शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

उन्हाच्या झळांनी मुंबई तापली; कमाल तापमान ३७.८ अंश सेल्सिअस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 06:45 IST

राज्यासह मुंबईच्या कमाल तापमानाचा आलेख चढाच असून, वाढत्या कमाल तापमानामुळे मुंबईकरांच्या शरीराची काहिली होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, सोमवारच्या सकाळच्या साडेआठच्या नोंदीनुसार भिराचे कमाल तापमान ४२ तर मुंबईचे कमाल तापमान ३७.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.

मुंबई : राज्यासह मुंबईच्या कमाल तापमानाचा आलेख चढाच असून, वाढत्या कमाल तापमानामुळे मुंबईकरांच्या शरीराची काहिली होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, सोमवारच्या सकाळच्या साडेआठच्या नोंदीनुसार भिराचे कमाल तापमान ४२ तर मुंबईचे कमाल तापमान ३७.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.उत्तरोत्तर कमाल तापमान स्थिर राहणार आहे. परिणामी, मुंबईकरांना बसणारे उन्हाचे चटके अधिकच वाढणार आहेत. कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत असतानाच, दुसरीकडे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण-गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली असून, उर्वरित भागात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. किमान तापमानाचा विचार करता, विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.कोकण-गोवा व मराठवाड्याच्या काही भागांत, तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.मुंबईचा विचार करता, मागील तीनएक दिवसांपासून येथील कमाल तापमानात कमालीची वाढ नोंदविण्यात येत आहे. ३० ते ३२ अंशावर असलेले कमाल तापमान, आता ३४, ३६ आणि ३७ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. तापदायक उन्हासह वाहते कोरडे आणि उष्ण वारे तापदायक वातावरणात आणखी भर घालत आहे. विशेषत: दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत मुंबईकरांना उन्हाच्या झळा बसत असून, रात्रीच्या उकाड्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे.१३ ते १४ मार्च : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.१५ मार्च : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागांत हवामान कोरडे राहील.१६ मार्च : संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.१३ आणि १४ मार्च रोजी मुंबईचे कमाल, किमान तापमान अनुक्रमे ३८, २० अंशाच्या आसपास राहील. आकाश निरभ्र राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.