शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

राज्यातील शंभरपेक्षा अधिक सूतगिरण्यांना आर्थिक घरघर

By राजाराम लोंढे | Updated: August 6, 2022 08:50 IST

कापूस मिळेना, चक्र फिरेना : उत्पादन कमी असताना निर्यात आली मुळावर

- राजाराम लोंढे लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यातील कापसाचे घटलेले उत्पादन, केंद्र सरकारचे चुकीचे आयात-निर्यात धोरणामुळे निर्माण झालेली टंचाई, कापसाला आलेला सोन्याचा भाव आणि महागडा कापूस वापरून तयार केलेल्या सूताला कोणी विचारत नसल्याने राज्यातील शंभरहून अधिक सूतगिरण्याच अरिष्टात सापडलेल्या आहेत. अनेकांचे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून उत्पादन बंद आहे, तर काहींनी ३० टक्के क्षमतेनेच उत्पादन सुरू केले आहे. त्यामुळे हजारो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

देशाच्या औद्योगिक उत्पन्नापैकी १३ टक्के हिस्सा वस्त्रोद्योगाचा आहे. राज्याच्या उत्पन्नातही वस्त्रोद्योगाचा खूप मोठा वाटा आहे. सूतगिरण्यांच्या माध्यमातून हजारो कुटुंबे उभी राहिली आहेत. राज्यात ‘इचलकरंजी’, ‘भिवंडी’, ‘मालेगाव’ आदी शहरांत सूतगिरण्या तुलनेत अधिक आहेत. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना आर्थिक ग्रहण लागले. टंचाईमुळे कापसाच्या दरात भरमसाठ वाढ होत गेली. साधारणता ६८ हजार रुपये खंडी (३५५.६२ किलो) दर होता, मात्र गेल्या दोन-तीन महिन्यांत तो १ लाख १५ हजारांपर्यंत पोहोचला होता. एकतर कापूस मिळेना, जादा दराने खरेदी केला तर सूताला अपेक्षित भाव मिळेना, अशा कात्रीत सूतगिरण्यांचे व्यवस्थापन अडकले आहे. मिल बंद असल्या तरी वीजबिल व कामगार पगाराचा महिन्याला लाखो रुपयांचा भुर्दंड बसत आहे.

देशातील कापसाचे उत्पादन आणि मागणी याचा ठोकताळा घालून आयात-निर्यातीचे धोरण अवलंबवा लागते, मात्र केंद्र सरकारने डिसेंबर २०२१ पासूनच कापसाची निर्यात सुरू ठेवली. हीच निर्यात वस्त्रोद्याेगाच्या मुळावर आली आहे. त्यात ज्यांच्यावर कापूस खरेदीची जबाबदारी असते, त्या कॉटन कॉर्पेारेशन इंडिया कंपनीने यंदा खरेदीकडे काहीसा कानाडोळा केल्याचा फटकाही बसला आहे. दिवाळीला नवीन कापसाचे उत्पादन होणार असले तरी गेल्या वर्षीप्रमाणे परतीच्या पावसाने झोडपले तर अडचणीत अधिक भर पडणार हे निश्चित आहे.

देशातील निम्या गिरण्या तामिळनाडूतदेशात १४१३ सूतगिरण्या असून, त्यापैकी जवळपास १७१ बंद आहेत. सर्वाधिक म्हणजे ७७० गिरण्या एकट्या तामिळनाडूमध्ये आहेत. त्यापाठोपाठ १४५ आंध्र प्रदेश व तेलंगणात आहेत.किलोमागे ५० रुपयांचा तोटासाधारणत: १०० किलो कापसामधून २५ ते ३० किलो घाण जाते. त्यामुळे जरी २४७ रुपये किलोने खरेदी केला तरी तो ३२० रुपयांपर्यंत दर जातो. त्यापासून तयार केलेल्या सूताचा उत्पादन खर्च ४९० रुपये किलोपर्यंत जातो. मात्र प्रत्यक्षात सूताला मिळणारा भाव बघितला तर किलोमागे ५० रुपये तोटा होत आहे.आगाऊ पेमेंटशिवाय कापूस मिळेनासगळीकडेच कापूस टंचाई असल्याने व्यापाऱ्यांनीही ताठर भूमिका घेतली आहे. आगाऊ पेमेंट घेऊनच कापसाची गाडी सोडले जाते. साधारणता कापसाची एक गाडी खरेदी करायची म्हटली तर ४५ लाख रुपये लागत असल्याने सूतगिरण्यांचे व्यवस्थापन पुरते हतबल झाले आहे.

कापूस दरवाढीमुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. कामगारांना निम्मे पगार देऊन मिल बंद ठेवाव्या लागत आहेत. केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने नाही पाहिले तर हा उद्योग संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही.- युवराज घाटगे, कार्यकारी संचालक, महेश को-ऑप. स्पिनिंग मिल, तारदाळ

वस्त्रोद्योग महामंडळाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून लवकरच केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. गेल्या सात-आठ महिन्यांत केलेल्या कापूस खरेदीवर १० टक्के नुकसानभरपाईची मागणी करणार आहोत.- अशोक स्वामी, माजी अध्यक्ष, वस्त्रोद्योग महामंडळ