शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

मुंबई शिवसेनेची असल्याने बजेटमध्ये अन्याय - सेनेचा आरोप

By admin | Updated: March 18, 2015 18:46 IST

राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे टीका करत मुंबई शिवसेनेची असल्यानेच बजेटमध्ये अन्याय करण्यात आल्याचा आरोप सेनेने केला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १८ - राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी विशेष काहीही तरतुदी न करता मुंबईला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याची टीका शिवेसेनेने केली आहे. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला वहिला मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सादर केला. मात्र शिवसेना या अर्थसंकल्पाबाबत खुश नसून अर्थसंकल्पात मुंबईकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे सेना आमदार सुनील शिंदे यांचे म्हणणे आहे.  मुंबई ही शिवसेनेची असल्यानेच बजेटमध्ये अन्याय करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.  आजच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी कोणत्याही खास घोषणा करण्यात आल्या नाहीत. मिल कामगारांच्या घरांची तरतूद, बीडीडी चाळ, कोस्टल रोड प्रकल्प याबद्दल कोणतीही तरतूद केली नसल्याचे सांगत शिंदे यांनी आपली नाराजी नोंदवली.
भाजपाने मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. शिवसेनेने गैरसमज करून घेऊ नये, मुंबईवर काहीही अन्याय केलेला नाही असे भाजपा नेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे. मुंबईत भाजपाचे १५ तर सेनेचे १४ आमदार त्यामुळे मुंबई फक्त सेनेची नाही, असे सांगत शिवसेनेने अज्ञानापोटी विरोध केला असावा असे आक्रमक झालेल्या शेलार यांनी म्हटले. मेट्रो-३ साठी १०९ कोटींची तरतूद, फ्री वायफाय तसेच अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. मुंबईच्या विकासातच राज्याचा विकास असून मुंबईला वेगळं मानत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.