शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुलांना जाळून आईने स्वत:लाही पेटवले, तिघांचाही मृत्यू; कल्याणच्या वाडेघरमधील घटना  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 05:25 IST

जन्मदात्या आईनेच दोन लहान मुलांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना जाळून ठार मारत नंतर स्वत:ही अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यात तिचाही मृत्यू झाला. ही घटना कल्याण पश्चिमेतील वाडेघर परिसरातील नाईक चाळीत शनिवारी घडली आहे.

कल्याण : जन्मदात्या आईनेच दोन लहान मुलांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना जाळून ठार मारत नंतर स्वत:ही अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यात तिचाही मृत्यू झाला. ही घटना कल्याण पश्चिमेतील वाडेघर परिसरातील नाईक चाळीत शनिवारी घडली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.अनिता कनोजिया (२९) असे आईचे तर नंदिनी (२) आणि दुर्गेश (९ महिने) अशी मुलांची नावे आहेत. अनिताचे पती अजयकुमार लॉण्ड्रीत कामाला आहेत. शनिवारी सकाळी ते कामावर गेले. त्यानंतर दुपारी घरी जेवून ते पुन्हा कामाला गेले. सायंकाळी त्यांच्या शेजारणीने त्यांच्या घराचे दार ठोठावले. तेव्हा दाराला आतून कडी होती. अनिता आतून कोणताही प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे शेजारणीला संशय आला. तिने अजयकुमार यांना फोनद्वारे हा प्रकार सांगताच ते तातडीने घरी आले. दार उघडण्याचा त्यांनीही प्रयत्न केला. खोलीच्या मागील खिडकीतून त्यांनी पाहिले असताना अनिता व दोन मुले जळलेल्या अवस्थेत दिसली. पोलिसांना पाचारण केल्यानंतर त्यांनी दार उघडून तिन्ही मृतदेहांचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवले आहेत.मुलांवर रॉकेल ओतून त्यांना जाळल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी मृत अनिताविरोधात गुन्हा नोंदवला आहे. अजयकुमार हा आर्थिक विवंचनेत होता. त्यामुळे तिने मुलांना जाळून स्वत:ही आत्महत्या केली असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.आत्महत्येमागील कारण शोधण्याची पतीची मागणीमृत अनिताचा पती अजयकुमार याने सांगितले की, त्याला कोणत्याही प्रकारची आर्थिक विवंचना नव्हती. तसेच त्यांचा संसार सुखी होता. पत्नी व मुलेही त्यांच्या कामाविषयी समाधानी होते. त्यामुळे पत्नीने मुलांना का जाळले, तसेच तिने का आत्महत्या केली, या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करून खऱ्या कारणांचा शोध घ्यावा, अशी मागणी अजयकुमार यांनी केली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrimeगुन्हाMurderखून