शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
4
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
5
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
6
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
7
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
8
मुंबईकरांसाठी खुशखबर! एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
9
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
10
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
11
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
12
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
13
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
14
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
15
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
16
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
17
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
18
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
19
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."
20
या कंपनीला AI वरील अहवाल देणे महागात पडले; ऑस्ट्रेलियाला द्यावा लागला भरमसाठ दंड

मुंबई, ठाण्यात पावसाची संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 13:05 IST

मुंबई शहर आणि उपनगरात काल रात्रीपासूनच पावसाने जोर पकडला आहे. मुंबईसह शेजारच्या ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये पावसाची संततधार कायम आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 22 -  मुंबई शहर आणि उपनगरात काल रात्रीपासूनच पावसाने जोर पकडला आहे. मुंबईसह शेजारच्या ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये पावसाची संततधार कायम आहे. अधन-मधन पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पावासमुळे रस्ते वाहतूकीचा वेग मंदावला असला तरी, रस्ते किंवा रेल्वे वाहतूक कोलमडलेली नाही. मुंबई शहर किंवा उपनगरात कुठेही पाणी तुंबलेले नाही. 
आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास समुद्राला भरती येणार असल्याने समुद्रकिनारी किना-यावर धडकणा-या लाटांचा आनंद घेण्यासाठी जाणा-या नागरीकांना पालिका प्रशासनाकडून सर्तकतेचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी समुद्रात 4.62 मीटर उंचीच्या लाटा उसळणार होत्या. 
 
पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, तिथे काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. 
 
अहमदनगर - भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील रतनवाडीला अतिवृष्टीचा तडाखा तब्बल ३०६मिमी पाऊस कोसळला,  भंडारदरा धरण 80 टक्के तर निळवंडे धरण 50 टक्के भरले. पांजरे,घाटघर,भंडारदरा,वाकी तेथेही मुसळधार पाऊस झाला.
 
नाशिक- जिल्ह्यातील काही भागात पावसाचा जोर कायम आहे. आज सकाळ पासून  दारणा 13980, गंगापूर 1664 भावली 1663 क्युसेक विसर्ग सुरु आहे. 
 
पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीला आला पूर
पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणातून सकाळी 11 वाजल्यापासून  9,500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीला पूर आला आहे. नदीपात्रातील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. 
काल रात्रीपासून 2000 क्यूसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली होती मात्र रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर सकाळी कायम राहिल्याने टप्याटप्याने पाणी सोडण्याचा वेग वाढविण्यात आला. सध्या 9,500हजार क्यूसेक्सने पाणी नदीत येत आहे. 
धरणाचे 11 दरवाजे 1 फुटाने उचलले आहेत. दुपारी 2 वाजता 14,000 कुसेक्सने पाणी सोडले जाणार असल्याने नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. नदी लगतच्या सोसायट्यांमध्येही पाणी शिरण्याची भीती आहे. पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या रहिवाशांना इशारा दिला आहे. नदीपात्रातील रस्ताही पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी येथे गाड्या लावू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.