शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

मुंबईच्या निकालाचा टक्का घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 02:48 IST

बारावीच्या निकालात मुंबई विभागीय मंडळाच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या यंदा एका टक्क्याने घटली आहे. यंदा मुंबईचा निकाल ८७.४४ टक्के लागला आहे.

मुंबई : बारावीच्या निकालात मुंबई विभागीय मंडळाच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या यंदा एका टक्क्याने घटली आहे. यंदा मुंबईचा निकाल ८७.४४ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी तो ८८.२१ टक्के इतका होता. राज्याच्या निकालात मुंबई चौथ्या क्रमांकावर गेली आहे.मुंबईतून एकूण ३ लाख ११ हजार ८८८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील २लाख ७२ हजार ५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ३८ हजार २१४ विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन मिळाले आहे. यामध्ये ९० टक्कयांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २ हजार २८८ इतकी आहे. पुनर्परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांचा टक्का ही यंदा घसरला आहे. मागील वर्षी तो ४४. २६ टक्के इतका होता, तर यंदा तो ३७.१३ टक्के इतकाच लागला आहे. मुंबई विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि खासगीरीत्या परीक्षा देण्याचे प्रमाण वाढल्याने मुंबईच्या एकूण निकालाला फटका बसला असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.मात्र, विज्ञान शाखेत उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांची संख्या यंदा वाढली आहे. विज्ञान शाखेच्या निकालात १ टक्क्याने वाढ झाली आहे. कला शाखेच्या निकालात २ टक्क्यांनी घसरण पाहायला मिळत असून, वाणिज्य शाखेच्या निकालातही १ टक्क्यांची घसरण झाली आहे. व्होकेशनलचा निकाल यंदा ८९. १५ टक्के इतका लागला आहे.मुंबईच्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता ती अव्वल आलेल्या कोकण विभागापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. कोकणातील एकूण विद्यार्थींसंख्या ही मुंबईतील खाजगीरीत्या प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या आसपास आहे. खासगीरित्या प्रविष्ट विद्यार्थ्यांमध्ये नापास विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त असते. ऐनवेळी परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांची संख्या ही मुंबई विभागात मोठी असते. त्यामुळे मुंबईच्या निकालाचा टक्का घसरला असल्याची माहिती मुंबई विभागाचे अध्यक्ष डॉ सुभाष बोरसे यांनी दिली.३०६ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्केमुंबईतील तब्बल ३०६ महाविद्यालयांचा निकाल हा १०० टक्के लागला असल्याची माहिती ही विभागीय शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. शहरातील ३ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.यंदा तपासणीवर कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेकडून बहिष्कार टाकण्यात आला होता. मात्र तरीही मंडळाला बारावीचा निकाल वेळेवर लावण्यात मिळाले आहे. त्याचसोबत कॉपी प्रकरणांना आळा घालण्यातही मंडळाने चांगली कामगिरी बजावली आहे.बारावी परीक्षेत यंदा पहिल्यांदाच उत्तरपत्रिका व पुरवण्या यांची अदलाबदल होऊ नये यासाठी सर्व उत्तरपत्रिका व पुरवण्यांच्या सर्व पानांवर बारकोडची छपाई करण्यात आली होती.यंदा प्रथमच पुणे विभागीय मंडळ कार्यक्षेत्रातून बारावीची परीक्षा देणाºया सर्व विद्यार्थ्यांना प्रायोगिक तत्त्वावर आॅनलाइन हॉल तिकिट उपलब्ध करून देण्यात आले होते.