शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

मुंबई, ठाण्यात पावसाची संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 13:05 IST

मुंबई शहर आणि उपनगरात काल रात्रीपासूनच पावसाने जोर पकडला आहे. मुंबईसह शेजारच्या ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये पावसाची संततधार कायम आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 22 -  मुंबई शहर आणि उपनगरात काल रात्रीपासूनच पावसाने जोर पकडला आहे. मुंबईसह शेजारच्या ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये पावसाची संततधार कायम आहे. अधन-मधन पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पावासमुळे रस्ते वाहतूकीचा वेग मंदावला असला तरी, रस्ते किंवा रेल्वे वाहतूक कोलमडलेली नाही. मुंबई शहर किंवा उपनगरात कुठेही पाणी तुंबलेले नाही. 
आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास समुद्राला भरती येणार असल्याने समुद्रकिनारी किना-यावर धडकणा-या लाटांचा आनंद घेण्यासाठी जाणा-या नागरीकांना पालिका प्रशासनाकडून सर्तकतेचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी समुद्रात 4.62 मीटर उंचीच्या लाटा उसळणार होत्या. 
 
पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, तिथे काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. 
 
अहमदनगर - भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील रतनवाडीला अतिवृष्टीचा तडाखा तब्बल ३०६मिमी पाऊस कोसळला,  भंडारदरा धरण 80 टक्के तर निळवंडे धरण 50 टक्के भरले. पांजरे,घाटघर,भंडारदरा,वाकी तेथेही मुसळधार पाऊस झाला.
 
नाशिक- जिल्ह्यातील काही भागात पावसाचा जोर कायम आहे. आज सकाळ पासून  दारणा 13980, गंगापूर 1664 भावली 1663 क्युसेक विसर्ग सुरु आहे. 
 
पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीला आला पूर
पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणातून सकाळी 11 वाजल्यापासून  9,500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीला पूर आला आहे. नदीपात्रातील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. 
काल रात्रीपासून 2000 क्यूसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली होती मात्र रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर सकाळी कायम राहिल्याने टप्याटप्याने पाणी सोडण्याचा वेग वाढविण्यात आला. सध्या 9,500हजार क्यूसेक्सने पाणी नदीत येत आहे. 
धरणाचे 11 दरवाजे 1 फुटाने उचलले आहेत. दुपारी 2 वाजता 14,000 कुसेक्सने पाणी सोडले जाणार असल्याने नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. नदी लगतच्या सोसायट्यांमध्येही पाणी शिरण्याची भीती आहे. पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या रहिवाशांना इशारा दिला आहे. नदीपात्रातील रस्ताही पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी येथे गाड्या लावू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.