शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मुंबई, ठाण्यात पावसाची संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 13:05 IST

मुंबई शहर आणि उपनगरात काल रात्रीपासूनच पावसाने जोर पकडला आहे. मुंबईसह शेजारच्या ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये पावसाची संततधार कायम आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 22 -  मुंबई शहर आणि उपनगरात काल रात्रीपासूनच पावसाने जोर पकडला आहे. मुंबईसह शेजारच्या ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये पावसाची संततधार कायम आहे. अधन-मधन पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पावासमुळे रस्ते वाहतूकीचा वेग मंदावला असला तरी, रस्ते किंवा रेल्वे वाहतूक कोलमडलेली नाही. मुंबई शहर किंवा उपनगरात कुठेही पाणी तुंबलेले नाही. 
आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास समुद्राला भरती येणार असल्याने समुद्रकिनारी किना-यावर धडकणा-या लाटांचा आनंद घेण्यासाठी जाणा-या नागरीकांना पालिका प्रशासनाकडून सर्तकतेचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी समुद्रात 4.62 मीटर उंचीच्या लाटा उसळणार होत्या. 
 
पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, तिथे काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. 
 
अहमदनगर - भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील रतनवाडीला अतिवृष्टीचा तडाखा तब्बल ३०६मिमी पाऊस कोसळला,  भंडारदरा धरण 80 टक्के तर निळवंडे धरण 50 टक्के भरले. पांजरे,घाटघर,भंडारदरा,वाकी तेथेही मुसळधार पाऊस झाला.
 
नाशिक- जिल्ह्यातील काही भागात पावसाचा जोर कायम आहे. आज सकाळ पासून  दारणा 13980, गंगापूर 1664 भावली 1663 क्युसेक विसर्ग सुरु आहे. 
 
पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीला आला पूर
पावसाचा जोर वाढल्याने खडकवासला धरणातून सकाळी 11 वाजल्यापासून  9,500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीला पूर आला आहे. नदीपात्रातील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. 
काल रात्रीपासून 2000 क्यूसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली होती मात्र रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर सकाळी कायम राहिल्याने टप्याटप्याने पाणी सोडण्याचा वेग वाढविण्यात आला. सध्या 9,500हजार क्यूसेक्सने पाणी नदीत येत आहे. 
धरणाचे 11 दरवाजे 1 फुटाने उचलले आहेत. दुपारी 2 वाजता 14,000 कुसेक्सने पाणी सोडले जाणार असल्याने नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. नदी लगतच्या सोसायट्यांमध्येही पाणी शिरण्याची भीती आहे. पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या रहिवाशांना इशारा दिला आहे. नदीपात्रातील रस्ताही पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी येथे गाड्या लावू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.