शहरं
Join us  
Trending Stories
1
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
2
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
3
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
4
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
5
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
6
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
7
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
8
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
9
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
10
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
11
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
12
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
13
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
14
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
15
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
16
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
17
'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला
18
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
19
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
20
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!

बहुउमेदवार पद्धत वैध; उच्च न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 01:35 IST

राज्य सरकारने महाराष्ट्र महापालिका कायदा, महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत, औद्योगिक वसाहत कायदा, १९६५ मध्ये सुधारणा करून, सुरू केलेली बहुउमेदवार पद्धत व नगराध्यक्षांच्या थेट निवडणूक पद्धत घटनाबाह्य नाही.

मुंबई : राज्य सरकारने महाराष्ट्र महापालिका कायदा, महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत, औद्योगिक वसाहत कायदा, १९६५ मध्ये सुधारणा करून, सुरू केलेली बहुउमेदवार पद्धत व नगराध्यक्षांच्या थेट निवडणूक पद्धत घटनाबाह्य नाही. महापालिका, नगर परिषदा व नगर पंचायतींचा कारभार योग्य प्रकारे चालण्यासाठी संबंधित कायद्यात सुधारणा करण्याचा अधिकार विधिमंडळाला घटनेनेच दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कायद्यात केलल्या सुधारणा वैध आहेत, असा महत्त्वाचा निर्णय उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिला.राज्य सरकारने गेल्या महापालिका, नगर पंचायतींच्या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्र महापालिका कायदा, महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत आणि औद्योगिक वसाहत कायदा, १९६५ मध्ये सुधारणा करत, बहुउमेदवार निवडणूक पद्धत अंमलात आणली. मतदाराला एकापेक्षा जास्त मत देण्याचा अधिकार दिला. नगराध्यक्षांच्या थेट निवडणूक घेण्याचीही तरतूद केली. या सर्व सुधारित कायद्यांना भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर व अन्य काही जणांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावरील सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे होती.याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, बहुउमेदवार पद्धत सुरू करून, राज्य सरकार महिला व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील उमेदवारांवर अन्याय करत आहे, तसेच एका मतदाराला एकापेक्षा अधिक मते देण्याचा अधिकार देण्यासंदर्भात कायद्यातील तरतूद बेकायदा आहे.मुंबई पालिकेसाठी वेगळा कायदा व अन्य महापालिकांसाठी वेगळा कायदा लावून भेदभाव करत घटनेचे उल्लंघन केले, असा युक्तिवाद अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.‘मुंबई महापालिकेची स्वत:ची वैशिष्ट्ये आहेत. या महापालिकेबरोबर राज्यातील अन्य महापालिकांची तुलना करता येणार नाही. या महापालिकेत २७२ प्रभाग आहेत, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे या महापालिकेच्या निवडणुकीत बहुउमेदवार पद्धत राबविणे अशक्य नसले तरी कठीण आहे. मुंबई महापालिकेला ही पद्धत राबविली नाही, म्हणून ती घटनाबाह्य ठरत नाही, असे न्यायालयाने म्हटले.महापालिकांनी निवडणुका कशा घ्यायच्या, हे ठरविण्याचा अधिकार घटनेच्या अनुच्छेद २४३ आर अंतर्गत राज्य सरकारला आहे. महापालिका, नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यापासून ते या स्थानिक स्वायत्त संस्थांना प्रशासनांना अधिकार देण्यापासून विधिमंडळाला वंचित ठेवण्याचे घटनेचे उद्दिष्ट नाही.याचिका फेटाळल्यासुधारणांमुळे महिला, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या उमेदवारांवर अन्याय होईल, या याचिकाकर्त्यांच्या आरोपात तथ्य नाही. तसे एकही उदाहरण याचिकाकर्त्यांनी समोर आणले नाही. तसे झाले असल्यास उमेदवाराला कायदेशीर कारवाईचे अन्य मार्ग आहेत, असे म्हणत उच्च न्यायालयाने सर्व याचिका फेटाळल्या.

टॅग्स :Courtन्यायालय