शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मुलांना जाळून आईने स्वत:लाही पेटवले, तिघांचाही मृत्यू; कल्याणच्या वाडेघरमधील घटना  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 05:25 IST

जन्मदात्या आईनेच दोन लहान मुलांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना जाळून ठार मारत नंतर स्वत:ही अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यात तिचाही मृत्यू झाला. ही घटना कल्याण पश्चिमेतील वाडेघर परिसरातील नाईक चाळीत शनिवारी घडली आहे.

कल्याण : जन्मदात्या आईनेच दोन लहान मुलांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना जाळून ठार मारत नंतर स्वत:ही अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यात तिचाही मृत्यू झाला. ही घटना कल्याण पश्चिमेतील वाडेघर परिसरातील नाईक चाळीत शनिवारी घडली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.अनिता कनोजिया (२९) असे आईचे तर नंदिनी (२) आणि दुर्गेश (९ महिने) अशी मुलांची नावे आहेत. अनिताचे पती अजयकुमार लॉण्ड्रीत कामाला आहेत. शनिवारी सकाळी ते कामावर गेले. त्यानंतर दुपारी घरी जेवून ते पुन्हा कामाला गेले. सायंकाळी त्यांच्या शेजारणीने त्यांच्या घराचे दार ठोठावले. तेव्हा दाराला आतून कडी होती. अनिता आतून कोणताही प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे शेजारणीला संशय आला. तिने अजयकुमार यांना फोनद्वारे हा प्रकार सांगताच ते तातडीने घरी आले. दार उघडण्याचा त्यांनीही प्रयत्न केला. खोलीच्या मागील खिडकीतून त्यांनी पाहिले असताना अनिता व दोन मुले जळलेल्या अवस्थेत दिसली. पोलिसांना पाचारण केल्यानंतर त्यांनी दार उघडून तिन्ही मृतदेहांचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवले आहेत.मुलांवर रॉकेल ओतून त्यांना जाळल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी मृत अनिताविरोधात गुन्हा नोंदवला आहे. अजयकुमार हा आर्थिक विवंचनेत होता. त्यामुळे तिने मुलांना जाळून स्वत:ही आत्महत्या केली असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.आत्महत्येमागील कारण शोधण्याची पतीची मागणीमृत अनिताचा पती अजयकुमार याने सांगितले की, त्याला कोणत्याही प्रकारची आर्थिक विवंचना नव्हती. तसेच त्यांचा संसार सुखी होता. पत्नी व मुलेही त्यांच्या कामाविषयी समाधानी होते. त्यामुळे पत्नीने मुलांना का जाळले, तसेच तिने का आत्महत्या केली, या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करून खऱ्या कारणांचा शोध घ्यावा, अशी मागणी अजयकुमार यांनी केली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrimeगुन्हाMurderखून