शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

जीएसटीमुळे महापालिका लाचार होणार नाहीत

By admin | Updated: August 5, 2016 05:30 IST

(जीएसटी) मुंबईसह राज्यातील महापालिकांना नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारपुढे लाचार होऊ दिले जाणार नाही

मुंबई : संसदेत मंजूर झालेल्या वस्तू व सेवाकर कायद्यामुळे (जीएसटी) मुंबईसह राज्यातील महापालिकांना नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारपुढे लाचार होऊ दिले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.या कायद्याला अनुसरून राज्यात सरकारला कायदा करावा लागणार आहे. त्यामध्ये मुंबईसह अन्य महापालिकांना जकातकर व एलबीटीमध्ये जे नुकसान होणार आहे, ते थेट देण्याची तरतूद केली जाईल. या महापालिकांना राज्य सरकारपुढे लाचार व्हायला लागू नये अशी व्यवस्था कायद्यातच केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. जीएसटी कायद्यामुळे मुंबईसह राज्यातील महापालिकांची आर्थिक स्वायतत्ता जपण्याची मागणी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी केली. केंद्रीय वित्तमंत्री अरूण जेटली यांनी राज्यसभेत सांगितले होते की, मुंबई महापालिकेचे जे नुकसान होणार आहे त्याविषयी त्यांची मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली आहे. मुंबई महापालिकेला जकातीमधून चार हजार कोटी, मालमत्ताकरातून पाच हजार कोटी तर फंजीबल एफएसआयमधून गतवर्षी पाच हजार कोटी मिळाले अशाप्रकारे या मनपाचे उत्पन्न १७ ते २० हजार कोटींचे आहे. मनपाला राज्य सरकारपुढे लाचारी करायवी लागेल का, अशी शंका उपस्थित होत असल्याचे प्रभू म्हणाले. यावर मुंबई तसचे अन्य महापालिकांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)>घटनादुरुस्तीनंतर वस्तू व सेवा कायदा मुंबई तसचे अन्य महापालिकांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. या घटनादुरु स्तीनंतर आता आपल्याला त्या विषयीचा वस्तू व सेवा कायदा करावा लागणार आहे; त्यामध्येच राज्य सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी महापालिकांना त्यापुढे लाचार व्हावे लागू नये यासाठी तरतूद करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.