शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

अपात्रता, अविश्वासाविरुद्ध शासनाकडे दाद मागता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 02:57 IST

महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांना पक्षांतरबंदी कायद्यान्वये अपात्र ठरविण्यात आले तर त्याविरुद्ध राज्य शासनाकडे दाद मागता येईल, अशी तरतूद असलेले विधेयक विधानसभेत आज एकमताने मंजूर करण्यात आले.

विशेष प्रतिनिधीमुंबई : महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांना पक्षांतरबंदी कायद्यान्वये अपात्र ठरविण्यात आले तर त्याविरुद्ध राज्य शासनाकडे दाद मागता येईल, अशी तरतूद असलेले विधेयक विधानसभेत आज एकमताने मंजूर करण्यात आले.पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदीनुसार आयुक्त किंवा जिल्हाधिकाºयांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्याला अपात्र ठरवल्यास या निर्णयावर ३० दिवसांच्या आत राज्य सरकारकडे अपील दाखल करण्याची संधी देणारे महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अधिनियम १९८६ मध्ये सुधारणा विधेयक आज ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत सादर केले. ग्राम पंचायत सदस्यांना त्यांच्या अपात्रतेविरुद्ध सरकारकडे दाद मागण्याची मुभा आधीपासूनच कायद्याद्वारे आहे. या विधेयकातील तरतुदीला विरोधी पक्षाने विरोध दर्शविला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विधेयकातील ही सुधारणा लोकशाहीचा गळा घोटणारी आहे. हे विधेयक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांवर राजकीय दबाव निर्माण करणारे आणि पक्षांतरास उत्तेजन देणारे आहे. सोयीच्या माणसांचा सरकारला बचाव करता येईल आणि मर्जीत नसलेल्यांना अपात्र ठरविता येईल, अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली. मंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झालेल्या विरोधकांनी या विधेयकावर मतदान घेण्याची मागणी केली. मतदानासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार आग्रही असतानाही विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आवाजी मतदानाने विधेयक मंजूर झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार संतापले. आपले आसन सोडून त्यांनी अध्यक्षांच्या दिशेने धाव घेतली. विधेयकावर मतदान का घेतले नाही, असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे बागडे यांना विधेयकावर मतदान घ्यावे लागले.सदस्याला अपात्र ठरवल्यास या निर्णयावर ३० दिवसांच्या आत राज्य सरकारकडे अपील दाखल करण्याची संधी देणारे महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अधिनियम १९८६ मधील सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले. हे विधेयक मंजूर करताना विरोधकांच्या आग्रहामुळे मतदान घ्यावे लागले. अखेर ८७ विरुद्ध ३४ मतांनी हे विधेयक संमत झाले.मतदानासाठी बेल वाजल्यानंतर सदस्यांना सभागृहात आणण्यासाठी सत्ताधारी पक्षाची चांगलीच तारांबळ उडाली.पंकजा मुंडे यांनी आपल्या उत्तरात विरोधी पक्षाचे आक्षेप खोडून काढले. त्या म्हणाल्या की, लोकांमधून निवडून आलेल्यांना त्यांच्या अपात्रतेविरुद्ध शासनाकडे दाद मागण्याचा अधिकार याद्वारे मिळवून दिला जात आहे. मंत्रालयात होणारे निर्णय पूर्वग्रहदूषितच असतील, असे मानणे योग्य नाही. कायदे मोडण्याचा दीर्घ अनुभव असलेल्या विरोधकांनी आमच्यावर टीका न केलेलीच बरी.