शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

मुंबई महाभ्रष्टपालिका

By admin | Updated: December 28, 2014 02:31 IST

मुंबई महापालिकेत सर्वाधिक भ्रष्टाचार असून, हा भ्रष्टाचार थांबला तर या शहरातील फ्लॅटचे दर प्रति चौरस फूट किमान ५०० रुपयांनी कमी होतील,

गौप्यस्फोट : ‘एसीबी’ महासंचालकांच्या वक्तव्याने सत्ताधारी शिवसेनेची नाचक्कीपंढरपूर : मुंबई महापालिकेत सर्वाधिक भ्रष्टाचार असून, हा भ्रष्टाचार थांबला तर या शहरातील फ्लॅटचे दर प्रति चौरस फूट किमान ५०० रुपयांनी कमी होतील, असा गौप्यस्फोट लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी केला आहे. दीक्षित यांच्या या वक्तव्याने महापालिकेत सत्ता आलेल्या शिवसेनेची नाचक्की झाली असून, या मुद्द्यावरून आता राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.पंढरपूर येथील उमा महाविद्यालयात शनिवारी व्याख्यानासाठी आलेल्या दीक्षित यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुंबई पालिकेत बांधकाम परवाना, वापर परवाना यासाठी बिल्डरांकडून विविध प्रकारे लाच घेतली जाते. लाचेच्या रकमेची भरपाई करण्यासाठी बिल्डर घराच्या किमती वाढवतात. त्यामुळेच आज मुंबईत परवडतील अशी घरे नाहीत. (प्रतिनिधी)पदाचा गैरवापर अधिक92 गुन्हे या वर्षी एसबीने मुंबईत दाखल केले. यात ८२ प्रकरणांमध्ये शासकीय अधिकारी, खासगी व्यक्ती लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेल्या. आपल्या पदाचा, अधिकारांचा गैरवापर करून उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतापेक्षा जास्त, बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी ७ गुन्हे दाखल केले गेले. तर अन्य भ्रष्टाचार प्रकरणांत ३ गुन्हे दाखल करण्यात आले.मला यातले काहीच माहीत नाही...या वक्तव्याबद्दल मला काहीच माहिती नाही़ त्यामुळे यावर भाष्य करणे उचित ठरणार नाही़ - सीताराम कुंटे (मुंबई महापालिका आयुक्त)महापालिकेत भ्रष्टाचार आहे हे खरे असले तरी जागांच्या ंिकमतीवर फक्त पालिका अंकुश ठेवू शकत नाही़ तत्कालीन आयुक्त सुबोध कुमार यांनी फंजिबल एफएसआय ही संकल्पना लागू करून अतिरिक्त चटईक्षेत्र वापरणाऱ्या विकासकांना जादा कर आकारला होता़ त्यामुळे कोस्टल रोडसारख्या प्रकल्पासाठी २ हजार कोटींचा निधी उभा राहू शकला़ - देवेंद्र आंबेरकर, विरोधी पक्षनेतेमाहिती कुठून मिळाली, किती तक्रारी आल्या़? एका खासदाराने ही माहिती दिली. मात्र त्या खासदाराचे नाव सांगण्यास दीक्षित यांनी नकार दिला. गेल्या वर्षी ५७४ सापळे आम्ही लावले होते; मात्र यंदा १२३२ सापळे लावण्यात आम्ही यशस्वी झालो, असेही त्यांनी सांगितले.सिंचन घोटाळ्याची चौकशीराज्यातील सिंचन घोटाळ्यासह अन्य घोटाळ्यांच्या संदर्भात राज्य सरकारने परवानगी दिली असून, त्यासंदर्भातील फाईल मुख्यमंत्र्यांकडून गृहमंत्रालयाकडे येईल आणि गृहमंत्र्यांकडून आम्हाला आदेश मिळाल्यावर त्याची चौकशी सुरू होईल, असे दीक्षित म्हणाले.