शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

न्यायासाठी पूर्ण कुटुंबानं वकिली शिक्षण घेतलं; अन्यायाविरोधात लढण्याचं बळ मिळालं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 17:24 IST

डॉ.खुर्शीद शेख यांच्या दोन्ही किडन्या खराब आहेत. त्यांचे आठवड्यातून तीन दिवस डायलिसिस केले जाते.

मीरा भाईंदर - आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. लोकशाहीतील भारतीय संविधानाचा उत्सव. या संविधानानेच आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले आहे. आज आपण अशाच एका कुटुंबाची कहाणी सांगणार आहोत ज्यांना या संविधानामुळे अन्यायाविरुद्ध लढण्याचे धैर्य मिळाले. मीरा रोड येथील डॉ. खुर्शीद शेख (५४), डॉ. सबिना शेख (४६) आणि त्यांची मुलगी आयेशा (१८) यांची ही कहाणी आहे. हे तिघेही फौजदारी खटल्यात न्याय मिळवण्यासाठी कायद्याचा अभ्यास करत आहेत.

सबिना शेख यांच्या वडिलांनी ८० च्या दशकात भायखळ्यात तिच्यासाठी एक मालमत्ता खरेदी केली होती. मात्र सबिनाच्या भावांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ती मालमत्ता हडप केली. भावांशी बोलूनही तोडगा निघाला नाही, तेव्हा त्यांनी २०१७ मध्ये पोलिस ठाण्यात तक्रार केली. जवळपास वर्षभर पोलिसांनी कोणताही एफआयआर नोंदवला नाही, त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली. २०१९ मध्ये न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर नोंदवण्यात आला असे असतानाही वकील आणि पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे तपास पुढे सरकला नाही. २०२३ पर्यंत शेख कुटुंबीयांनी ५ वकील बदलले होते आणि सुमारे ५ लाख रुपये खर्च केले होते. न्यायाचा हा लढा सुरू ठेवण्यासाठी अखेर संपूर्ण कुटुंबाने एलएलबी करण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ.खुर्शीद शेख यांच्या दोन्ही किडन्या खराब आहेत. त्यांचे आठवड्यातून तीन दिवस डायलिसिस केले जाते. खुर्शीद यांच्यासोबत त्यांची पत्नी सबिना आणि मुलगी आयशा याही एलएलबी करत आहेत जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत अन्यायाविरोधात उभा केलेला लढा अर्ध्यावर थांबू नये. आम्हाला आमचे वय आणि आरोग्याबाबत जाणीव आहे. त्यामुळे भविष्य डोळ्यासमोर ठेवून आम्ही तयारी करत आहोत असं सबिना यांनी म्हटलं. जेव्हा २०२३ पर्यंत एफआयआरमध्ये कुठलाही तपास पुढे गेला नाही तेव्हा डॉ. खुर्शीद यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले. 

खुर्शीद यांनी कोर्टात स्वत:ची बाजू मांडली. त्या लढाईत खुर्शीद यांना पहिल्यांदाच यश मिळाले. डिसेंबर २०२३ मध्ये कोर्टाने पोलिसांना फटकारले आणि तपास अधिकारी बदलण्याचे आदेश दिले. कोर्टानेही तपास अधिकारी यांच्यावर कारवाई केली.