शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘मदर स्कूल’ रोखणार ‘माध्यमिक’ची गळती!

By admin | Updated: November 7, 2016 06:05 IST

प्राथमिक शाळेतील गळती रोखण्यासाठी शिक्षण विभागाने काढलेला ‘सेल्फी’चा आदेश वादग्रस्त ठरत असताना आता माध्यमिक शाळांमध्ये गळती रोखण्याची जबाबदारी ‘मदर स्कूल’वर टाकण्यात आली आहे.

धुळे : प्राथमिक शाळेतील गळती रोखण्यासाठी शिक्षण विभागाने काढलेला ‘सेल्फी’चा आदेश वादग्रस्त ठरत असताना आता माध्यमिक शाळांमध्ये गळती रोखण्याची जबाबदारी ‘मदर स्कूल’वर टाकण्यात आली आहे.माध्यमिक स्तरांवरील शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण विभागाप्रमाणे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये गुणवत्ता वाढ व विद्यार्थ्यांची गळती रोखण्यावर भर देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात सर्वाधिक मुले असलेल्या शाळांना यापुढे ‘मदर स्कूल’ संबोधण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षण पूर्ण करून काही मुले माध्यमिक शाळेत जात नसल्यास त्यांना शोधून पटावर आणण्याची जबाबदारी ‘मदर स्कूल’वर टाकण्यात आलेली आहे.माध्यमिक शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक गावासाठी ‘मदर स्कूल’ निश्चित कराव्यात. त्या शाळांच्या माध्यमातून इयत्ता आठवी पास सर्व विद्यार्थी इयत्ता नववीत दाखल होतील, याची खात्री करावी. १०० टक्के मुलांच्या प्रवेशाची शहानिशा करण्यासाठी ‘सरल’ संगणक प्रणालीचा वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या मूल्यांकनात राज्याला प्रथम तीन क्रमांकात आणण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागाने ठेवले आहे. भाषा, गणितावर भरकार्यक्रमाच्या सुरुवातीची दोन वर्षे फक्त भाषा व गणितातील क्षमता वाढविण्यासाठी देण्यात येणार आहे. नववीची १०० टक्के मुले दहावीत आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे शाळांकडून नववीत मुलांना मुद्दाम नापास करण्याला चाप बसणार आहे.विद्यार्थी व शिक्षकांच्या हजेरीसाठी प्रत्येक शाळेच्या पातळीवर बायोमेट्रिकची बोगस उपस्थिती नोंदवण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे.विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाची भीती दूर व्हावी म्हणून स्पोकन इंग्लिशवर भर देण्यात येणार आहे. त्यात श्रवण, लेखन व संभाषण कौशल्याचा समावेश असेल. माध्यमिकशाळाही लोकसहभागातूनडिजिटल व ई-लर्निंग करण्यावर भर असेल. (प्रतिनिधी)