शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

जननी सुरक्षेचे कवच अडीच लाख मातांना

By admin | Updated: August 10, 2014 23:27 IST

राज्यभरात माता मृत्यूचा दर घसरला

वाशिम: ग्रामीण व शहरी भागात सुरक्षित प्रसुतीला प्रोत्साहन देणे तसेच माता व अर्भक मृत्यूदर कमी करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या जननी सुरक्षा योजनेचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. २00९ ते मार्च २0१४ या पाच वर्षांमध्ये डॉक्टरांच्या निगराणीत १७.१२ लाख महिलांच्या प्रसुती झाल्या असून, मृत्यूचे प्रमाण १0४ वरून ८0 पर्यंत घसरले असल्याची साक्ष आरोग्य सेवा संचालनालयाची आकडेवारी देत आहे.आदिवासी, दुर्गम भागातील तसेच गोरगरीब महिलांची प्रसुती डॉक्टरांच्या निगराणीत किंवा दवाखान्यात होत नसल्याने माता व अर्भक मृत्यूदर कमी करणे, हे आरोग्य विभागासमोर आव्हानच ठरले होते. यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाने जननी सुरक्षा योजना सुरू केली. दारिद्रय़रेषेखालील तसेच अनुसूचित जाती व जमातीच्या कुटुंबातील १९ वर्षावरील मातांचा मृत्यूदर आणि अर्भक मृत्यूदर कमी करणे हा मुख्य उद्देश या योजनेमागे आहे. दवाखान्यात प्रसुती होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी लाभार्थी महिलेस अनुदानही दिले जाते. या योजनेंतर्गत संस्थेमधील प्रसुतीनंतर सात दिवसाच्या आत ग्रामीण भागातील लाभार्थीस ७00 रुपये आणि शहरी भागातील लाभार्थीस ६00 रुपये दिले जाते. कुशल दाईच्या मदतीने घरी प्रसूत होणार्‍या ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थीस ५00 रुपये दिले जातात. शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती झालेल्या लाभार्थीस १५00 रुपये दिले जातात. २00९-१0 या आर्थिक वर्षात राज्यभरातील तीन लाख ४८ हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यासाठी राज्य शासनाने २७ कोटी ४१ लाख रुपयांच्या खर्चाचा बोजा सहन केला. २0११-१२ मध्ये सर्वाधिक, अर्थात चार लाख पाच हजार महिलांची प्रसुती दवाखाना किंवा दाईच्या निगराणीत झाली असून, अनुदानापोटी राज्य शासनाने ३५ कोटी २८ लाख रुपये दिले आहेत. २0१३-१४ या आर्थिक वर्षात राज्यभरातील दोन लाख ४१ हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असून, त्यावर राज्य शासनाने २८ कोटी ६६ लाख रुपये खर्च केले आहेत. या योजनेचा चांगले परिणाम दिसून माता मृत्यूदर खाली आला आहे. राज्यात २00७-0८ मध्ये माता मृत्यूदर प्रत्येक हजार प्रसुतींमागे १0४ होते. २0११-१२ मध्ये ते ८७ पर्यंत घसरले. २0१२-१३ मध्ये हेच प्रमाण ८0 पर्यंत घसरले.