शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

जलपर्यटनाकडे मुंबईकरांचा वाढतोय कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 07:10 IST

मुंबई बंदर : दहा महिन्यांत दोन लाख ३२ हजार जणांचा क्रुझद्वारे जलप्रवास

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जलपर्यटनाच्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, मुंबई बंदरात येणाऱ्या विविध अत्याधुनिक जहाजांमुळे मुंबईकरांचा जलप्रवासाला जाण्याचा कल दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. यंदा जानेवारीपासून आतापर्यंत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय जहाजांद्वारे जलपर्यटनासाठी दोन लाख ३२ हजार प्रवाशांनी मुंबई बंदरातून प्रवास केला आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी मुंबई बंदरातून क्रुझ पर्यटनाला चालना मिळावी व जलपर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांची संख्या वाढावी, यासाठी प्रयत्न केले आहेत. या वर्षी २५५ देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासी जहाजांचे मुंबई बंदरात आगमन झाले होते व त्यांनी येथून पुढील प्रवासाला प्रारंभ केला. २०१७ मध्ये ही संख्या ४६ होती व २०१८ मध्ये त्यामध्ये भर पडून १०६ जहाजे मुंबईत आली होती. क्रुझद्वारे पर्यटनाला आलेल्या व येथून जाणाºया प्रवाशांची संख्या २०१७च्या ५६ हजारांवरून २०१८ मध्ये ८७ हजारांवर गेली होती. सातत्याने या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलचे काम वेगात सुरू असून, येत्या दोन वर्षांत त्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.पुढील आठवड्यात मुंबई ते सुरत जहाज सेवामुंबई ते सूरत जाण्यासाठी नवीन जहाज सेवा पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. सध्या मुंबई ते गोवा मार्गावर जहाज सेवा उपलब्ध असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मुंबई सुरत मार्गावर जहाज सेवा सुरू करण्यात येणार आहे. गोवाला जाणारी जहाजे सध्या भाऊचा धक्का येथील डोमॅस्टिक क्रुझ टर्मिनल येथून सुटतात, तर सुरत जाणारे जहाज वांद्रे वरळी सी लिंक येथून सुटेल व दुसºया दिवशी सुरतजवळील हजिरा बंदरात पोहोचेल.५८ हजार प्रवाशांनी केला आंतरराष्ट्रीय प्रवासजलपर्यटन करणाºया अडीच लाख प्रवाशांमध्ये ५८ हजार आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा समावेश आहे. २०१५-१६ मध्ये ही संख्या ३८ हजार होती. देशभरातील मुंबई, चेन्नई, कोचिन, नवीन मंगळुरू व मार्मागोवा या बंदरावर १२८ आंतरराष्ट्रीय जहाजे आली होती. यंदा त्यामध्ये भर पडून १५७ आंतरराष्ट्रीय जहाजांचे आगमन झाले.येत्या काळात १० लाख जणांचा जलप्रवास!मुंबई पोर्ट ट्रस्टने जहाज प्रवासाला चालना मिळण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याने या सेवांमध्ये वाढ होत आहेत. २०२५पर्यंत मुंबईत १ हजार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जहाजे येतील व त्याद्वारे १० लाख जण प्रवास करतील, असा विश्वास अधिकाºयांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई