शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

मेट्रो दरवाढीपासून मुंबईकरांना दिलासा

By admin | Updated: July 7, 2014 19:23 IST

मुंबई मेट्रोसाठी रिलायन्सने केलेली दरवाढ लागू करण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. हायकोर्टाने रिलायन्सने सुचवलेल्या दरवाढीमध्ये कपात करत हे दर १०, १५ आणि २० रुपयांवर आणले आहेत.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. ७- मुंबई मेट्रोसाठी रिलायन्सने केलेली दरवाढ लागू करण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. हायकोर्टाने रिलायन्सने सुचवलेल्या दरवाढीमध्ये कपात करत हे दर १०, १५ आणि २० रुपयांवर आणले आहेत. हे दर ३० जूलैपर्यंत लागू राहणार असून तोपर्यंत सरकराने दरनिश्चितीसंदर्भात समिती नेमून तातडीने अहवाल द्यावा असे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत. 
मुंबई मेट्रोच्या उद्घाटनानंतर रिलायन्सने मेट्रोच्या तिकीटदरांमध्ये भरभक्कम भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार घाटकोपर ते अंधेरी - वर्सोवा या मार्गावर तिकीटाचे दर किमान १० ते कमाल ४० रुपयांपर्यंत पोहोचणार होते. या भाडेवाढीचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसणार होता. या भाडेवाढीविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली. या याचिकेवर सोमवारी दुपारी सुनावणी झाली. यात हायकोर्टाने रिलायन्सची प्रस्तावित दरवाढ लागू करण्यास नकार दिला. मात्र प्रकल्पाचा वाढीव खर्च आणि देखभालीसाठी कोर्टाने किरकोळ दरवाढ करण्यास तयारी दर्शवली. यानुसार ० ते ३ किमीसाठी १० रुपये, ३ ते ८ किमीसाठी १५ तर त्यापुढील अंतरासाठी २० रुपये आकारण्यास कोर्टाने परवानगी दिली. 
३० जूलैपर्यंत हे दर लागू राहणार असून या संदर्भातील पुढील सुनावणी  २४ जुलैरोजी होणार आहे. राज्य सरकारने मेट्रोच्या दरनिश्चितीसाठी समिती नेमून तातडीने अहवाल द्यावा असेही हायकोर्टाने म्हटले आहे. या निर्णयामुळे मेट्रो प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहणार आहे.