शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

मराठीच्या अभिजात दर्जासाठी प्रसंगी आंदोलन!

By admin | Updated: February 4, 2017 01:37 IST

मराठी भाषेवर इंग्रजीचे सावट पडले आहे. पण, त्याचे आपल्याला काही वाटेनासे झाले आहे. बोलीभाषेतही आपण सर्रास इंग्रजी शब्दांचा वापर करतो. त्याने भाषा जीर्ण होते आहे.

मराठी भाषेवर इंग्रजीचे सावट पडले आहे. पण, त्याचे आपल्याला काही वाटेनासे झाले आहे. बोलीभाषेतही आपण सर्रास इंग्रजी शब्दांचा वापर करतो. त्याने भाषा जीर्ण होते आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, म्हणून आम्ही केंद्र सरकारकडे न्यायासाठी पाहतो आहोत. त्यांनी न्याय दिला तर ठीक; अन्यथा मराठी जनतेला त्यासाठी आंदोलन करण्यावाचून पर्याय उरणार नाही... साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांच्या भाषणाचा संपादित अंश... श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती व्हायला हवी. प्रत्येक कलाकृती ही जाणकार रसिकांच्या मिठीसाठी आसुसलेली असते. आपली भाषा, आपले साहित्य आणि आपली संस्कृती यांच्यावर वैैश्विक दाबाने आलेल्या आणि वाढत चाललेल्या इंग्रजी सावटाचे रूप आम्हाला समजत नाही, असे नाही. पण, भौतिक संपन्नतेच्या आणि तज्जन्य सुखवादी कल्पनांच्या आहारी गेलेल्या आमच्या समाजाला त्याचे फारसे काही वाटेनासे झाले आहे. भाषा हे शब्दांच्या माध्यमातून मानवी मनांना जुळवणारे साधन आहे. त्या बोलीभाषेत इंग्रजी शब्दांचा भरणा करून अर्थसंपन्न असलेली बोलीभाषा आज लग्नात घेतलेल्या भरजरी शालूसारखी झालेली आहे. हे जीर्ण झालेले महावस्त्र उंच पोतांचे व्हावे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, म्हणून महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. समस्त मराठी जनता अनुकूल निर्णयासाठी केंद्र सरकारकडे आपले डोळे लावून बसली आहे. या दर्जाच्या प्राप्तीसाठी आवश्यक असणाऱ्या निकषांसंदर्भातील सर्व पुरावे केंद्र शासनाला कधीच सादर करण्यात आले आहेत. साहित्य अकादमीच्या मूल्यांकन समितीने महाराष्ट्र शासनाचा दावा मान्य करून केंद्राकडे अनुकूल शिफारस केली आहे. न्यायशील केंद्र सरकार अपेक्षित न्याय प्रदान करील, अशी मी आशा बाळगतो. यथोचित पुरावे दिल्यानंतर निर्णयात दिरंगाई होत असेल; तर मराठी जनतेला यासंदर्भात आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. तथापि, अशी पाळी केंद्र सरकार आमच्यावर येऊ देणार नाही, अशी मला आशा वाटते. असा दर्जा मिळणे, हा मराठी भाषेचा जन्मसिद्ध हक्क आहे. शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ विश्वाविषयी, व्यक्तीविषयी, व्यक्तीसमूहांविषयी विज्ञानाच्या आणि तत्वज्ञानाच्या पातळीवर जगाला ज्ञानसंपन्न करीत असतात. तशी ज्ञाननिर्माणशक्ती आणि ज्ञानसंपन्नता लेखकांजवळ नसली तरी श्रेष्ठ लेखकांची स्वत:ची म्हणून एक क्षमता असते. ती केवळ ग्रंथ अभ्यासून आलेली नसते. नैसर्गिक प्रतिभाबळामुळे आलेली ती एक आगळी विश्वप्रचीतीच असते. तिचा दर्जा कोणत्या प्रकारचा आहे, ती किती सूक्ष्म आणि अंतर्भेदी आहे, यावर जीवनदृष्टी अवलंबून आहे. जीवनदृष्टी म्हणजे जीवनासंबंधी केलेला पोकळ विचार नव्हे. ती लेखकांच्या सहेतूक कृतिपूर्णतेतून सिद्ध होत असते. एरव्ही, जीवनदृष्टीचा दावा करणाऱ्या लेखकांच्या साहित्यविचारात अभिनिवेशापेक्षा अधिक काही असण्याची शक्यता जशी नाही, तशीच त्यांच्या वाड्.