माहिती तंत्रज्ञान (विज्ञान, कला व वाणिज्य) व सामान्य ज्ञान (सैनिकी शाळा) या विषयांची परीक्षा आॅनलाइन पद्धतीने घेण्यात आली.परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी परीक्षेचे वेळापत्रक तयार करताना लेखी परीक्षेच्या दरम्यान किमान एका दिवसाचा खंड ठेवण्यात आला.प्रश्नपत्रिकेचे वाचन करून आकलन होण्यासाठी परीक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्यात आली.दोन हजार महाविद्यालये शंभर नंबरीपुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फेघेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत २ हजार ३०१ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे, तर ४८ महाविद्यालयांना भोपळाही फोडता आलेला नाही. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर वकोकण या ९ विभागांमधून १४लाख १६ हजार ९८६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.यामध्ये राज्याचा विज्ञान शाखेचा निकाल ९५.८५, कला शाखेचा ७८.९३, वाणिज्य शाखेचा ८९.५० तर व्यवसाय अभ्यासक्रमाचा ८८.४१ टक्के निकाल लागला आहे. शंभर टक्के निकाल लागणाºया महाविद्यालयांची संख्या मोठी असून, विज्ञान शाखेत पुणे विभागातील ३०८, कला शाखेत औरंगबादमधील ५६, वाणिज्य शाखेत पुन्हा पुणे विभागातील १२७ तर व्यावसायिक अभ्यासक्रमात मुंबई विभागातील १५ महाविद्यालयांचा समावेश होतो.डिसेंबर महिन्यापासून अभ्यासाला सुरुवात केली. त्याचे फलीत झाले व ७९़३८ टक्के मिळाले़ तसेच प्रत्येक विषयासाठी एक ते दीड तास वेळ देत होतो. आता पुढे बीए व एलएलबीमध्ये शिक्षण घ्यायचे आहे. - फैजाल अन्वर रिझवान खान, स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज, चेंबूर. पुढील शिक्षणात मला कॉमर्स शाखेत पदवी घ्यायची आहे. मला कॉमर्समध्ये शिकताना अनेक समस्या आल्या. परंतु त्या समस्यांवर मात करुन ७० टक्के पडले. त्यामुळे कॉमर्सची पदवी घेऊन पुढे सीए बँकींग करायचे आहे. - ललिता पवार, आर. ए. पोद्दार कॉलेज आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकोनॉमिक्स, माटुंगा.अंपग असल्याने अभ्यासाबरोबर मला माझी तब्बेत सुद्दा सांभाळायची होती. परंतु माझ्या कॉलेजने मला अभ्यासासाठी खुप मदत केली व ६७़०७ टक्के मिळाले़ पुढील शिक्षण घेऊन मला डॉक्टर बनायचे आहे. - अक्सा निसार पठान, स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज, चेंबूर.वझे-केळकर कॉलेजमधून आर्टस् शाखेतून बारावीत ८७.७९ टक्के मिळवले. अंधत्वावर मात करुन यश मिळविल्यामुळे सर्वांनाकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे. आई-वडील भुवनेश्वर येथे राहतात आणि मी मामा-मामी यांच्याकडे राहत आहे.- श्रीकांत राठी, वझे-केळकर कॉलेज कुटुंबाचे सहकार्य आणि कॉलेजमधून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे सायन्स शाखेतून ९६.१५ टक्के मिळवले आहेत. नवनीत ज्युनिअर कॉलेजमधून शिकत असताना अनेकांचे मार्गदर्शन मिळाले. आता पुढे इंजिनिअरकडे कल आहे.- मानसी सारस्वत, नवनीत ज्युनिअर कॉलेज वझे-केळकर कॉलेजमधून सायन्स विभागातून ८६ टक्के मिळविले आहेत. आई-वडील, कॉलेजचा संपूर्ण स्टाफने अभ्यासाबाबतची संपूर्ण मदत केली. प्रत्येकाने वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळे आता हे यश मिळविले आहे. आता पुढे अर्थशास्त्र विषयात- धु्रव शिरपूरकर, वझे-केळकर कॉलेजसर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात पुढील प्रगतीसाठी आता अधिक संधी उपलब्ध झाली आहे, जेणेकरुन या विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर यशस्वीरित्या घडविता येईल. हा निकाल म्हणजे अंतिम निकाल नाही.नव्या जोमाने परीक्षेची तयारी करा आणि फेरपरीक्षेत यशस्वी व्हा.- विनोद तावडे, शिक्षणमंत्री