शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

मुंबई-जळगाव विमानसेवा सातत्याने रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 02:52 IST

खराब हवामान, रात्रीच्या वेळी विमान उतरविण्याची सुविधा नाही; विमाने वळवितात अहमदाबादला

मुंबई : मुंबई-जळगाव विमानसेवा सातत्याने रद्द होत आहे. या विमानसेवेला खराब हवामानाचा फटका बसतो आहे, शिवाय रात्रीच्या वेळी विमान उतरविण्याची सुविधा जळगाव विमानतळावर उपलब्ध नसल्याने, ही समस्या वारंवार उद्भवत आहे. ‘उडाण’ योजनेमध्ये या विमानतळाचा समावेश केल्यानंतरही प्रवाशांना विमानसेवा मिळत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली जात आहे.मुंबईहून जळगावला जाण्यासाठी ट्रुजेटचे विमान चालविले जाते. उडाण योजनेत १ सप्टेंबरपासून विमानसेवा चालविली जात आहे.सकाळी अहमदाबाद येथून हे विमान जळगावला येते. तिथून मुंबईला येते. त्यानंतर, कोल्हापूर व नंतर परतीचा प्रवास केला जातो. मात्र, यामध्ये कंपनीने इंदूरचा समावेश केला आहे. त्यामुळे जळगावात सकाळी साडेदहा वाजता हे विमान येणे अपेक्षित असताना त्याला विलंब होतोे. परिणामी, या विमानाच्या पुढील सर्व उड्डाणांवर परिणाम होतो. सायंकाळी साडेपाच वाजता मुंबईहून येणारे विमान जळगावात उतरणे अपेक्षित असते. मात्र, अनेकदा त्याला विविध कारणांमुळे विलंब होतो.जळगाव विमानतळावर रात्री लँडिंग करण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीत विमान प्रवास शक्य आहे. सूर्यास्तानंतर विमान जळगावात आल्यास हवाई नियंत्रण कक्षातून विमान उतरविण्याची परवानगी दिली जात नाही, त्यामुळे हे विमान अहमदाबादकडे वळवले जाते.प्रवाशांचा संतापगेल्या आठवड्यात मुंबईहून आलेले विमान जळगावात न उतरता थेट अहमदाबादला जाण्याचे प्रसंग दोन-तीन वेळा घडले, तर जळगावातून अहमदाबादला जाण्यासाठी प्रतीक्षा करत असलेल्या प्रवाशांनादेखील जळगाव विमानतळावर ताटकळत राहावे लागले. मुंबईहून जळगावला जाण्याऐवजी प्रवाशांना अहमदाबादला जावे लागले. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Airportविमानतळ