शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कुठलीही स्थिती हाताळण्यास मुंबई पोलीस सक्षम - आयुक्त दत्तात्रय पडलगीकरांचा विश्वास

By admin | Updated: March 12, 2016 20:34 IST

एका महिन्यापूर्वी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर दत्तात्रय पडसलगीकर यांनी पहिली मुलाखत दिली ती ऑनलाइन लोकमतला

 
डिप्पी वांकाणी,
ऑनलाइन लोकमत, मुंबई
 
एका महिन्यापूर्वी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर दत्तात्रय पडसलगीकर यांनी पहिली मुलाखत दिली ती ऑनलाइन लोकमतला. या मुलाखतीत पडसलगीकरांनी शहरातल्या कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीची माहिती तर दिलीच, त्याशिवाय दहशतवादाकडे ओढल्या जात असलेल्या तरुणांना कट्टर होण्यापासून रोखण्यासाठी मुंबई पोलीसांनी केलेल्या उपायांची माहिती दिली. नैतिक पोलीसगिरीविषयीही त्यांनी आपली मतं मोकळेपणानं मांडली. या मुलाखतीतले मुख्य मुद्दे:
 
लोकमत - तुम्हाला पदभार स्वीकारून एक महिना झालाय. मुंबईतल्या कायदा सुव्यवस्थेबाबत तुम्हाला काय वाटतं?  तुमचे प्राधान्यक्रम काय आहेत?
 
पडसलगीकर - सर्व स्तरांवरच्या अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली आहे. तसेच, प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून जिथं माजी माणसं काम करतात, त्या क्षेत्रीय पोलीस ठाण्यांनाही मी भेटी दिल्यात. त्यांनी कायम सतर्क रहावं अशा सूचना मी त्यांना दिल्या आहेत. माझे पोलीस अधिकारी कुठल्याही प्रकारची स्थिती हाताळण्यास सक्षम आहेत, याबद्दल माझी खात्री पटली आहे. याव्यतिरिक्त, पोलीस आणि नागरिकांचे संबंध सुधारावेत, तसेच पोलीसांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात याकडेही मी लक्ष देत आहे.
 
लोकमत - पोलीसांच्या सोयी सुविधा तुम्ही म्हणत आहात, तर त्या दृष्टीने पोलीसांचं मनोबल उंचावण्यासाठी तुम्ही कुठल्या उपाययोजना करत आहात?
 
पडसलगीकर - पोलीसांचं आरोग्य हा अत्यंत महत्त्वाचा व काळजी घेण्याचा विषय आहे. पोलीसांठी आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशा शिबिरांमध्ये पोलीसांना आधीपासून सतावणाऱ्या शारिरीक व्याधींचा तपास करता येईल. तसेच, ताणतणावाचं नियोजन कसं करावं यासाठीही शिबिरांचं आयोजन आम्ही लवकरच करणार आहोत.
 
लोकमत - जेएनयूमध्ये कन्हैय्या कुमारला अटक झाल्यानंतर मुंबईसह देशभरात विविध ठिकाणी निदर्शने झाली. याचा तुम्ही कसा सामना केलात. त्यासंदर्भात तुम्हाला काही धागेदोरे मिळाले आहेत का?
 
पडसलगीकर - आम्ही फक्त शैक्षणिक संस्थांच्या बाहेर होणाऱ्या अशा निदर्शनांवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही अशा संस्थांमध्ये अजून गेलेलो नाहीत. आम्ही फक्त कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने या निदर्शनांकडे लक्ष ठेवून आहोत आणि त्यांच्या संदर्भातली गुप्त माहिती वा धागेदोरे गोळा करत नाहीयोत.
लोकमत - हेडलीनं त्याच्या पाकिस्तानमधल्या हँडलर्ससंदर्भात नुकतीच माहिती दिली, परंतु अनेक जण असं सांगतात की या माहितीला काही अर्थ नाही कारण ती पडताळून बघता येत नाही. तुमच्यामते हेडलीची साक्ष किती महत्त्वाची आहे.
 
पडसलगीकर - हेडलीच्या साक्षीला निश्चितच महत्त्व आहे. कारण ती न्यायालयासमोर झाली आहे. असं याआधी कधीही झालं नव्हतं.
 
लोकमत - मुंबई पोलीस सध्या टिवटर हँडलवर अॅक्टिव आहेत. पण, तिथं संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत, अनेकजण पोलीस भ्रष्टाचारी असल्याचंही तिथं नोंदवतात. अशा प्रतिक्रिया आल्यावरही हे कँपेन तुम्ही सुरू ठेवणार आहात?
 
पडसलगीकर - निश्चितच हे कँपेन सुरू राहणार. माझ्या कारकिर्दीत माजा प्रयत्न असेल की, नकारात्मक प्रतिक्रियांचं प्रमाण कमी होईल आणि चांगलं कार्यक्षम पोलीसाचं चित्र उभं राहील.
 
लोकमत - अनेक तरुणांना दहशतवादाच्या जाळ्यात ओढलं जात आहे. त्यांना दहशतवादापासून रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत ?
  
पडसलगीकर - मुंबई नेहमीच दहशतवाद्यांच्या रडारवर राहिली आहे. एटीएसच्या सहाय्याने आम्ही प्रयत्न करत आहोत, आणि यात आमची स्पेशल ब्रांच अत्यंत चांगली कामगिरी करत आहेत. पोलीस ठाण्यातील अधिका-यांना धार्मिक नेत्यांच्या संपर्कात राहण्यास सांगितलं आहे जे तरुणांना दहशतवादाकडे ओढल्या जाण्यापासून परावृत्त करतील. लवकरच आम्ही एक नवी संकल्पना अंमलात आणू ज्यामध्ये तरुण थेट आमच्या संपर्कात असतील. आम्ही त्यांचा आत्मविश्वास वाढवू आणि त्यांना दहशतवाद कसा चुकीचा आहे याबद्दल शिक्षण देऊन जागृत करु. 
 
लोकमत - मुंबई पोलिसांवर नैतिक पोलीसगिरी केल्याबद्दल मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तुम्ही याकडे कसं पाहता ? आणि तुमच्या सहका-यांना यासंबंधी तुम्ही काय सूचना केल्या आहेत ?
 
पडसलगीकर - नैतिक पोलीसगिरीसंबंधी माझ्या माणसांना मी कडक सूचना केल्या आहेत. लोकांशी नम्रपणे वागण्याची तसंच कोणाचीही खासगी बाब भंग होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना दिली आहे. छापा टाकताना काळजी घेण्याचे आदेशही दिले आहेत. 
 
लोकमत - मुंबई पोलिसांना मिळणारी शस्त्र, आधुनिक साहित्य, सुविधांची माहिती तुम्ही घेतली आहे का ? मुंबई पोलिसांना गरज आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे अशा काही गोष्टी आहेत का ?
 
पडसलगीकर - सरकारकडे आम्ही अनेक प्रस्ताव दिले आहेत आणि त्या गोष्टी आम्हाला पुरवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे.सद्यस्थितीला आमच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही आहे.