शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

९वी ते १२वीच्या निम्म्याहून अधिक शाळा झाल्या सुरू; १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 06:52 IST

मुंबई, ठाणे, नाशिक हे जिल्हे सोडून इतर सर्व जिल्ह्यांत शाळा सुरू झाल्या असून जळगाव जिल्ह्यात शाळा सुरू होण्याची टक्केवारी १०० टक्के इतकी आहे

मुंबई :  राज्यातील ९वी ते १२वीच्या ७० टक्के शाळा सुरू झाल्या असून सोमवारी रात्री प्राप्त झालेल्या माहितीनुसार या शाळांमध्ये तब्बल १ लाख ७२ हजार ४९० विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शविली आहे. आतापर्यंत राज्यात ९वी ते १२वीचे वर्ग असलेल्या १६ हजार ४२० शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.राज्यात मुंबई, ठाणे, नाशिक हे जिल्हे सोडून इतर सर्व जिल्ह्यांत शाळा सुरू झाल्या असून जळगाव जिल्ह्यात शाळा सुरू होण्याची टक्केवारी १०० टक्के इतकी आहे. गडचिरोली, उस्मानाबाद, सोलापूर, वाशीम लातूर, भंडारा, सांगली, कोल्हापूर, नांदेड जिल्ह्यातही ९० टक्क्यांहून अधिक शाळा सुरू झाल्या आहेत. जळगाव, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत विद्यार्थी उपस्थिती ही ५० टक्क्यांहून अधिक आहे. इतर ठिकाणी शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थी उपस्थिती अजूनही तुरळक असल्याचे दिसून येत आहे. २३ नोव्हेंबरनंतर राज्यात आतापर्यंत शाळा सुरू होण्याचे प्रमाण जवळपास दुपटीने वाढले आहे.शैक्षणिक वर्षाच्या मूल्यमापनावर प्रश्नचिन्ह शैक्षणिक वर्ष संपायला अवघे काही महिने उरले असताना शिक्षण विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे मूल्यमापन कसे करणार? काय? योजना आणि आराखडा असणार? यासंबंधी शाळांना कधी सूचना देणार, या प्रश्नांची उत्तरे अद्याप दिलेली नाहीत. बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्यास सुरुवात आजपासून होत असली तरी दहावीच्या विद्यार्थ्यांचे काय? नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मूल्यमापन या संबंधित अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यांची उत्तरे अद्याप न मिळाल्याने शाळा संस्थाचालकांसह, प्रशासन, शिक्षक, पालक हे सारेच विभागाकडून स्पष्ट सूचना व निर्देशांची वाट पाहत आहेत.