शहरं
Join us  
Trending Stories
1
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
2
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
3
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
4
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
5
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
6
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
7
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
8
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
9
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
10
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
11
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
12
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
13
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
14
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
15
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
16
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
17
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
18
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
19
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
20
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी

MPSC Results: राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 19:46 IST

MPSC Results: साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात अव्वल आला आहे. तर मानसी पाटील मुलींमध्ये प्रथम आली आहे.

पुणे: सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या (एसईबीसी)आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारित अंतिम निकाल जाहीर केला आहे. त्यानुसार सर्वसाधारण प्रवर्गातून प्रसाद चौगुले यांनी प्रथम क्रमांकाने यश संपादन केले आहे. रोहन कुवर यांनी मागासवर्गीय प्रवर्गातून तर मानसी पाटील यांनी मुलींमधून प्रथम कमांक पटकावला आहे.

एसईबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. आरक्षणाबाबत निर्णय जाहीर होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यापूर्वी घेतलेल्या परीक्षांचा निकाल जाहीर करू नये. तसेच नवीन पदांसाठी भरती करू नये,अशी भूमिका विविध स्तरावरून मांडण्यात आली.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य शासनाने भरती प्रक्रियेबाबत अध्यादेश प्रसिध्द केला. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरीता आरक्षित असलेली पदे खुल्या पदांमध्ये रुपांतरित करण्यात आली. त्यानुसार 420 पदांचा सुधारित निकाल जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा 2019 चा अंतिम निकाल जाहीर करण्यापूर्वी ‘ऑप्टिंग आऊट ’मागवले होते. त्यामुळे काही उमेदवारांनी स्वत:हून आपला समावेश या निकालात करू नये, असे आयोगाला कळवले होते.परिणामी सुधारित निकालामुळे कोणतीही नियुक्ती न मिळता बाहेर फेकल्या जाणा-या अनेक उमेदवारांचा फायदा झाला आहे. मात्र,पूर्वीच्या निकालात समावेश असणा-या काही उमेदवारांना सुधारित निकालाचा फटका बसला आहे.परंतु,या उमेदवारांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकी असल्याचे सुधारित निकालात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून सांगितले जात आहे.ऑप्टिंग आऊट म्हणजे काय ? राज्यसेवा 2019 च्या अंतिम निकालातून मिळणारे पद ज्या उमेदवारांना नको आहे, अशा उमेदवारांनी आपली नावे आयोगाला कळवावीत,असे आवाहन केले होते. त्यानुसार काही उमेदवरांनी आयोगाच्या आव्हाना प्रतिसाद दिला. परिणामी आरक्षण बदलामुळे बाहेर फेकल्या जाणा-या उमेदवरांना या पदांवर नियुक्ती देणे शक्य झाले.काही उमेदवार सध्या शासकीय सेवेत असून त्यांना पदोन्नती मिळाली आहे. राज्यसेवा 2019 च्या अंतिम निकालतून त्यांना कनिष्ठ स्तरावरील पद मिळाले असले.त्यामुळे आॅप्टिंग आऊटचा अनेकांना फायदा झाला.

राज्य शासनाच्या चालढकल धोरणामुळे सुमारे एक वर्ष उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही.त्यामुळे शासनाने अधिक विलंब न करता पुढील 15 दिवसात नियुक्तीपद द्यावे.- महेश पांढरे, उत्तीर्ण उमेदवार

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा