शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
2
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
3
हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
5
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
6
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
7
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
8
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
9
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
10
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
11
भूकंपासह अनेक मोठी संकट येणार, ज्वालामुखीचा उद्रेक, तीव्र हवामान बदल; बाबा वेंगाची २०२६ साठी भविष्यवाणी
12
बाजारात नफावसुलीचा जोर! एअरटेल-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये जोरदार घसरण; सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
13
बाल्कनीतून डोकावताना तोल गेला, तीन वर्षांचा चिमुकला खाली पडला...; नाशिकमधील घटना
14
भारताने रचण्यास सुरुवात केली 'इंद्रजाल'; पाकिस्तानने मग तुर्कीचा ड्रोन पाठवूदे नाहीतर चीनचा...
15
Sri Lanka Flood : पावसाचं थैमान! श्रीलंकेत भीषण पूर, ५६ जणांचा मृत्यू; ६० जण बेपत्ता, ६०० घरांचं मोठं नुकसान
16
"पैसा सर्वकाही नाही, मन मोठं हवं!"; कंपनीची १,००० कर्मचाऱ्यांसाठी फ्रीमध्ये थेट 'लंडन ट्रिप'
17
"ज्याच्यासाठी आमचं घर फुटलं, तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला", धनंजय मुंडेंचा चढला पारा, प्रचारसभेत कोणावर 'वार'?
18
“शिवसेना–भाजप ही विचारधारेची युती, अशी युती..."; रवींद्र चव्हाणांना एकनाथ शिंदेंचे उत्तर
19
“३० वर्षांनी ‘मुंबई’चे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये”; राम नाईक यांनी विरोधकांना सुनावले
20
Virat Kohli: कोहली विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर; शतक ठोकताच बनेल क्रिकेटचा हुकमी 'ऐक्का'!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईसह उपनगरात जोर‘धार’

By admin | Updated: July 15, 2017 05:32 IST

मान्सून सक्रिय झाल्यानंतर गुरुवारी पडलेल्या पावसाने शुक्रवारी आपला जोर कायम ठेवला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मान्सून सक्रिय झाल्यानंतर गुरुवारी पडलेल्या पावसाने शुक्रवारी आपला जोर कायम ठेवला. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत ठिकठिकाणी पडलेल्या पावसाने मुंबईकरांना चांगलेच झोडपून काढले. जोरदार पावसादरम्यान कुठेही पाणी साचले नसले तरीदेखील पडझड कायम होती. सलग सुरू राहिलेल्या पावसाने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी सकाळीच कुलाबा, फोर्ट, भायखळा, लालबाग, परळ, माहीम, दादर आणि सायन परिसरात तर पूर्व उपनगरात भांडुप, मुलुंडसह घाटकोपर आणि कुर्ला येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. पश्चिम उपनगरात अंधेरी, पार्ले आणि गोरेगाव येथेही पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. विशेषत: वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात पावसाचा अधिक जोर असल्याचे चित्र होते. मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात सकाळी बरसलेल्या पावसाने दुपारी काही काळ विश्रांती घेतली. मात्र पुन्हा सायंकाळसह रात्री जोर पकडलेल्या मान्सूनधारांनी मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली.दरम्यान, कुर्ला पश्चिमेकडील सफेद पूल येथे घराची भिंत पडून सहा जण जखमी झाले. यापैकी पाच जणांना पॅरामाउंट या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहरात अनेक ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. ३० ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने या दुर्घटनांत जीवितहानी झाली नाही. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम राहील. पुढील ४८ तास मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. >रायगड जिल्ह्यात संततधाररायगड जिल्ह्यात संततधार पाऊस पडत असून शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद पेण येथे २४० मि.मी. झाली आहे. उर्वरित ठिकाणी कर्जत २३६.२० मि.मी., सुधागड १५५.३३, खालापूर १४४, पनवेल ८९.२०, माणगाव ९६, पोलादपूर ७८, रोहा ७३, महाड ७२, अलिबाग ३८, मुरुड २९, उरण ४४, तळा ४२, म्हसळा १५.४०, श्रीवर्धन १४ आणि गिरिस्थान माथेरान येथे १९९.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.>मोडकसागर धरणामुळे पालघरच्या ४२ गावांना धोक्याचा इशाराठाणे : जिल्ह्यातील मोडकसागर या धरणाने धोक्याची पातळी ओलांडली असून, खर्डी नदी परिसरात असलेल्या गावांना धोक्याचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. शहापूर तालुक्यातील वैतरणा नदीवर मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे हे धरण आहे. अवघ्या १८ तासांत या धरणाची पातळी झपाट्याने वाढल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबत काढलेल्या इशारापत्रकात धरणाखालील पालघर जिल्ह्यातील ४२ गावांना हा धोक्याचा इशारा देऊन सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. गेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात २४७.४० मिमी पाऊस झाला आहे. यामुळे रुंदे येथील काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने १० ते १२ गावांचा टिटवाळा शहराशी थेट संपर्क तुटला.>पावसाची नोंदमागील २४ तासांत कुलाबा आणि सांताक्रूझ येथे अनुक्रमे ३०.८, २६.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरात २०.७५, पूर्व उपनगरांत ३५.०२ आणि पश्चिम उपनगरांत २२.१२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.