शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

९वी ते १२वीच्या निम्म्याहून अधिक शाळा झाल्या सुरू; १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 06:52 IST

मुंबई, ठाणे, नाशिक हे जिल्हे सोडून इतर सर्व जिल्ह्यांत शाळा सुरू झाल्या असून जळगाव जिल्ह्यात शाळा सुरू होण्याची टक्केवारी १०० टक्के इतकी आहे

मुंबई :  राज्यातील ९वी ते १२वीच्या ७० टक्के शाळा सुरू झाल्या असून सोमवारी रात्री प्राप्त झालेल्या माहितीनुसार या शाळांमध्ये तब्बल १ लाख ७२ हजार ४९० विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शविली आहे. आतापर्यंत राज्यात ९वी ते १२वीचे वर्ग असलेल्या १६ हजार ४२० शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.राज्यात मुंबई, ठाणे, नाशिक हे जिल्हे सोडून इतर सर्व जिल्ह्यांत शाळा सुरू झाल्या असून जळगाव जिल्ह्यात शाळा सुरू होण्याची टक्केवारी १०० टक्के इतकी आहे. गडचिरोली, उस्मानाबाद, सोलापूर, वाशीम लातूर, भंडारा, सांगली, कोल्हापूर, नांदेड जिल्ह्यातही ९० टक्क्यांहून अधिक शाळा सुरू झाल्या आहेत. जळगाव, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत विद्यार्थी उपस्थिती ही ५० टक्क्यांहून अधिक आहे. इतर ठिकाणी शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थी उपस्थिती अजूनही तुरळक असल्याचे दिसून येत आहे. २३ नोव्हेंबरनंतर राज्यात आतापर्यंत शाळा सुरू होण्याचे प्रमाण जवळपास दुपटीने वाढले आहे.शैक्षणिक वर्षाच्या मूल्यमापनावर प्रश्नचिन्ह शैक्षणिक वर्ष संपायला अवघे काही महिने उरले असताना शिक्षण विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे मूल्यमापन कसे करणार? काय? योजना आणि आराखडा असणार? यासंबंधी शाळांना कधी सूचना देणार, या प्रश्नांची उत्तरे अद्याप दिलेली नाहीत. बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्यास सुरुवात आजपासून होत असली तरी दहावीच्या विद्यार्थ्यांचे काय? नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मूल्यमापन या संबंधित अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यांची उत्तरे अद्याप न मिळाल्याने शाळा संस्थाचालकांसह, प्रशासन, शिक्षक, पालक हे सारेच विभागाकडून स्पष्ट सूचना व निर्देशांची वाट पाहत आहेत.