शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 12:39 IST

Asaduddin Owaisi: पहलगाम हल्ल्यानंतर इशारा देणाऱ्या पाकिस्तानला आयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सुनावले आहे.

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात आक्रोश निर्माण झाला आहे. या नसरंसहारामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पाकिस्तान असल्याचा आरोप भारताकडून करण्यात येत आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेत कठोर निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच पाकिस्तान आता भारताला धमक्या देत आहे. अशातच भारतातून सर्वपक्षीय नेत्यांकडून पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या वक्तव्यांनाचा निषेध नोंदवण्यात येत आहे. एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. काश्मीर आपला भाग होता, आहे आणि राहील आणि काश्मिरी देखील आपला भाग आहेत, असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल पाकिस्तानवर पुन्हा टीका करताना एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी  पाकिस्तान भारतापेक्षा अर्ध युग मागे असल्याचे म्हटलं. पाकिस्तान, आयसिस आणि लश्कर ए तोयबा हे भारतातील हिंदू आणि मुस्लिमांमध्ये अधिक द्वेष पसरवायला पाहत आहेत. पण त्यांचे कट उधळून लावण्यासाठी आपल्याला एकजूट राहावे लागेल, असेही असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं.

ओवैसी हे परभणी येथे नव्या वक्फ कायद्याच्या निषेधार्थ जाहीर सभेत बोलत होते. "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास नाही तर अर्ध युग मागे आहात.  पाकिस्तानी नेत्यांनी उगाच भारताला धमक्या देऊ नयेत. तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही. पाकिस्तान वारंवार म्हणतो की त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहेत. लक्षात ठेवा, जर तुम्ही दुसऱ्या देशात जाऊन निष्पाप लोकांना मारले तर कोणताही देश गप्प बसणार नाही. तुम्ही कोणत्या धर्माबद्दल बोलत आहात? तुम्ही वाईट आहात. हे कृत्य दाखवत आहे की तुम्ही आयसिसचे उत्तराधिकारी आहात," असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

"पाकिस्तान अनेक वर्षांपासून भारताला लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार भारताला पाकिस्तानी हवाई दलाची नाकेबंदी करण्याची आणि हॅकर्सचा वापर करून त्यांचे इंटरनेट हॅक करण्याची परवानगी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. देशाच्या पंतप्रधानांना सांगायचे आहे की जेव्हा काश्मीर आमचा अविभाज्य भाग आहे असं म्हटलं जातं तेव्हा काश्मिरी देखील आमचे आहेत.काश्मीर आमचा भाग होता, आहे आणि राहील आणि काश्मिरी देखील आमचेच आहेत," असेही असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीPakistanपाकिस्तान