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी फटाक्यांच्या दुकानासह रुग्णलाय, कपडे दुकाने, हॉटेल, लोजिंग आदींच्याकडे अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाण पत्र नसणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला. वर्षानुवर्षे ना हरकत प्रमाणपत्र न घेणाऱ्या एका फट्याक्याच्या दुकानाला शुक्रवारी ५० हजाराचा दंड महापालिकेने ठोठावला. तर दिवाळी सणा दरम्यान सर्रासपणे कायदा व व्यवस्था मोडीत काढून फटाक्यांची विक्री करणाऱ्या दुकानावर कायद्याचा बडगा उगारण्याची मागणी होत आहे .

फटाक्यांच्या गोदामाचा शोध सुरू

नेहरू चौक व कॅम्प नं-४ मधील होलसेल फटाक्याच्या दुकांदारांनाची फटाक्यांची गोदामे, शहरातील रहिवासी क्षेत्रात असल्याची चर्चा आहे. मोठा अनर्थ घडण्यापूर्वी फटाक्यांची दुकाने शहरा बाहेर नेण्याची मागणी होत आहे. तसेच फटाक्याच्या दुकानदारांना अप्रत्यक्ष-प्रत्यक्ष राजकीय नेते, महापालिका व पोलीस प्रशासन यांचा आशीर्वाद असल्याने, त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर