शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये फिल्म अर्काइव्ह !

By admin | Updated: August 23, 2016 19:01 IST

भारतीय चित्रपटांचा अमूल्य ठेवा जतन व्हावा यादृष्टीने एनएफएआयच्या धर्तीवरच विविध राज्यातील प्रमुख शहरांमध्ये फिल्म अर्काइव्ह सुरू करण्यात येणार आहेत

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. २३ : भारतीय चित्रपटांचा अमूल्य ठेवा जतन व्हावा यादृष्टीने एनएफएआयच्या धर्तीवरच विविध राज्यातील प्रमुख शहरांमध्ये फिल्म अर्काइव्ह सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी कर्नाटक आणि केरळ याठिकाणाहून प्रस्ताव आले आहेत. चित्रपट संवर्धनाच्या दृष्टीने अर्काइव्ह स्थापन करण्याची इच्छा असलेल्या राज्यांना केंद्राकडून आर्थिक तसेच तांत्रिकदृष्ट्या यंत्रणा उभारण्यास सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल यांनी दिली.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) येथे नँशनल फिल्म हेरिटेज मिशन ची पुढील रूपरेषा ठरविण्याबरोबरच उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. त्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयांची माहिती मित्तल यांनी पत्रकारांना दिली. याप्रसंगी मंत्रालयाचे अतिरिक्त  सचिव आणि आर्थिक सल्लागार सुभाष शर्मा, सहसचिव संजयमूर्ती, चित्रपट विभागाचे महासंचालक मुकेश शर्मा, एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम, नँशनल फिल्म हेरिटेजचे मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अजमेरा आणि डी.जे  नारायण उपस्थित होते.

संपूर्ण देशभरामध्ये एकमेव राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे पुण्यात आहे, याच ठिकाणी देशभरासह विदेशातील चित्रपटांचे संकलन करून त्याचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम केले जाते. प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांचे देखील जतन व्हावे यासाठी त्या त्या भागातील राज्य सरकारने ह्यफिल्म अर्काइव्हह्ण स्थापन करण्यासंबंधी पुढाकार घेण्याची गरज आहे.

सध्या केरळ आणि कर्नाटक राज्यांकडून असे प्रस्ताव आले आहेत. चित्रपट जतनासाठी प्रादेशिक अर्काइव्ह निर्मित करण्यास इच्छुक असणा-या राज्यांना केंद्राकडून आर्थिक निधीसह तांत्रिकदृष्ट्या सहकार्य केले जाईल. तसेच विविध विद्यापीठांसहशैक्षणिक संस्थांमध्ये चित्रपट संवर्धनाच्या दृष्टीने एक वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करण्याकरिता विद्यापीठांशी चर्चा करण्यात आली असून, यासाठी 40 विद्यापीठांची निवड करण्यात आली आहे. कंपन्यांना सीएसआरनुसार 2 टक्के रक्कम सामाजिक कार्यक्रमांसाठी देता येते, कंपन्यांकडूनही चित्रपटांचे जतन करण्यासाठी निधी स्वीकारला जाईल.

अर्काइव्हसाठी खाजगीकरणाचाही मार्ग आता खुला करण्यात आला असल्याचे मित्तल यांनी स्पष्ट केले. चित्रपटांचे जतन डिजिटल फॉरमँट मध्ये करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. देशविदेशातील विविध भागांमधून चित्रपटांचे संकलन केले जात आहे,कामाच्या तुलनेत मनुष्यबळ कमी असल्याने एनएफएआयमधील कर्मचारी संख्येत दुप्पटीने वाढ करण्याबरोबरच कोथरूडच्या एनएफएआयमध्ये नवीन व्हॉल्टस वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही ते म्हणाले.आकाशवाणी आणि पीआयबी कायम रहाणारपुण्यातील आकाशवाणीसह पीआयबीचे केंद्र बंद होणार?यावरून वाद निर्माण झाले. मात्र दोन्ही केंद्र बंद किंवा स्थलांतरित होणार नाहीत. आकाशवाणीच्या पुणे वृत्तविभागासह प्रेस इंफॉरमेशन ब्युरो (पीआयबी) कायम रहाणार असल्याचे स्पष्टीकरण मित्तल यांनी दिले.एफटीआयआयला पुन्हा नववैभव प्राप्त करून देणारएफटीआयआयची जागतिक स्तरावर वेगळी ओळख आहे. चित्रपट क्षेत्रातील अनेक प्रतिभावंत कलाकारांची फळी संस्थेतून बाहेर पडली आहे. मध्यंतरीच्या काळात जे काही वाईट घडले ते विसरून संस्थेला पुन्हा नववैभव प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे मित्तल यांनी सांगितले.