राजकुमार सारोळे - सोलापूर
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा विकास साधण्यासाठी इंग्लंडच्या मदतीने मुंबई-बंगळुरू हा औद्योगिक पट्टा निर्माण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी दिली. पंतप्रधान मोदी विकासकामांच्या उद्घाटनासाठी येत आहेत, म्हणून कोणतेही राजकारण न करता मी या कार्यक्रमास आलो. ही दोन्ही कामे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे मंत्री असताना झाली आहेत, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
सोलापूर महापालिकेतर्फे आयोजित माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण व कै. वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरणप्रसंगी ते बोलत होते. अर्थव्यवस्थेत गुजरातपेक्षा महाराष्ट्र नंबर वन आहे. महाराष्ट्रातील 57 टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. त्यामानाने सिंचनाची उपलब्धता नाही. इतर राज्यांशी तुलना केल्यास महाराष्ट्रात फक्त 18 टक्के जमीन सिंचनाखाली आहे. त्यातच गेली तीन वर्षे दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. दुष्काळात जनावरे जगविण्यास 11 हजार कोटी तर गारपीटग्रस्तांसाठी 1क् हजार कोटी तातडीने मदत द्यावी लागली. असे असतानाही महाराष्ट्राची आर्थिक सधनता गुजरातपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे, असा विश्वास मुख्यमंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास पालकमंत्री दिलीप सोपल, परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री आनंदराव देवकते, आ. गणपतराव देशमुख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
च्टंचाई गावांसाठी जिल्हाधिका:यांकडे 6 कोटी
च्टंचाईग्रस्त तालुक्यांचे पुन्हा सर्वेक्षण
च्त्या 123 तालुक्यांना 7 योजना मिळणार
च्इतर तालुक्यांना 3 योजनांचा लाभ होणारच
च्प्रत्येक विभागात पर्जन्यमापक बसविणार
च्प्रत्येक शेतक:यास विम्याचे संरक्षण
च्प्रकल्पग्रस्तांना रोजगार प्रशिक्षण देणार
च्वस्त्रोद्योगासाठी नवे धोरण आणणार
च्प्रत्येक जिल्ह्यात विमानतळ, हेलीपॅड
च्पाणीपुरवठा योजनांसाठी 14क्क् कोटी
च्राजीव गांधी आरोग्य योजना सर्वाना लागू करणार