शहरं
Join us  
Trending Stories
1
भ्रष्टाचारावर 'महागडी' नजर! ७० लाखाच्या BMW कारमधून फिरणार लोकपाल; ड्रायव्हर्सनाही ट्रेनिंग
2
Mumbai Fire: जोगेश्वरीमध्ये अग्नितांडव! जेएमएस बिझनेस सेंटरला भीषण आग, अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु
3
बँकेकडून पर्सनल लोन अप्रुव्ह झालंय? तरी अ‍ॅग्रीमेंटवर सही करण्यापूर्वी या गोष्टी नक्की तपासा, पाहा डिटेल्स
4
Rohit Sharma Record: हिटमॅन रोहितनं वेळ घेतला; मग पुल शॉटसह बॅक टू बॅक सिक्सर मारत सेट केला महारेकॉर्ड
5
"ते मनापासून बोलले, म्हणूनच..."; मराठी अभिनेत्री मेघा धाडेचा महेश कोठारेंना पाठिंबा, म्हणाली-
6
रशियाच्या अर्थकारणाला थेट धक्का; जगातील सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला!
7
तुमच्या कुंडलीत आहे का महाभाग्य योग? अकल्पनीय यश, अमाप धन; अनपेक्षित लाभ, भाग्योदय-भरभराट!
8
मुंबई एअरपोर्टवर १९ कोटींचे ड्रग्ज जप्त; दोन दिवसांत दोन मोठे गुन्हे उघड, कस्टम्सच्या कारवाईत तिघांना अटक!
9
Pak General On India: भारताची ताकद बघून पाकिस्तान हादरला! पाकिस्तानी जनरल म्हणाले, "आम्ही एकटे..."
10
Diwali Accident: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! १५० रुपयांची कार्बाइड गन बेतली जीवावर, १२५ जणांनी गमावली दृष्टी
11
माकड आलं अन् दुचाकीची चावी घेऊन गेलं, इचलकरंजी येथील गमतीशीर प्रकार
12
वालूरात दोन ठिकाणी दरोडेखोरांचा हल्ला; एका घटनेत आजी गभीर जखमी, नातू ठार, दुसऱ्या घटनेत वृद्ध दांपत्य जखमी
13
भारतासाठी बांगलादेशमधून खुशखबर! निवडणुकीपूर्वी हंगामी युनूस सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
14
"बंदुकीचा धाक दाखवून रशियासाठी युद्ध लढण्यास..."; भारतीय तरुणाचा धक्कादायक Video
15
केवळ ₹५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; १५ वर्षांत बनवाल मोठा रिटायरमेंट फंड, जबरदस्त आहे सरकारी स्कीम
16
Virat Kohli : पहिल्यांदाच आली ही वेळ! चाहत्यांचे आभार मानत कोहलीनं ॲडलेडला केलं अलविदा? (VIDEO)
17
टाटा ट्रस्टमधील वाद थांबेनात! आता ट्रस्टी मेहली मिस्त्रींनी ठेवली नवी अट, काय होणार बदल?
18
"फटाका इन्व्हर्टरवर पडला, संपूर्ण इमारतीची राख..."; इंदिरापुरममध्ये भीषण आग, नेमकं काय घडलं?
19
दिल्लीत 'कॉन्ट्रॅक्ट किलर' गँगचा थरारक शेवट; एन्काऊंटरमध्ये ४ ठार, बिहार निवडणुकीसाठी रचला होता कट
20
पतीच्या हातात ब्रेसलेट पाहून नाराज, मंगळसूत्र न मिळाल्याने हेल्थ ऑफिसरने मारली नदीत उडी

"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 12:44 IST

Asaduddin Owaisi: पहलगाम हल्ल्यानंतर इशारा देणाऱ्या पाकिस्तानला आयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सुनावले आहे.

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात आक्रोश निर्माण झाला आहे. या नसरंसहारामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पाकिस्तान असल्याचा आरोप भारताकडून करण्यात येत आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेत कठोर निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच पाकिस्तान आता भारताला धमक्या देत आहे. अशातच भारतातून सर्वपक्षीय नेत्यांकडून पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या वक्तव्यांनाचा निषेध नोंदवण्यात येत आहे. एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. काश्मीर आपला भाग होता, आहे आणि राहील आणि काश्मिरी देखील आपला भाग आहेत, असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल पाकिस्तानवर पुन्हा टीका करताना एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी  पाकिस्तान भारतापेक्षा अर्ध युग मागे असल्याचे म्हटलं. पाकिस्तान, आयसिस आणि लश्कर ए तोयबा हे भारतातील हिंदू आणि मुस्लिमांमध्ये अधिक द्वेष पसरवायला पाहत आहेत. पण त्यांचे कट उधळून लावण्यासाठी आपल्याला एकजूट राहावे लागेल, असेही असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं.

ओवैसी हे परभणी येथे नव्या वक्फ कायद्याच्या निषेधार्थ जाहीर सभेत बोलत होते. "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास नाही तर अर्ध युग मागे आहात.  पाकिस्तानी नेत्यांनी उगाच भारताला धमक्या देऊ नयेत. तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही. पाकिस्तान वारंवार म्हणतो की त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहेत. लक्षात ठेवा, जर तुम्ही दुसऱ्या देशात जाऊन निष्पाप लोकांना मारले तर कोणताही देश गप्प बसणार नाही. तुम्ही कोणत्या धर्माबद्दल बोलत आहात? तुम्ही वाईट आहात. हे कृत्य दाखवत आहे की तुम्ही आयसिसचे उत्तराधिकारी आहात," असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

"पाकिस्तान अनेक वर्षांपासून भारताला लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार भारताला पाकिस्तानी हवाई दलाची नाकेबंदी करण्याची आणि हॅकर्सचा वापर करून त्यांचे इंटरनेट हॅक करण्याची परवानगी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. देशाच्या पंतप्रधानांना सांगायचे आहे की जेव्हा काश्मीर आमचा अविभाज्य भाग आहे असं म्हटलं जातं तेव्हा काश्मिरी देखील आमचे आहेत.काश्मीर आमचा भाग होता, आहे आणि राहील आणि काश्मिरी देखील आमचेच आहेत," असेही असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीPakistanपाकिस्तान