शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

जननी सुरक्षेचे कवच अडीच लाख मातांना

By admin | Updated: August 10, 2014 23:27 IST

राज्यभरात माता मृत्यूचा दर घसरला

वाशिम: ग्रामीण व शहरी भागात सुरक्षित प्रसुतीला प्रोत्साहन देणे तसेच माता व अर्भक मृत्यूदर कमी करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या जननी सुरक्षा योजनेचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. २00९ ते मार्च २0१४ या पाच वर्षांमध्ये डॉक्टरांच्या निगराणीत १७.१२ लाख महिलांच्या प्रसुती झाल्या असून, मृत्यूचे प्रमाण १0४ वरून ८0 पर्यंत घसरले असल्याची साक्ष आरोग्य सेवा संचालनालयाची आकडेवारी देत आहे.आदिवासी, दुर्गम भागातील तसेच गोरगरीब महिलांची प्रसुती डॉक्टरांच्या निगराणीत किंवा दवाखान्यात होत नसल्याने माता व अर्भक मृत्यूदर कमी करणे, हे आरोग्य विभागासमोर आव्हानच ठरले होते. यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाने जननी सुरक्षा योजना सुरू केली. दारिद्रय़रेषेखालील तसेच अनुसूचित जाती व जमातीच्या कुटुंबातील १९ वर्षावरील मातांचा मृत्यूदर आणि अर्भक मृत्यूदर कमी करणे हा मुख्य उद्देश या योजनेमागे आहे. दवाखान्यात प्रसुती होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी लाभार्थी महिलेस अनुदानही दिले जाते. या योजनेंतर्गत संस्थेमधील प्रसुतीनंतर सात दिवसाच्या आत ग्रामीण भागातील लाभार्थीस ७00 रुपये आणि शहरी भागातील लाभार्थीस ६00 रुपये दिले जाते. कुशल दाईच्या मदतीने घरी प्रसूत होणार्‍या ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थीस ५00 रुपये दिले जातात. शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती झालेल्या लाभार्थीस १५00 रुपये दिले जातात. २00९-१0 या आर्थिक वर्षात राज्यभरातील तीन लाख ४८ हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यासाठी राज्य शासनाने २७ कोटी ४१ लाख रुपयांच्या खर्चाचा बोजा सहन केला. २0११-१२ मध्ये सर्वाधिक, अर्थात चार लाख पाच हजार महिलांची प्रसुती दवाखाना किंवा दाईच्या निगराणीत झाली असून, अनुदानापोटी राज्य शासनाने ३५ कोटी २८ लाख रुपये दिले आहेत. २0१३-१४ या आर्थिक वर्षात राज्यभरातील दोन लाख ४१ हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असून, त्यावर राज्य शासनाने २८ कोटी ६६ लाख रुपये खर्च केले आहेत. या योजनेचा चांगले परिणाम दिसून माता मृत्यूदर खाली आला आहे. राज्यात २00७-0८ मध्ये माता मृत्यूदर प्रत्येक हजार प्रसुतींमागे १0४ होते. २0११-१२ मध्ये ते ८७ पर्यंत घसरले. २0१२-१३ मध्ये हेच प्रमाण ८0 पर्यंत घसरले.