शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

जलपर्यटनाकडे मुंबईकरांचा वाढतोय कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 07:10 IST

मुंबई बंदर : दहा महिन्यांत दोन लाख ३२ हजार जणांचा क्रुझद्वारे जलप्रवास

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जलपर्यटनाच्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, मुंबई बंदरात येणाऱ्या विविध अत्याधुनिक जहाजांमुळे मुंबईकरांचा जलप्रवासाला जाण्याचा कल दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. यंदा जानेवारीपासून आतापर्यंत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय जहाजांद्वारे जलपर्यटनासाठी दोन लाख ३२ हजार प्रवाशांनी मुंबई बंदरातून प्रवास केला आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी मुंबई बंदरातून क्रुझ पर्यटनाला चालना मिळावी व जलपर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांची संख्या वाढावी, यासाठी प्रयत्न केले आहेत. या वर्षी २५५ देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासी जहाजांचे मुंबई बंदरात आगमन झाले होते व त्यांनी येथून पुढील प्रवासाला प्रारंभ केला. २०१७ मध्ये ही संख्या ४६ होती व २०१८ मध्ये त्यामध्ये भर पडून १०६ जहाजे मुंबईत आली होती. क्रुझद्वारे पर्यटनाला आलेल्या व येथून जाणाºया प्रवाशांची संख्या २०१७च्या ५६ हजारांवरून २०१८ मध्ये ८७ हजारांवर गेली होती. सातत्याने या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलचे काम वेगात सुरू असून, येत्या दोन वर्षांत त्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.पुढील आठवड्यात मुंबई ते सुरत जहाज सेवामुंबई ते सूरत जाण्यासाठी नवीन जहाज सेवा पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. सध्या मुंबई ते गोवा मार्गावर जहाज सेवा उपलब्ध असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मुंबई सुरत मार्गावर जहाज सेवा सुरू करण्यात येणार आहे. गोवाला जाणारी जहाजे सध्या भाऊचा धक्का येथील डोमॅस्टिक क्रुझ टर्मिनल येथून सुटतात, तर सुरत जाणारे जहाज वांद्रे वरळी सी लिंक येथून सुटेल व दुसºया दिवशी सुरतजवळील हजिरा बंदरात पोहोचेल.५८ हजार प्रवाशांनी केला आंतरराष्ट्रीय प्रवासजलपर्यटन करणाºया अडीच लाख प्रवाशांमध्ये ५८ हजार आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा समावेश आहे. २०१५-१६ मध्ये ही संख्या ३८ हजार होती. देशभरातील मुंबई, चेन्नई, कोचिन, नवीन मंगळुरू व मार्मागोवा या बंदरावर १२८ आंतरराष्ट्रीय जहाजे आली होती. यंदा त्यामध्ये भर पडून १५७ आंतरराष्ट्रीय जहाजांचे आगमन झाले.येत्या काळात १० लाख जणांचा जलप्रवास!मुंबई पोर्ट ट्रस्टने जहाज प्रवासाला चालना मिळण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याने या सेवांमध्ये वाढ होत आहेत. २०२५पर्यंत मुंबईत १ हजार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जहाजे येतील व त्याद्वारे १० लाख जण प्रवास करतील, असा विश्वास अधिकाºयांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई