शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या झळांनी मुंबई तापली; कमाल तापमान ३७.८ अंश सेल्सिअस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 06:45 IST

राज्यासह मुंबईच्या कमाल तापमानाचा आलेख चढाच असून, वाढत्या कमाल तापमानामुळे मुंबईकरांच्या शरीराची काहिली होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, सोमवारच्या सकाळच्या साडेआठच्या नोंदीनुसार भिराचे कमाल तापमान ४२ तर मुंबईचे कमाल तापमान ३७.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.

मुंबई : राज्यासह मुंबईच्या कमाल तापमानाचा आलेख चढाच असून, वाढत्या कमाल तापमानामुळे मुंबईकरांच्या शरीराची काहिली होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, सोमवारच्या सकाळच्या साडेआठच्या नोंदीनुसार भिराचे कमाल तापमान ४२ तर मुंबईचे कमाल तापमान ३७.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.उत्तरोत्तर कमाल तापमान स्थिर राहणार आहे. परिणामी, मुंबईकरांना बसणारे उन्हाचे चटके अधिकच वाढणार आहेत. कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत असतानाच, दुसरीकडे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण-गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली असून, उर्वरित भागात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. किमान तापमानाचा विचार करता, विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.कोकण-गोवा व मराठवाड्याच्या काही भागांत, तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.मुंबईचा विचार करता, मागील तीनएक दिवसांपासून येथील कमाल तापमानात कमालीची वाढ नोंदविण्यात येत आहे. ३० ते ३२ अंशावर असलेले कमाल तापमान, आता ३४, ३६ आणि ३७ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. तापदायक उन्हासह वाहते कोरडे आणि उष्ण वारे तापदायक वातावरणात आणखी भर घालत आहे. विशेषत: दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत मुंबईकरांना उन्हाच्या झळा बसत असून, रात्रीच्या उकाड्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे.१३ ते १४ मार्च : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.१५ मार्च : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागांत हवामान कोरडे राहील.१६ मार्च : संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.१३ आणि १४ मार्च रोजी मुंबईचे कमाल, किमान तापमान अनुक्रमे ३८, २० अंशाच्या आसपास राहील. आकाश निरभ्र राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.