शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

मुंबईसह उपनगरात जोर‘धार’

By admin | Updated: July 15, 2017 05:32 IST

मान्सून सक्रिय झाल्यानंतर गुरुवारी पडलेल्या पावसाने शुक्रवारी आपला जोर कायम ठेवला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मान्सून सक्रिय झाल्यानंतर गुरुवारी पडलेल्या पावसाने शुक्रवारी आपला जोर कायम ठेवला. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत ठिकठिकाणी पडलेल्या पावसाने मुंबईकरांना चांगलेच झोडपून काढले. जोरदार पावसादरम्यान कुठेही पाणी साचले नसले तरीदेखील पडझड कायम होती. सलग सुरू राहिलेल्या पावसाने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी सकाळीच कुलाबा, फोर्ट, भायखळा, लालबाग, परळ, माहीम, दादर आणि सायन परिसरात तर पूर्व उपनगरात भांडुप, मुलुंडसह घाटकोपर आणि कुर्ला येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. पश्चिम उपनगरात अंधेरी, पार्ले आणि गोरेगाव येथेही पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. विशेषत: वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात पावसाचा अधिक जोर असल्याचे चित्र होते. मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात सकाळी बरसलेल्या पावसाने दुपारी काही काळ विश्रांती घेतली. मात्र पुन्हा सायंकाळसह रात्री जोर पकडलेल्या मान्सूनधारांनी मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली.दरम्यान, कुर्ला पश्चिमेकडील सफेद पूल येथे घराची भिंत पडून सहा जण जखमी झाले. यापैकी पाच जणांना पॅरामाउंट या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहरात अनेक ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. ३० ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने या दुर्घटनांत जीवितहानी झाली नाही. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम राहील. पुढील ४८ तास मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. >रायगड जिल्ह्यात संततधाररायगड जिल्ह्यात संततधार पाऊस पडत असून शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद पेण येथे २४० मि.मी. झाली आहे. उर्वरित ठिकाणी कर्जत २३६.२० मि.मी., सुधागड १५५.३३, खालापूर १४४, पनवेल ८९.२०, माणगाव ९६, पोलादपूर ७८, रोहा ७३, महाड ७२, अलिबाग ३८, मुरुड २९, उरण ४४, तळा ४२, म्हसळा १५.४०, श्रीवर्धन १४ आणि गिरिस्थान माथेरान येथे १९९.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.>मोडकसागर धरणामुळे पालघरच्या ४२ गावांना धोक्याचा इशाराठाणे : जिल्ह्यातील मोडकसागर या धरणाने धोक्याची पातळी ओलांडली असून, खर्डी नदी परिसरात असलेल्या गावांना धोक्याचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. शहापूर तालुक्यातील वैतरणा नदीवर मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे हे धरण आहे. अवघ्या १८ तासांत या धरणाची पातळी झपाट्याने वाढल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबत काढलेल्या इशारापत्रकात धरणाखालील पालघर जिल्ह्यातील ४२ गावांना हा धोक्याचा इशारा देऊन सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. गेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात २४७.४० मिमी पाऊस झाला आहे. यामुळे रुंदे येथील काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने १० ते १२ गावांचा टिटवाळा शहराशी थेट संपर्क तुटला.>पावसाची नोंदमागील २४ तासांत कुलाबा आणि सांताक्रूझ येथे अनुक्रमे ३०.८, २६.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरात २०.७५, पूर्व उपनगरांत ३५.०२ आणि पश्चिम उपनगरांत २२.१२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.