शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

बहुउमेदवार पद्धत वैध; उच्च न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 01:35 IST

राज्य सरकारने महाराष्ट्र महापालिका कायदा, महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत, औद्योगिक वसाहत कायदा, १९६५ मध्ये सुधारणा करून, सुरू केलेली बहुउमेदवार पद्धत व नगराध्यक्षांच्या थेट निवडणूक पद्धत घटनाबाह्य नाही.

मुंबई : राज्य सरकारने महाराष्ट्र महापालिका कायदा, महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत, औद्योगिक वसाहत कायदा, १९६५ मध्ये सुधारणा करून, सुरू केलेली बहुउमेदवार पद्धत व नगराध्यक्षांच्या थेट निवडणूक पद्धत घटनाबाह्य नाही. महापालिका, नगर परिषदा व नगर पंचायतींचा कारभार योग्य प्रकारे चालण्यासाठी संबंधित कायद्यात सुधारणा करण्याचा अधिकार विधिमंडळाला घटनेनेच दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कायद्यात केलल्या सुधारणा वैध आहेत, असा महत्त्वाचा निर्णय उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिला.राज्य सरकारने गेल्या महापालिका, नगर पंचायतींच्या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्र महापालिका कायदा, महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत आणि औद्योगिक वसाहत कायदा, १९६५ मध्ये सुधारणा करत, बहुउमेदवार निवडणूक पद्धत अंमलात आणली. मतदाराला एकापेक्षा जास्त मत देण्याचा अधिकार दिला. नगराध्यक्षांच्या थेट निवडणूक घेण्याचीही तरतूद केली. या सर्व सुधारित कायद्यांना भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर व अन्य काही जणांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावरील सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे होती.याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, बहुउमेदवार पद्धत सुरू करून, राज्य सरकार महिला व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील उमेदवारांवर अन्याय करत आहे, तसेच एका मतदाराला एकापेक्षा अधिक मते देण्याचा अधिकार देण्यासंदर्भात कायद्यातील तरतूद बेकायदा आहे.मुंबई पालिकेसाठी वेगळा कायदा व अन्य महापालिकांसाठी वेगळा कायदा लावून भेदभाव करत घटनेचे उल्लंघन केले, असा युक्तिवाद अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.‘मुंबई महापालिकेची स्वत:ची वैशिष्ट्ये आहेत. या महापालिकेबरोबर राज्यातील अन्य महापालिकांची तुलना करता येणार नाही. या महापालिकेत २७२ प्रभाग आहेत, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे या महापालिकेच्या निवडणुकीत बहुउमेदवार पद्धत राबविणे अशक्य नसले तरी कठीण आहे. मुंबई महापालिकेला ही पद्धत राबविली नाही, म्हणून ती घटनाबाह्य ठरत नाही, असे न्यायालयाने म्हटले.महापालिकांनी निवडणुका कशा घ्यायच्या, हे ठरविण्याचा अधिकार घटनेच्या अनुच्छेद २४३ आर अंतर्गत राज्य सरकारला आहे. महापालिका, नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यापासून ते या स्थानिक स्वायत्त संस्थांना प्रशासनांना अधिकार देण्यापासून विधिमंडळाला वंचित ठेवण्याचे घटनेचे उद्दिष्ट नाही.याचिका फेटाळल्यासुधारणांमुळे महिला, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या उमेदवारांवर अन्याय होईल, या याचिकाकर्त्यांच्या आरोपात तथ्य नाही. तसे एकही उदाहरण याचिकाकर्त्यांनी समोर आणले नाही. तसे झाले असल्यास उमेदवाराला कायदेशीर कारवाईचे अन्य मार्ग आहेत, असे म्हणत उच्च न्यायालयाने सर्व याचिका फेटाळल्या.

टॅग्स :Courtन्यायालय