शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

एमपीएससीचा ‘बाजार’

By admin | Updated: June 8, 2015 01:51 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) बनावट प्रश्नपत्रिका १५ लाखांत विकणाऱ्या आठ जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी औरंगाबादेतून रविवारी पहाटे गजाआड केले.

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) बनावट प्रश्नपत्रिका १५ लाखांत विकणाऱ्या आठ जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी औरंगाबादेतून रविवारी पहाटे गजाआड केले. याच बंगल्यात प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांनाही अटक करण्यात आली. प्रतापसिंग काकरवाल हा या टोळीचा म्होरक्या असून, मिर्झा मोहसीन अहेमद , रोहित गिरी , नीलेश वाघ , गणेश मैद , रामेश्वर पवार , भोलेशंकर साबळे आणि परीक्षार्थी अर्जुन बमनावत, कृष्णा मारक , ओमनाथ ऊर्फ किशोर राठोड , संदीप मातेरे , संदीप शिंदे , भानुदास बोर्डे , दत्तात्रय गोराडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. काकरवाल याच्या मोबाईलवर व्हॉटस्अ‍ॅपवरून बनावट प्रश्नपत्रिका पाठविणारा श्रीनिवास बनसोडे मात्र, फरार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने ७ जून रोजी विक्रीकर निरीक्षक पदाकरिता स्पर्धा परीक्षा आयोजित केली होती़ या परीक्षेची प्रश्नपत्रिका काही परीक्षार्थींना पुरविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस दोन दिवसांपासून टोळीच्या मागावर होते. शनिवारी रात्री साडेदहा वाजता सुरू झालेली शोधमोहीम रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सिडको एन-४ मधील समृद्धीनगरातील एका घरावर येऊन थांबली. या घराच्या प्रवेशद्वारावर दोन बाऊंन्सर, तर घरात अन्य १२ जण होते. यातील सहा जण प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करीत होते. या सर्वांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरूद्ध मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)प्रत्येकी पंधरा लाखांत सौैदाकाकरवाल याने परीक्षार्थीना फसविण्याच्या उद्देशानेच त्यांना लोकसेवा आयोगाची प्रश्नपत्रिका मिळवून देण्याचे खोटे सागितले. त्याकरिता त्याने काही एजंटही नेमले होते. एजंटमार्फत ७ जून रोजी कर सहायक परीक्षेला बसलेल्या उमेदवारांचा त्याने शोध घेतला. यात आठ उमेदवार त्याच्या गळाला लागले. फरारी बनसोडे याने काकरवालच्या मोबाईलवर व्हॉटस्अ‍ॅपद्वारे प्रश्नपत्रिका संच पाठविला. याच्या बदल्यात प्रत्येक उमेदवारासोबत बारा ते पंधरा लाख रुपयांचा व्यवहार केल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला गोपनीय अहवालएमपीएससीची ही परीक्षा सकाळी दहा ते दुपारी एक वाजेदरम्यान होती. पण सकाळी सात वाजता पोलिसांनी प्रश्नपत्रिकेच्या सत्यतेबाबत खात्री करण्याकरिता जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंग यांच्याकडे गोपनीय अहवाल पाठविला. पाठोपाठ जिल्हाधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमली. आयोगाकडून प्राप्त झालेल्या विविध प्रश्नपत्रिकांचा संच आणि जप्त केलेली प्रश्नपत्रिकेची पडताळणी करण्यात आली. त्यात जप्त केलेला संच पूर्णत: वेगळा असल्याचे समोर आले.