शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

राज्यात एक लाखाहून अधिक सिझेरियन प्रसूती; तीन महिन्यांतील आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 07:45 IST

नैसर्गिक कारणांसह न्यायवैद्यकीय खटल्यांच्या भीतीनेही घेतला जातो निर्णय

- स्नेहा मोरे मुंबई : मागील काही वर्षांत राज्यात ‘^सिझेरियन’ (सी-सेक्शन) प्रसूतींच्या संख्येत वाढ झालेली बघायला मिळत असून यंदा एप्रिल ते जून या काळात एकूण प्रसूतींपैकी २२.६ टक्के प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आल्या आहेत. लग्नाचे सर्वसाधारण वय वाढल्यामुळे जोडप्यांनी बाळासाठी उशिरा प्रयत्न सुरू करणे, तसेच जीवनशैलीतील बदलांच्या विपरीत परिणामांमुळे प्रसूतीत अडचणी संभवणे ही याची प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. परंतु याबरोबरच न्यायवैद्यकीय खटल्यांच्या भीतीनेही प्रसूतीबाबत कोणताही धोका न पत्करण्याकडे डॉक्टरांचा कल असल्याचे निरीक्षणही वैद्यकीय तज्ज्ञांकडून नोंदवले जात आहे.केंद्रीय आरोग्य विभागाच्या अहवालानुसार २०१८-१९ मध्ये सिझेरियन प्रसूतींचे प्रमाण एकूण ९४ हजार ८६३ इतके होते. मात्र एप्रिल ते जून या कालावधीत राज्यात सरकारी रुग्णालयांमध्ये ४२ हजार ८९४ तर खासगी रुग्णालयांमध्ये ५७ हजार ५६७ इतक्या सिझेरियन प्रसूती झाल्या आहेत. तीन महिन्यांत राज्यात अशा प्रकारे १ लाख ४६१ प्रसूती झाल्या. राज्यात पुण्यात सर्वाधिक १२ हजार ४३ सिझेरियन प्रसूती झाल्या आहेत. त्यात सरकारी रुग्णालयात ४४६७ आणि खासगी रुग्णालयांत ७५७६ प्रसूती झाल्या. त्याखालोखाल मुंबईत १०,९१४ सिझेरियन प्रसूती करण्यात आल्या. यात सरकारी रुग्णालयांत ४९२९ तर खासगी रुग्णालयांमध्ये ५९८५ असे प्रमाण आहे.दहा वर्षांपूर्वी सिझेरियन प्रसूतींचे प्रमाण सर्वसाधारणपणे २० टक्के होते, ते आता ३५ टक्के झाल्याचे ज्येष्ठ स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ डॉ. प्रशांत सरेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, अधिक वयातील प्रसूतींचे प्रमाण आता वाढले आहे. वंध्यत्वावर उपचार घेणाऱ्यांमध्येही वाढ होत असून त्यांच्या बाबतीत प्रसूतीबद्दल अधिक धोका पत्करला जात नाही. जोडप्यांना हल्ली सहसा एक किंवा दोनच मुले असल्यामुळे त्या बाळांच्या वेळी धोका नको असा जोडप्यांचाही कल असतो. पूर्वी गरोदरपणात मधुमेहासारखे आजार असण्याचे प्रमाण कमी दिसायचे. आता तेही वाढले असून अशा महिलांच्या बाबतीतही प्रसूतीत धोका पत्करला जात नाही. याशिवाय न्यायवैद्यकीय खटला संभवण्याच्या दबावामुळेही काही वेळा डॉक्टरांकडून सिझेरियन प्रसूती करण्याकडे कल राहतो.ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शहनाज तारवाला यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, विविध वैद्यकीय तपासण्या उपलब्ध झाल्यामुळे बाळ नैसर्गिक प्रसूतीचा ताण सहन करू शकेल का, अशा गोष्टींची कल्पना आधी येऊ शकते. प्रसूती सिझेरियन करण्यामागे काही कारणे बाळासाठीची तर काही आईसाठीची असतात. शिवाय बाळाच्या आरोग्यास धोका असल्याचे तपासण्यांवरून लक्षात आल्यास धोका पत्करला जात नाही. अशा वेळी न्यायवैद्यकीय खटल्यांच्या भीतीनेही डॉक्टरांकडून सिझेरियनचा निर्णय घेतला जाऊ शकतो.घरगुती प्रसूतींचे प्रमाण कमीराज्यात २०१८-१९ या वर्षात एप्रिलते जून या कालावधीत ३,५३०घरगुती प्रसूती झाल्या होत्या.यंदा मात्र मागील तीन महिन्यांत राज्यात २,७७३ घरगुती प्रसूती झाल्या. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक घरगुती प्रसूती झाल्या असून त्यांची संख्या यंदा १,१९१ असून गेल्या वर्षी ती १३४१ इतकी होती.‘आॅन डिमांड’ प्रसूतीकाही दाम्पत्य मुहूर्त पाहून, तसेच आपल्या सोयीनेही प्रसूतीचा निर्णय घेताना दिसतात. परदेशात ‘आॅन डिमांड’ प्रसूतीचे प्रमाण ५ टक्के, तर आपल्याकडे ते १ ते २ टक्के असल्याचे डॉ. तारवाला यांनी सांगितले.

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसी