शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
2
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
3
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
4
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
5
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
6
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
7
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
8
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
9
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
10
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
11
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
12
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
13
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
14
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
15
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
16
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
17
Mumbai: नवरात्री दांडिया कार्यक्रमात राडा, जमावाकडून तरुणाला मारहाण, गोरेगाव येथील घटना!
18
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
19
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!

‘मदर स्कूल’ रोखणार ‘माध्यमिक’ची गळती!

By admin | Updated: November 7, 2016 06:05 IST

प्राथमिक शाळेतील गळती रोखण्यासाठी शिक्षण विभागाने काढलेला ‘सेल्फी’चा आदेश वादग्रस्त ठरत असताना आता माध्यमिक शाळांमध्ये गळती रोखण्याची जबाबदारी ‘मदर स्कूल’वर टाकण्यात आली आहे.

धुळे : प्राथमिक शाळेतील गळती रोखण्यासाठी शिक्षण विभागाने काढलेला ‘सेल्फी’चा आदेश वादग्रस्त ठरत असताना आता माध्यमिक शाळांमध्ये गळती रोखण्याची जबाबदारी ‘मदर स्कूल’वर टाकण्यात आली आहे.माध्यमिक स्तरांवरील शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण विभागाप्रमाणे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये गुणवत्ता वाढ व विद्यार्थ्यांची गळती रोखण्यावर भर देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात सर्वाधिक मुले असलेल्या शाळांना यापुढे ‘मदर स्कूल’ संबोधण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षण पूर्ण करून काही मुले माध्यमिक शाळेत जात नसल्यास त्यांना शोधून पटावर आणण्याची जबाबदारी ‘मदर स्कूल’वर टाकण्यात आलेली आहे.माध्यमिक शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक गावासाठी ‘मदर स्कूल’ निश्चित कराव्यात. त्या शाळांच्या माध्यमातून इयत्ता आठवी पास सर्व विद्यार्थी इयत्ता नववीत दाखल होतील, याची खात्री करावी. १०० टक्के मुलांच्या प्रवेशाची शहानिशा करण्यासाठी ‘सरल’ संगणक प्रणालीचा वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या मूल्यांकनात राज्याला प्रथम तीन क्रमांकात आणण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागाने ठेवले आहे. भाषा, गणितावर भरकार्यक्रमाच्या सुरुवातीची दोन वर्षे फक्त भाषा व गणितातील क्षमता वाढविण्यासाठी देण्यात येणार आहे. नववीची १०० टक्के मुले दहावीत आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे शाळांकडून नववीत मुलांना मुद्दाम नापास करण्याला चाप बसणार आहे.विद्यार्थी व शिक्षकांच्या हजेरीसाठी प्रत्येक शाळेच्या पातळीवर बायोमेट्रिकची बोगस उपस्थिती नोंदवण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे.विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाची भीती दूर व्हावी म्हणून स्पोकन इंग्लिशवर भर देण्यात येणार आहे. त्यात श्रवण, लेखन व संभाषण कौशल्याचा समावेश असेल. माध्यमिकशाळाही लोकसहभागातूनडिजिटल व ई-लर्निंग करण्यावर भर असेल. (प्रतिनिधी)