शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

आसनपोई ग्रामस्थांचे मंगळवारी आंदोलन

By admin | Updated: May 30, 2016 02:26 IST

स्फोटक उत्पादनामुळे हैराण झालेल्या आसनपोई ग्रामस्थांनी ३१ मे रोजी (मंगळवार) कारखाना प्रवेशद्वारासमोर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला

महाड : महाड औद्योगिक क्षेत्रातील आसनपोई गावालगतच असलेल्या लक्ष्मी आॅरगॅनिक्स या कारखान्यातील प्रदूषणकारी आणि स्फोटक उत्पादनामुळे हैराण झालेल्या आसनपोई ग्रामस्थांनी ३१ मे रोजी (मंगळवार) कारखाना प्रवेशद्वारासमोर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदूषणकारी कारखाना आणि उत्पादन त्वरित बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषदेत केली.लक्ष्मी आॅरगॅनिक्स या कारखान्याचे हे औद्योगिक वसाहतीतील दुसरे युनिट असून या कारखान्यात डोयकोटेन नावाचे रासायनिक उत्पादन घेतले जाते. यापूर्वी या कारखान्यात लहान-मोठे स्फोट झाले आहेत. २७ फेब्रुवारीला या कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे आसनपोई गावातील घरांच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. तसेच ध्वनी व वायूप्रदूषणामुळे ग्रामस्थांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. याबाबत प्रशासनाला वारंवार या कारखान्याबाबत तक्रारी करूनही तसेच कारखाना बंद करण्याची मागणी करूनही प्रशासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला. आरोग्य विभागाने केलेल्या आरोग्य तपासणीवर गावातील २८ जणांना क्षयरोग, कॅन्सर तसेच घशाचे आजार, त्वचेचे विकार झाले असल्याची बाब उघडकीस आली असून महिलांनाही मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे आजार बळावत असल्याचे समोर आलेले आहे. स्थानिक प्रशासन याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याने ग्रामस्थांनीच कारखाना बंद करण्यासाठी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. याबाबत प्रांताधिकारी, पोलीस विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ या सर्वांना कळवूनही याबाबत कुठलीही दखल घेतली गेली नाही. उलटपक्षी आंदोलन केल्यास ग्रामस्थांवर कारवाई करा, अशा सूचना प्रशासनाने दिल्याने यावेळी ग्रामस्थांनी प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांच्यावर संताप व्यक्त केला. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत जाधव, लक्ष्मण गरुड, सरपंच वसंत खोपडे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.खोटे सांगून उभारला कारखानाकारखान्याच्या प्रशासनाने आपल्याला या जागेत साठवण टाक्या उभ्या करायच्या असल्याचे सांगून ग्रामपंचायतीची ना हरकत परवानगी घेतली. मात्र त्या ठिकाणी प्रत्यक्ष कारखान्याची उभारणी करून ग्रामस्थांची फसवणूक केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी यावेळी केला. डोंबिवलीसारख्या घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने कठोरपणे पावले उचलावीत, अशी मागणी या पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी केली. ध्वनी व वायूप्रदूषणामुळे ग्रामस्थांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. याबाबत प्रशासनाला वारंवार या कारखान्याबाबत तक्रारी करूनही तसेच कारखाना बंद करण्याची मागणी करूनही प्रशासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी के ला.