शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग खचला

By admin | Updated: January 16, 2017 03:03 IST

मुंबईहून कोकणात, पुढे दक्षिण भारतात जाण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा एकमेव जवळचा व सोईस्कर मार्ग आहे

सिकंदर अनवारे,

दासगाव- मुंबईहून कोकणात, पुढे दक्षिण भारतात जाण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा एकमेव जवळचा व सोईस्कर मार्ग आहे. या मार्गावरून दिवसभर १२ ते १५ हजार वाहने ये-जा करतात. तर हजारो प्रवासी या मार्गावरून दरदिवशी प्रवास करतात. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग महाड तालुक्यातील केंबुर्ली गावचे हद्दीत, तसेच गांधारपाले गावच्या हद्दीत अवघड वळणावरच एका बाजूने संपूर्ण खचला आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडून खचलेल्या मार्गाची पाहणी करण्यात आली आहे. मात्र, महामार्ग दुरुस्तीसाठी आर्थिक तरतूद नसल्याने गेल्या महिनाभरापासून रस्ता तसाच खचलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या व कोकणातून मुंबईला येणारी हजारो वाहने, तसेच हजारो प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत. खचलेल्या ठिकाणी गेल्या महिन्याभरात २० ते २५ गाड्या घसरल्याची घटना घडली. मात्र, महामार्ग बांधकाम विभागाकडून याकडे पूर्णत: दुर्लक्षच होत असल्याचे दिसून येत आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा कोकणातील नागरिकांचा येण्या-जाण्याचा एकमेव मार्ग आहे. या मार्गावरच दर मिनिटाला १० ते १५ वाहने धावतात, तर दिवसभरात जवळपास १५ हजार वाहने मार्गावर धावत आहेत. महामार्गाचे चौपदरीकरण लवकरच होणार असल्याचे आश्वासन केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे. सध्या शेतकऱ्यांची जागा भूसंपादित करण्याचे काम वेगात आहे. सध्या राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील केंबुर्ली गावचे हद्दीत दोन्ही ठिकाणी अवघड वळणावरच एका बाजूने गेल्या महिन्याभरापूर्वी संपूर्ण रस्ता खचून गेला आहे. या दोन्ही वळणावरचा गेल्या दोन ते तीन वर्षांचा अपघाताचा आकडा या मार्गावर झालेल्या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. अनेक प्रवासी जायबंदी झालेत, तर अनेक प्रवाशांनी याच वळणावर अपघातामध्ये आपले जीव गमावले आहेत. खचलेल्या रस्त्याची महामार्ग बांधकाम विभाग महाड यांच्याकडून पाहणी करण्यात आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघाताचा धोका आहे, असे निष्कर्षही काढण्यात आले; परंतु या ठिकाणी काम करण्यासाठी पैशांची तरतूद नाही, यासाठी या खचलेल्या रस्त्या ठिकाणचे काम होत नाही, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. महिनाभरात या खचलेल्या ठिकाणी २५ ते ३० गाड्या घसरल्या. मात्र, कोणतीच जीवितहानी झाली नाही.गोवा, कोकण विभागाकडून जवळपास १०० ते १५० आरामदायी बसेस या मार्गावरून रात्रीच्याच वेळी धावतात. सध्या खचलेली दोन्ही ठिकाणे अवघड वळणावरच असल्याने रात्रीच्या या होणाऱ्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी खचलेला रस्ता वाहन चालकांना दिसत नाही. खचलेल्या रस्त्यावर गाडी उतरल्यानंतर वाहनावरील चालकाचा ताबा सुटतो. त्यामुळे वाहन पलटी होण्याची, घसरण्याची भीती आहे. सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी, चालक यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.>तीन ठिकाणी अपघातांचा धोका कायमदासगावमध्ये काही दिवसांपूर्वी रसायनाचा टँकर पलटी झाला होता. त्या टँकरच्या धडकेने महामार्गाचा रस्त्यालगतचा संरक्षण कठडा पार तुटला आहे. महामार्ग बांधकाम खात्याने सरळ सरळ पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेकडो नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी कठडा नसल्याने कधीही गाडी खाली कोसळण्याची भीती आजही कायम आहे. दुसरा केंबुर्ली, तिसरा गांधारपाले रस्ता खचलेल्या ठिकाणी अशा तीन ठिकाणी अपघातांचा धोका कायम असून त्यामुळे चालकांमध्ये नाराजी आहे. २५-30 गाड्या महिन्याभरात या मार्गावर घसरल्या आहेत. महामार्ग बांधकाम विभागाकडून पाहणीही करण्यात आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघाताचा धोका आहे, असे निष्कर्षही काढण्यात आला असून तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.>महामार्ग खचण्याचे प्रमाण जास्तगेल्या अनेक वर्षांपासून महाड तालुक्यातील अनेक ठिकाणी महामार्ग खचण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या वर्षी दासगाव खिंडीत रस्ता अर्ध्या बाजूने एक एक फूट खचला होता. त्याअगोदर दासगाव खिंडीत झालेले नवीन काम हेही पूर्णपणे खचले होते. त्याच पाठोपाठ केंबुर्ली व गांधारपाले या गावांच्या हद्दीत रस्ता खचला. यामागे कारण एकतर निकृष्ट दर्जाचे काम, दुसरे रस्त्यालगत विनापरवाना होणारे ठेकेदारांकडून खोदकाम या दोनच कारणांमुुळे रस्ता खचल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.दोन ठिकाणी रस्ता खचला असून त्याची पाहणी केली आहे. पूरहानी कार्यक्रमाअंतर्गत त्याची दुरुस्ती करणार आहोत. त्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. मात्र, अद्याप निधीची तरतूद झाली नसल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. -प्रकाश गायकवाड, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, महाडसंपूर्ण राज्यामध्ये ९ जानेवारीला रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झाली. वाहन चालकांना महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले. महामार्ग वाहतूक पोलीस शाखेच्या वतीने दासगांव, कें बुर्ली व गांधारपाले या तीन ठिकाणी अपघातांसाठी निर्माण झालेल्या धोक्यासंदर्भात सुरक्षा अभियानाच्या कार्यक्रमामध्ये महामार्ग बांधकाम विभाग महाड या अधिकाऱ्यांना खास आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, सुरक्षा महत्त्वाची नाही हे समजून या कार्यक्रमाला महाड विभागाकडून कोणत्याही अधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली नाही.- सुभाष ठाकूर, सहायक पोलीस निरीक्षक,महामार्ग वाहतूक शाखा महाड