शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग खचला

By admin | Updated: January 16, 2017 03:03 IST

मुंबईहून कोकणात, पुढे दक्षिण भारतात जाण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा एकमेव जवळचा व सोईस्कर मार्ग आहे

सिकंदर अनवारे,

दासगाव- मुंबईहून कोकणात, पुढे दक्षिण भारतात जाण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा एकमेव जवळचा व सोईस्कर मार्ग आहे. या मार्गावरून दिवसभर १२ ते १५ हजार वाहने ये-जा करतात. तर हजारो प्रवासी या मार्गावरून दरदिवशी प्रवास करतात. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग महाड तालुक्यातील केंबुर्ली गावचे हद्दीत, तसेच गांधारपाले गावच्या हद्दीत अवघड वळणावरच एका बाजूने संपूर्ण खचला आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडून खचलेल्या मार्गाची पाहणी करण्यात आली आहे. मात्र, महामार्ग दुरुस्तीसाठी आर्थिक तरतूद नसल्याने गेल्या महिनाभरापासून रस्ता तसाच खचलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या व कोकणातून मुंबईला येणारी हजारो वाहने, तसेच हजारो प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत. खचलेल्या ठिकाणी गेल्या महिन्याभरात २० ते २५ गाड्या घसरल्याची घटना घडली. मात्र, महामार्ग बांधकाम विभागाकडून याकडे पूर्णत: दुर्लक्षच होत असल्याचे दिसून येत आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा कोकणातील नागरिकांचा येण्या-जाण्याचा एकमेव मार्ग आहे. या मार्गावरच दर मिनिटाला १० ते १५ वाहने धावतात, तर दिवसभरात जवळपास १५ हजार वाहने मार्गावर धावत आहेत. महामार्गाचे चौपदरीकरण लवकरच होणार असल्याचे आश्वासन केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे. सध्या शेतकऱ्यांची जागा भूसंपादित करण्याचे काम वेगात आहे. सध्या राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील केंबुर्ली गावचे हद्दीत दोन्ही ठिकाणी अवघड वळणावरच एका बाजूने गेल्या महिन्याभरापूर्वी संपूर्ण रस्ता खचून गेला आहे. या दोन्ही वळणावरचा गेल्या दोन ते तीन वर्षांचा अपघाताचा आकडा या मार्गावर झालेल्या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. अनेक प्रवासी जायबंदी झालेत, तर अनेक प्रवाशांनी याच वळणावर अपघातामध्ये आपले जीव गमावले आहेत. खचलेल्या रस्त्याची महामार्ग बांधकाम विभाग महाड यांच्याकडून पाहणी करण्यात आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघाताचा धोका आहे, असे निष्कर्षही काढण्यात आले; परंतु या ठिकाणी काम करण्यासाठी पैशांची तरतूद नाही, यासाठी या खचलेल्या रस्त्या ठिकाणचे काम होत नाही, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. महिनाभरात या खचलेल्या ठिकाणी २५ ते ३० गाड्या घसरल्या. मात्र, कोणतीच जीवितहानी झाली नाही.गोवा, कोकण विभागाकडून जवळपास १०० ते १५० आरामदायी बसेस या मार्गावरून रात्रीच्याच वेळी धावतात. सध्या खचलेली दोन्ही ठिकाणे अवघड वळणावरच असल्याने रात्रीच्या या होणाऱ्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी खचलेला रस्ता वाहन चालकांना दिसत नाही. खचलेल्या रस्त्यावर गाडी उतरल्यानंतर वाहनावरील चालकाचा ताबा सुटतो. त्यामुळे वाहन पलटी होण्याची, घसरण्याची भीती आहे. सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी, चालक यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.>तीन ठिकाणी अपघातांचा धोका कायमदासगावमध्ये काही दिवसांपूर्वी रसायनाचा टँकर पलटी झाला होता. त्या टँकरच्या धडकेने महामार्गाचा रस्त्यालगतचा संरक्षण कठडा पार तुटला आहे. महामार्ग बांधकाम खात्याने सरळ सरळ पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेकडो नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी कठडा नसल्याने कधीही गाडी खाली कोसळण्याची भीती आजही कायम आहे. दुसरा केंबुर्ली, तिसरा गांधारपाले रस्ता खचलेल्या ठिकाणी अशा तीन ठिकाणी अपघातांचा धोका कायम असून त्यामुळे चालकांमध्ये नाराजी आहे. २५-30 गाड्या महिन्याभरात या मार्गावर घसरल्या आहेत. महामार्ग बांधकाम विभागाकडून पाहणीही करण्यात आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघाताचा धोका आहे, असे निष्कर्षही काढण्यात आला असून तसा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.>महामार्ग खचण्याचे प्रमाण जास्तगेल्या अनेक वर्षांपासून महाड तालुक्यातील अनेक ठिकाणी महामार्ग खचण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या वर्षी दासगाव खिंडीत रस्ता अर्ध्या बाजूने एक एक फूट खचला होता. त्याअगोदर दासगाव खिंडीत झालेले नवीन काम हेही पूर्णपणे खचले होते. त्याच पाठोपाठ केंबुर्ली व गांधारपाले या गावांच्या हद्दीत रस्ता खचला. यामागे कारण एकतर निकृष्ट दर्जाचे काम, दुसरे रस्त्यालगत विनापरवाना होणारे ठेकेदारांकडून खोदकाम या दोनच कारणांमुुळे रस्ता खचल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.दोन ठिकाणी रस्ता खचला असून त्याची पाहणी केली आहे. पूरहानी कार्यक्रमाअंतर्गत त्याची दुरुस्ती करणार आहोत. त्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. मात्र, अद्याप निधीची तरतूद झाली नसल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. -प्रकाश गायकवाड, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, महाडसंपूर्ण राज्यामध्ये ९ जानेवारीला रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झाली. वाहन चालकांना महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले. महामार्ग वाहतूक पोलीस शाखेच्या वतीने दासगांव, कें बुर्ली व गांधारपाले या तीन ठिकाणी अपघातांसाठी निर्माण झालेल्या धोक्यासंदर्भात सुरक्षा अभियानाच्या कार्यक्रमामध्ये महामार्ग बांधकाम विभाग महाड या अधिकाऱ्यांना खास आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, सुरक्षा महत्त्वाची नाही हे समजून या कार्यक्रमाला महाड विभागाकडून कोणत्याही अधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली नाही.- सुभाष ठाकूर, सहायक पोलीस निरीक्षक,महामार्ग वाहतूक शाखा महाड