शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Shraddha Walker Murder Case: श्रद्धा हत्याकांडप्रकरणी मुंबई पोलीस अडचणीत? अधिकाऱ्यांच्याच चौकशीचे आदेश निघाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 11:08 IST

तक्रारीनंतरही चौकशीत बेजबाबदारपणा दाखविल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर माझी मुलगी वाचली असती, असा आरोप श्रद्धा वालकरचे वडील विकास यांनी पत्रकार परिषद घेऊन केल्यानंतर तपासात आणि चौकशीत बेजबाबदारपणा दाखवत दिरंगाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. त्यामुळे तुळींज आणि माणिकपूर ठाण्यातील तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

श्रद्धाने तक्रार देऊनही त्याची दखल न घेतल्याबद्दल तिच्या वडिलांनी पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशीबाबत आदेश काढल्याचे सूत्रांकडून कळते. आफताब माझा गळा दाबून मला ठार करेल, अशी तक्रार श्रद्धाने पोलिस ठाण्यात केली होती. मात्र त्याची वेळीच दखल घेतली गेली नाही.  आरोपी आफताब पुनावाला याने मारहाण केल्यानंतर श्रद्धाने तुळींज आणि माणिकपूर पोलिस ठाण्यात धाव घेतली होती; परंतु, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. श्रद्धाशी तेव्हाच नीट संवाद साधून तिला बोलते केले असते, आफताबला पोलिस ठाण्यात बोलावून समज दिली असती तरी त्याच्या कृत्याला आळा बसला असता, अशी तिच्या कुटुंबीयांची भावना आहे.  हा मुद्दा श्रद्धाचे वडील विकास यांनी पोलिसांच्या चौकशीवर प्रश्न उपस्थित केले. तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. 

तक्रारच मागे घेतली, तर मग पोलिस दोषी कसे?n श्रद्धाने जेव्हा तुळींज पोलिस ठाण्यात मारहाणीची तक्रार केली होती. त्यावेळी तिला वैद्यकीय तपासणी करून येण्यास सांगितले; पण ती आलीच नाही. तिला अनेक वेळा तुळींज पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यावर ती आली. n पण त्यावेळी तिने आफताबबाबत काहीही तक्रार नसल्याचा जवाब पोलिसांना दिला आहे. मूळ तक्रारच मागे घेतल्याने पोलिसांना तपास करता आला नाही. तिच्या वडिलांनी पोलिसांवर केलेल्या आरोपात तथ्य नाही. n त्यावेळी पोलिसांनी योग्य चौकशी आणि तपास केल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरMumbai policeमुंबई पोलीस