शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 12:44 IST

Asaduddin Owaisi: पहलगाम हल्ल्यानंतर इशारा देणाऱ्या पाकिस्तानला आयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सुनावले आहे.

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात आक्रोश निर्माण झाला आहे. या नसरंसहारामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पाकिस्तान असल्याचा आरोप भारताकडून करण्यात येत आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेत कठोर निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच पाकिस्तान आता भारताला धमक्या देत आहे. अशातच भारतातून सर्वपक्षीय नेत्यांकडून पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या वक्तव्यांनाचा निषेध नोंदवण्यात येत आहे. एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. काश्मीर आपला भाग होता, आहे आणि राहील आणि काश्मिरी देखील आपला भाग आहेत, असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल पाकिस्तानवर पुन्हा टीका करताना एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी  पाकिस्तान भारतापेक्षा अर्ध युग मागे असल्याचे म्हटलं. पाकिस्तान, आयसिस आणि लश्कर ए तोयबा हे भारतातील हिंदू आणि मुस्लिमांमध्ये अधिक द्वेष पसरवायला पाहत आहेत. पण त्यांचे कट उधळून लावण्यासाठी आपल्याला एकजूट राहावे लागेल, असेही असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं.

ओवैसी हे परभणी येथे नव्या वक्फ कायद्याच्या निषेधार्थ जाहीर सभेत बोलत होते. "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास नाही तर अर्ध युग मागे आहात.  पाकिस्तानी नेत्यांनी उगाच भारताला धमक्या देऊ नयेत. तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही. पाकिस्तान वारंवार म्हणतो की त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहेत. लक्षात ठेवा, जर तुम्ही दुसऱ्या देशात जाऊन निष्पाप लोकांना मारले तर कोणताही देश गप्प बसणार नाही. तुम्ही कोणत्या धर्माबद्दल बोलत आहात? तुम्ही वाईट आहात. हे कृत्य दाखवत आहे की तुम्ही आयसिसचे उत्तराधिकारी आहात," असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

"पाकिस्तान अनेक वर्षांपासून भारताला लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार भारताला पाकिस्तानी हवाई दलाची नाकेबंदी करण्याची आणि हॅकर्सचा वापर करून त्यांचे इंटरनेट हॅक करण्याची परवानगी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. देशाच्या पंतप्रधानांना सांगायचे आहे की जेव्हा काश्मीर आमचा अविभाज्य भाग आहे असं म्हटलं जातं तेव्हा काश्मिरी देखील आमचे आहेत.काश्मीर आमचा भाग होता, आहे आणि राहील आणि काश्मिरी देखील आमचेच आहेत," असेही असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीPakistanपाकिस्तान