मयकृतीतही शब्दावडंबरापेक्षा वेगळे काही असण्याची शक्यताही नाही.जीवनदृष्टी आणि अनुभूती याच्या परस्पर संबंधांचे दिग्दर्शन करीत असताना अनुभूतीविषयी अगत्यपूर्वक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, लेखकाला जगत असताना सातत्याने अनुभव येत असतो, पण येणारा प्रत्येक अनुभव इतका असामान्य, चटका लावणारा, फिरफिरून विचार करायला भाग पाडणारा नसतो की, जो पुढे जाऊन अनुभूतीरूप होऊ शकेल. एकतर, असा असामान्य अनुभव लेखकाला आला पाहिजे किंवा सामान्य अनुभवातून असामान्य जीवनदर्शी अनुभूती त्याला प्राप्त झाली पाहिजे की, जी त्याला साक्षात्कारापर्यंत पोहोचू शकेल, असे काळे यांनी सांगितले. सत्य आणि सत्त्वांचा वेध न घेता मराठीतील अनेक लेखक आयत्या सामग्रीवर आपली निर्मिती करताना दिसतात. पुराणांनी आणि दोन आर्ष महाकाव्यांनी मराठी वाड्.मयाच्या निर्मितीपासूनच आपला प्रभाव टाकला आहे. त्यातील मूळ कथावस्तू, व्यक्ती आणि नाट्यमय प्रसंगाची भारतीय मनावर एवढी मोहिनी आहे की, मराठी लेखक मग तो प्राचीन काळातील असो की अर्वाचीन काळातील, त्याला बळी पडला आहे. ज्ञानेश्वरांसारखा एखादाच कवी त्यातील गीतेसारख्या सामग्रीवर भाष्य करताकरता श्रेष्ठ नवनिर्मितीचा प्रत्यय देऊ शकला. ज्ञानेश्वरीसारखा अपूर्व ग्रंथ लिहिलेल्यावर ही अमृतानुभवांच्या निर्मितीची निकड ज्ञानेश्वरांना का भासली, हे देखील आपल्याला इथे लक्षात येऊ शकेल.पुष्कळदा विशिष्ट प्रकाराची नाटके, कादंबऱ्या, काव्यप्रकार यांची वेगवेगळ्या काळांत लाट उसळते. ती एक वाड्.मयीन फॅशनच होऊन बसते. तशी निर्मिती केली नाही तर जणू काही मागासलेपणाचा शिक्का आपल्यावर बसेल की काय, या भीतीने किंवा त्याप्रकारात लिहून सामान्य लेखक ही मिरवतात. तर, त्यांच्यापेक्षा अधिक चांगले लिहून आपणही का मिरवू नये, या विचाराने काही एक गुणवत्ता प्राप्त झालेले लेखकही त्या लाटेत ओढले जातात. असाच ओढले जाण्याचा प्रकार रंजनवादी साहित्याच्या लोकप्रियतेच्या प्रभावांमुळेही घडून येतो. रंजनप्रधान साहित्य ही विशिष्ट वाचन अभिरुचीची अपरिहार्य गरज असते. जाणीवपूर्वक रसिकरंजनाचीच भूमिका स्वीकारणाऱ्या कवी, लेखकांची उद्दिष्ट्ये अगदी स्पष्ट असतात. त्यानुसार आपल्या ललितकृतीची रचना ते कृत्रिम पद्धतीने करतात. समीक्षा हा ललित लेखकाला खिंडीत गल्ला चढवणारा आणि युयुत्सुपणाचे बिरुद मिळवणारा भयपुरुष नाही. मूलत: तो रसिक आस्वादक असून साहित्य कृतीचा सरंक्षक आणि सुबुद्ध, सुसंस्कृत, प्रशंसक आहे. शास्त्र काट्याच्या कसोटीवर ललितकृतीला तोलून पाहणे हा त्याचा धर्म आहे. समीक्षा भयरूपिणी नाही. तिने तसे असू नये. ती ललित कृतीची धाकटी जिवलग सखी आहे, तिचे कौतुक करणारी प्रसंगी मोठेपणा धारण करून शहाणपणाच्या चार गोष्टी सांगणारी. तिचे अस्तित्व स्वतंत्र नाही हे खरेच, पण वाड्.मयीन संस्कृतीच्या जडणघडणीत तिचे स्थान अपरिहार्य आहे, हे तेवढेच खरे.