शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

मानवी हक्कांचे सर्वाधिक उल्लंघन पोलिस खात्यात; वर्षभरात दीड हजार तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 08:55 IST

आयोगाचा राज्याला अहवाल

अविनाश साबापुरेयवतमाळ : सततच्या जनजागृतीमुळे मानवी हक्कांबाबत आता प्रत्येकजण संवेदनशील झाला आहे. त्यातूनच मानवी हक्क आयोगाकडे तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडत आहे. केवळ एका वर्षात तब्बल ३ हजार ७६३ तक्रारी दाखल झाल्याचा अहवाल आयोगाने राज्य सरकारला सादर केला आहे. त्यातील दीड हजारांवर तक्रारी एकट्या पोलिस खात्याविरुद्ध आहेत, हे विशेष.

राज्य मानवी हक्क आयोगाने २०२०-२१ या वर्षातील कामांचा अहवाल नुकताच राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात दिला आहे. त्यानुसार जानेवारी ते डिसेंबर २०२० या एका वर्षभरात आलेल्या तक्रारींपैकी सर्वाधिक १५५८ तक्रारी या पोलिसांबद्दल आहेत. विविध तुरुंगातील कैद्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याच्याही ३३२ तक्रारी आयोगाकडे आल्या. गंभीर म्हणजे या तक्रारींपैकी आयोगाला केवळ १ हजार ८३ तक्रारींचाच वर्षभरात निपटारा करता आलेला आहे. यामागे मानवी हक्क आयोगाला शासनाकडून मिळणारे अल्प अनुदान आणि पायाभूत सुविधांची मर्यादा कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. आयोगाचे अध्यक्ष एम. ए. सईद आणि सचिव तुकाराम मुंढे यांनी अहवालाच्या प्रास्ताविकातच ही अडचण नमूद केली आहे.

२० हजार खटले प्रलंबितराज्य मानवी हक्क आयोगाने एका वर्षात केवळ १ हजार ८३ खटले निकाली काढले. मात्र, अद्यापही आयोगापुढे तब्बल २० हजार ७३७ खटले प्रलंबित आहेत. २०१९ या वर्षातील १८ हजार ५७ खटले आधीच प्रलंबित असताना २०२० या वर्षात आणखी ३ हजार ७६३ तक्रारी आयोगाकडे दाखल झाल्या. एकंदर २१ हजार ८२० तक्रारींपैकी केवळ हजार तक्रारीच २०२० मध्ये निकाली निघू शकल्या.