शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांच्या जतच्या राजारामबापू पाटील कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदललं, पडळकर -पाटील वाद पेटणार?
2
भारतानेही ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरून रशियन तेल खरेदी कमी केले; अमेरिकेचा पुन्हा दावा
3
Phaltan Crime: संबंधित पोलिसांना निलंबित करा, महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश
4
भुजबळांचा जामीन रद्द करुन मंत्रिमंडळातून बाहेर काढा; जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
5
Satara Crime: चार वेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
6
बसखाली बाईक अडकली, आग उसळली, दरवाजे उघडेनात... २० प्रवाशांचा जळून मृत्यू! नेमकं काय घडलं?
7
टाटा ट्रस्टमधील वाद लवकरच संपणार? मेहली मिस्त्रींसाठी नवी ऑफर, समूहात वर्चस्व वाढणार
8
IND vs AUS: रोहित शर्मा होणार 'षटकारांचा राजा', आफ्रिदीचा विश्वविक्रम मोडण्यापासून 'इतका' दूर!
9
Satara Crime: "...तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही"; विजय वडेट्टीवार यांचे ट्विट
10
'शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो, हेच आता बघतो...', जरांगे पाटलांचा हल्लाबोल
11
PSI सोबतची 'ती' दुसरी व्यक्ती कोण? डॉक्टरने हातावर लिहिलेल्या 'त्या' नावाची ओळख उघड
12
पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी PSI चा दबाव; विरोध केल्याने महिला डॉक्टरचा सुरु होता छळ, शेवटी...
13
रोहित शर्माला मिडिया फोटोसाठी हाक मारताच गौतम गंभीर म्हणाला, "फोटो काढून घे, सगळ्यांना..."
14
सौदी-पाकिस्तानच्या अणु करारामुळे भारताचा मित्र असणारा मुस्लिम देश संतापला! मनधरणी करायला पाकचे सेना प्रमुख रवाना
15
आशियात नव्या युद्धाची चाहूल; किम जोंगच्या सैनिकांवर दक्षिण कोरियाचा गोळीबार, कारण काय..?
16
ग्लोव्ह्ज कापून काढले, सलाईन लावताना सुई मोडली! तिलक वर्मानं केलाय 'या' जीवघेण्या आजाराचा सामना
17
Carbide Gun : दिवाळीच्या आनंदावर विरजण! ३०० जणांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत; 'कार्बाइड गन' आहे तरी काय?
18
'बिग बॉस'मध्ये प्रणित मोरेचा पुन्हा कॉमेडी शो, सदस्यांना खळखळून हसवलं; नेटकरी म्हणतात...
19
आयडियाची कल्पना! सिगारेटचं व्यसन सोडण्यासाठी लढवली शक्कल; डोकं केलं पिंजऱ्यात बंद
20
Phaltan Crime: महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? आयुष्य संपविण्यापूर्वी ती तिथे कशी पोहोचली? 

मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ ‘क्रॅश’

By admin | Updated: June 15, 2016 03:19 IST

तेरावी प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाने आॅनलाईन प्रवेश पूर्व नोंदणी अनिवार्य केली आहे. पण प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी (१४ जून) विद्यापीठाचे संकेतस्थळ क्रॅश (तांत्रिक बिघाड)

मुंबई: तेरावी प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाने आॅनलाईन प्रवेश पूर्व नोंदणी अनिवार्य केली आहे. पण प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी (१४ जून) विद्यापीठाचे संकेतस्थळ क्रॅश (तांत्रिक बिघाड) झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.मुंबई विद्यापीठातर्फे तेरावी प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश पूर्व नोंदणी अनिवार्य केली आहे. मंगळवारी या प्रवेश प्रक्रियेचा पहिला दिवस होता. पण प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी संकेतस्थळ क्रॅश झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नोंदणी करता आली नाही. सकाळी १०.३० वाजता प्रवेशप्रक्रिया सुरु होणार होती. त्यानुसार संकेतस्थळावर नोंदणी सुरु करण्यात आली. परंतु एकाच वेळी लाखो विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाला भेट दिल्यामुळे विद्यापीठाचे संकेतस्थळ क्रॅश झाले. यात सर्व्हरवर मोठा ताण आला. झाला प्रकार लक्षात आल्यानंतर प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी अधिक सर्व्हर लावण्याचे काम विद्यापीठ स्तरावर सुरु असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली. सकाळी प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यानंतर काही वेळ संकेतस्थळ सुरु होण्यास अडथळा निर्माण होत होता. मात्र त्यानंतर संकेतस्थळ क्रॅश झाले. हा गोंधळ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहिल्याने विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी आॅनलाईन प्रवेश पूर्व नोंदणी करता आली नाही. शिवाय नोंदणीचा एक दिवस वाया गेल्याने प्रवेशपूर्व नोंदणीत वाढ करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या प्रकरणी विद्यापीठाच्या व्यवस्थापन माजी सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनावर टीकेची झोड उठविली आहे. उशीरा सुरु होणारी प्रक्रिया त्यातच संकेतस्थळाचा गोंधळ यामुळे विद्यार्थ्यांवर प्रवेशाचे दडपण आले आहे. प्रवेशासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी संकेतस्थळाला भेट देणार हे माहित असताना आधीच सर्व्हर का वाढवले नाही?असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)‘हेल्पलेस’ हेल्पलाईननोंदणी प्रक्रियेतील समस्यांचे निराकरण करण्यासाठी विद्यापीठाने हेल्पलाईन सुरु केल्या आहेत. पण ऐन गोंधळाच्या वेळी या हेल्पलाईनदेखील ‘हेल्पलेस’ ठरल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.प्रथमवर्ष पदवीच्या प्रवेशपूर्व नोंदणीला मंगळवारी सकाळी १०.३० वाजता सुरुवात झाली. आतापर्यंत ३० हजार विद्यार्थ्यांनी यशस्वी अर्ज केले आहेत. सकाळी संकेतस्थळ सुरु झाल्यापासून जवळपास सव्वा लाख विद्यार्थ्यांनी एकाचवेळी प्रवेश अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळाला भेट दिल्याने संकेतस्थळ काही काळ धीम्या गतीने चालत होते. मात्र त्यानंतर ही प्रक्रिया सुरळीत सुरु झाली. ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत चालू राहण्यासाठी १२ सर्व्हर कार्यान्वित करण्यात आले, अजून ५ अतिरिक्त डेडिकेटेड सर्व्हर लावण्यात येत आहेत. प्रवेशपूर्व नोंदणीची ही प्रक्रिया २४ तास कार्यान्वित राहिल.- लीलाधर बन्सोड, उपकुलसचिव, जनसंपर्क विभाग