शहरं
Join us  
Trending Stories
1
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
2
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
3
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
4
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
5
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
6
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
7
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
8
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
9
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
10
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
11
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
12
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
13
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
14
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
15
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
17
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
18
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
19
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

अपात्रता, अविश्वासाविरुद्ध शासनाकडे दाद मागता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 02:57 IST

महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांना पक्षांतरबंदी कायद्यान्वये अपात्र ठरविण्यात आले तर त्याविरुद्ध राज्य शासनाकडे दाद मागता येईल, अशी तरतूद असलेले विधेयक विधानसभेत आज एकमताने मंजूर करण्यात आले.

विशेष प्रतिनिधीमुंबई : महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांना पक्षांतरबंदी कायद्यान्वये अपात्र ठरविण्यात आले तर त्याविरुद्ध राज्य शासनाकडे दाद मागता येईल, अशी तरतूद असलेले विधेयक विधानसभेत आज एकमताने मंजूर करण्यात आले.पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदीनुसार आयुक्त किंवा जिल्हाधिकाºयांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्याला अपात्र ठरवल्यास या निर्णयावर ३० दिवसांच्या आत राज्य सरकारकडे अपील दाखल करण्याची संधी देणारे महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अधिनियम १९८६ मध्ये सुधारणा विधेयक आज ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत सादर केले. ग्राम पंचायत सदस्यांना त्यांच्या अपात्रतेविरुद्ध सरकारकडे दाद मागण्याची मुभा आधीपासूनच कायद्याद्वारे आहे. या विधेयकातील तरतुदीला विरोधी पक्षाने विरोध दर्शविला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विधेयकातील ही सुधारणा लोकशाहीचा गळा घोटणारी आहे. हे विधेयक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांवर राजकीय दबाव निर्माण करणारे आणि पक्षांतरास उत्तेजन देणारे आहे. सोयीच्या माणसांचा सरकारला बचाव करता येईल आणि मर्जीत नसलेल्यांना अपात्र ठरविता येईल, अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली. मंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झालेल्या विरोधकांनी या विधेयकावर मतदान घेण्याची मागणी केली. मतदानासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार आग्रही असतानाही विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आवाजी मतदानाने विधेयक मंजूर झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार संतापले. आपले आसन सोडून त्यांनी अध्यक्षांच्या दिशेने धाव घेतली. विधेयकावर मतदान का घेतले नाही, असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे बागडे यांना विधेयकावर मतदान घ्यावे लागले.सदस्याला अपात्र ठरवल्यास या निर्णयावर ३० दिवसांच्या आत राज्य सरकारकडे अपील दाखल करण्याची संधी देणारे महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अधिनियम १९८६ मधील सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले. हे विधेयक मंजूर करताना विरोधकांच्या आग्रहामुळे मतदान घ्यावे लागले. अखेर ८७ विरुद्ध ३४ मतांनी हे विधेयक संमत झाले.मतदानासाठी बेल वाजल्यानंतर सदस्यांना सभागृहात आणण्यासाठी सत्ताधारी पक्षाची चांगलीच तारांबळ उडाली.पंकजा मुंडे यांनी आपल्या उत्तरात विरोधी पक्षाचे आक्षेप खोडून काढले. त्या म्हणाल्या की, लोकांमधून निवडून आलेल्यांना त्यांच्या अपात्रतेविरुद्ध शासनाकडे दाद मागण्याचा अधिकार याद्वारे मिळवून दिला जात आहे. मंत्रालयात होणारे निर्णय पूर्वग्रहदूषितच असतील, असे मानणे योग्य नाही. कायदे मोडण्याचा दीर्घ अनुभव असलेल्या विरोधकांनी आमच्यावर टीका न केलेलीच बरी.