शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

जलपर्यटनाकडे मुंबईकरांचा वाढतोय कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 07:10 IST

मुंबई बंदर : दहा महिन्यांत दोन लाख ३२ हजार जणांचा क्रुझद्वारे जलप्रवास

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जलपर्यटनाच्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, मुंबई बंदरात येणाऱ्या विविध अत्याधुनिक जहाजांमुळे मुंबईकरांचा जलप्रवासाला जाण्याचा कल दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. यंदा जानेवारीपासून आतापर्यंत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय जहाजांद्वारे जलपर्यटनासाठी दोन लाख ३२ हजार प्रवाशांनी मुंबई बंदरातून प्रवास केला आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी मुंबई बंदरातून क्रुझ पर्यटनाला चालना मिळावी व जलपर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांची संख्या वाढावी, यासाठी प्रयत्न केले आहेत. या वर्षी २५५ देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासी जहाजांचे मुंबई बंदरात आगमन झाले होते व त्यांनी येथून पुढील प्रवासाला प्रारंभ केला. २०१७ मध्ये ही संख्या ४६ होती व २०१८ मध्ये त्यामध्ये भर पडून १०६ जहाजे मुंबईत आली होती. क्रुझद्वारे पर्यटनाला आलेल्या व येथून जाणाºया प्रवाशांची संख्या २०१७च्या ५६ हजारांवरून २०१८ मध्ये ८७ हजारांवर गेली होती. सातत्याने या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलचे काम वेगात सुरू असून, येत्या दोन वर्षांत त्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.पुढील आठवड्यात मुंबई ते सुरत जहाज सेवामुंबई ते सूरत जाण्यासाठी नवीन जहाज सेवा पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. सध्या मुंबई ते गोवा मार्गावर जहाज सेवा उपलब्ध असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मुंबई सुरत मार्गावर जहाज सेवा सुरू करण्यात येणार आहे. गोवाला जाणारी जहाजे सध्या भाऊचा धक्का येथील डोमॅस्टिक क्रुझ टर्मिनल येथून सुटतात, तर सुरत जाणारे जहाज वांद्रे वरळी सी लिंक येथून सुटेल व दुसºया दिवशी सुरतजवळील हजिरा बंदरात पोहोचेल.५८ हजार प्रवाशांनी केला आंतरराष्ट्रीय प्रवासजलपर्यटन करणाºया अडीच लाख प्रवाशांमध्ये ५८ हजार आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा समावेश आहे. २०१५-१६ मध्ये ही संख्या ३८ हजार होती. देशभरातील मुंबई, चेन्नई, कोचिन, नवीन मंगळुरू व मार्मागोवा या बंदरावर १२८ आंतरराष्ट्रीय जहाजे आली होती. यंदा त्यामध्ये भर पडून १५७ आंतरराष्ट्रीय जहाजांचे आगमन झाले.येत्या काळात १० लाख जणांचा जलप्रवास!मुंबई पोर्ट ट्रस्टने जहाज प्रवासाला चालना मिळण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याने या सेवांमध्ये वाढ होत आहेत. २०२५पर्यंत मुंबईत १ हजार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जहाजे येतील व त्याद्वारे १० लाख जण प्रवास करतील, असा विश्वास अधिकाºयांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई