शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

राज्यात पोलीस आत्महत्या सर्वाधिक

By admin | Updated: May 4, 2015 02:26 IST

वाकोला पोलीस ठाण्याच्या साहाय्यक फौजदाराने आत्महत्या करण्यापूर्वी वरिष्ठ निरीक्षक आणि अन्य एका सहकाऱ्यावर केलेल्या गोळीबाराने पोलिसांवरील कामाचा ताण

डिप्पी वांकाणी, मुंबई वाकोला पोलीस ठाण्याच्या साहाय्यक फौजदाराने आत्महत्या करण्यापूर्वी वरिष्ठ निरीक्षक आणि अन्य एका सहकाऱ्यावर केलेल्या गोळीबाराने पोलिसांवरील कामाचा ताण आणि वरिष्ठांकडून होणाऱ्या अपमानास्पद वागणुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुख्य म्हणजे राष्ट्रीय गुन्हा नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार २०१३मध्ये महाराष्ट्रात झालेल्या पोलिसांच्या आत्महत्या देशात सर्वाधिक होत्या, हे दाहक वास्तवही यानिमित्ताने चर्चेत येणार आहे. कामाचा वाढता ताण, साप्ताहिक सुट्या आणि रजा रद्द करणे तसेच वरिष्ठांच्या जाचामुळे राज्यातील पोलिसांत नैराश्य वाढले आहे, असे वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. सर्वाधिक रजा कोणाच्या रद्द होत असतील तर त्या कॉन्सटेबलच्या. साहाय्यक उपनिरीक्षक पोलिसांकडील कामे निश्चित करतात. तसेच त्याच्याकडे मोबाईल व्हॅनचीही जबाबदारी असते. कामाच्या वाढत्या ताणामुळे साप्ताहिक सुट्ट्याही रद्द केल्या जातात. अनेकदा ३-४ महिने सुटी न घेता सलग काम करावे लागते,असे एका पोलिस कॉन्स्टेबलने सांगितले. वरिष्ठांकडून मिळणारी वागणूक अत्यंत उद्धट आणि अपमानास्पद असते. पोलिसांवर खेसकून त्यांच्याकडून कामे करून घेण्यात वरिष्ठांना स्वारस्य असते. त्यामुळेच वरिष्ठांबद्दल चीड निर्माण होत जाते. तणाव दूर करुन मानसिक संतुलन राखण्यासाठी योगाभ्यासोबत तणावमुक्तीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जायचे. परंतु, या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याऐवजी एक दिवसाची सुटी देण्याचा पोलिस आग्रह करतात. अधुनमधून प्रोत्साहन मिळावे म्हणून हिंदी चित्रपट दाखविले जायचे. परंतु, हे सर्व कार्यक्रम निष्फळ ठरल्याने हे सर्व थांबविण्यात आले, असे एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले.