शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

...तर प्रेमवीरांना मोगली एरंडांनी सुजविणार !

By admin | Published: February 11, 2017 11:56 PM

धोक्याची घंटा : गड-किल्ल्यांवर व्हॅलेंटाईन डे साजरा न करण्याचे ‘मराठा क्रांती ग्रुप’चे आवाहन

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास सांगणाऱ्या गड-किल्ल्यांवर फिरकणाऱ्या प्रेमवीरांना यंदा मोगली एरंडांनी सुजविण्याचा दम मराठा क्रांती ग्रुपच्या वतीने देण्यात आला आहे.सातारा जिल्ह्यात नामांकित गड आणि किल्ले आहेत. इतिहासातील अनेक आठवणी आणि शूर इतिहासाचे साक्षीदार असलेले हे गड आणि किल्ले आता प्रेमवीरांचे अड्डे झाले आहेत. एकांतात नको ते चाळे करून किल्ल्यावर सहकुटुंब येणाऱ्यांना लाज वाटेल, असे वर्तन येथे प्रेमवीरांकडून केले जाते. व्हॅलेंटाईन डे दिवशीही महाविद्यालयांना दांड्या मारून झुंडीने तरुणाई निसर्गाच्या कुशीत अर्थातच गड-किल्ल्यांवर पोहोचते. सज्जनगड, अजिंक्यतारा, प्रतापगड, वर्धनगड आदी गडांवर या दिवशी तरुणाईची तुफान गर्दी असते. येथे येणाऱ्या इतिहासप्रेमींची यामुळे भलतीच गोची होते. यंदा व्हॅलेंटाईन डे मंगळवारी आला आहे. सातारा एमआयडीसीतील अनेक कामगार व कर्मचारी त्यांच्या साप्ताहिक सुटीचा दिवस सहकुटुंब किल्ल्यावर जातात. त्यावेळी प्रेमीयुगुलांचे चाळे त्रासदायक ठरतात. त्यामुळे मराठा क्रांती ग्रुपच्या स्वयंसेवकांनी व्हॅलेंटाईन डे दिवशी हे आंदोलन छेडले आहे. (प्रतिनिधी)मुलांना सडकणार... मुलींच्या घरातल्यांना बोलवणारप्रेमवीरांनी आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी गड-किल्ले सोडून कुठेही जाण्याला या ग्रुपचा विरोध नाही. पण चुकून जर कोणी जोडपे त्यांना गड-किल्ल्यावर आढळले तर त्यांना शिक्षा काय देण्यात यावी याविषयी त्यांनी ठरवले आहे. मुलांना मोगली एरंडांनी फटके देण्यात येणार आहेत, तर मुलींच्या घरातल्यांना फोन करून बोलवून त्यांना याविषयीची माहिती देऊन मगच मुलींना सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचं किंवा न करण्याचा अधिकार व्यक्तीगत आहे. त्यामुळे त्या अधिकारावर आम्ही आक्षेप घेणार नाही. पण गड-किल्ल्याच्या आश्रयाने प्रेमवीरांचे ओघळवाणे वर्तन आम्ही कदापि सहन करणार नाही. गड-किल्ल्यावर घडणाऱ्या अनैतिक प्रकारांवर हा हल्लाबोल असणार आहे. - राहुल भोसले, मराठा क्रांती ग्रुप, सातारासहभागी होण्याचे आवाहनमराठा क्रांती ग्रुपच्या वतीने सातारा तालुक्यातील गड-किल्ल्यांवर प्रेमवीरांना अटकाव करण्यात येणार आहे. याबरोबरच जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही स्वयंस्फूर्तीने कार्यकर्त्यांनी या मोहिमेत आपापल्या भागासाठी सामील होण्याचे आवाहन राहुल भोसले यांनी केले आहे.मोगली एरंडंच का?पूर्वी साप निघाले की लोक मोगली एरंडांने या सापांना मारायचे. या एरंडाचा जोराचा फटका बसला तर शरीरावर झिणझिण्या येतात. त्यामुळे मार लागलेला भाग सुजतो. विशेष म्हणजे गड-किल्ल्यांवर मोगली एरंडं मुबलक सापडते. त्यामुळे जोडपे दिसले की हे एरंडं तोडून मग प्रेमवीराला ‘प्रसाद’ मिळणार आहे.