शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

न्यायासाठी पूर्ण कुटुंबानं वकिली शिक्षण घेतलं; अन्यायाविरोधात लढण्याचं बळ मिळालं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 17:24 IST

डॉ.खुर्शीद शेख यांच्या दोन्ही किडन्या खराब आहेत. त्यांचे आठवड्यातून तीन दिवस डायलिसिस केले जाते.

मीरा भाईंदर - आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. लोकशाहीतील भारतीय संविधानाचा उत्सव. या संविधानानेच आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले आहे. आज आपण अशाच एका कुटुंबाची कहाणी सांगणार आहोत ज्यांना या संविधानामुळे अन्यायाविरुद्ध लढण्याचे धैर्य मिळाले. मीरा रोड येथील डॉ. खुर्शीद शेख (५४), डॉ. सबिना शेख (४६) आणि त्यांची मुलगी आयेशा (१८) यांची ही कहाणी आहे. हे तिघेही फौजदारी खटल्यात न्याय मिळवण्यासाठी कायद्याचा अभ्यास करत आहेत.

सबिना शेख यांच्या वडिलांनी ८० च्या दशकात भायखळ्यात तिच्यासाठी एक मालमत्ता खरेदी केली होती. मात्र सबिनाच्या भावांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ती मालमत्ता हडप केली. भावांशी बोलूनही तोडगा निघाला नाही, तेव्हा त्यांनी २०१७ मध्ये पोलिस ठाण्यात तक्रार केली. जवळपास वर्षभर पोलिसांनी कोणताही एफआयआर नोंदवला नाही, त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली. २०१९ मध्ये न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर नोंदवण्यात आला असे असतानाही वकील आणि पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे तपास पुढे सरकला नाही. २०२३ पर्यंत शेख कुटुंबीयांनी ५ वकील बदलले होते आणि सुमारे ५ लाख रुपये खर्च केले होते. न्यायाचा हा लढा सुरू ठेवण्यासाठी अखेर संपूर्ण कुटुंबाने एलएलबी करण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ.खुर्शीद शेख यांच्या दोन्ही किडन्या खराब आहेत. त्यांचे आठवड्यातून तीन दिवस डायलिसिस केले जाते. खुर्शीद यांच्यासोबत त्यांची पत्नी सबिना आणि मुलगी आयशा याही एलएलबी करत आहेत जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत अन्यायाविरोधात उभा केलेला लढा अर्ध्यावर थांबू नये. आम्हाला आमचे वय आणि आरोग्याबाबत जाणीव आहे. त्यामुळे भविष्य डोळ्यासमोर ठेवून आम्ही तयारी करत आहोत असं सबिना यांनी म्हटलं. जेव्हा २०२३ पर्यंत एफआयआरमध्ये कुठलाही तपास पुढे गेला नाही तेव्हा डॉ. खुर्शीद यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले. 

खुर्शीद यांनी कोर्टात स्वत:ची बाजू मांडली. त्या लढाईत खुर्शीद यांना पहिल्यांदाच यश मिळाले. डिसेंबर २०२३ मध्ये कोर्टाने पोलिसांना फटकारले आणि तपास अधिकारी बदलण्याचे आदेश दिले. कोर्टानेही तपास अधिकारी यांच्यावर कारवाई केली.