शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी वीरेंद्रसिंह तावडेविरोधात आणखी पुरावे, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 10:50 IST

नवीन पुरावे हाती लागल्याने हे प्रकरण उच्च न्यायालयात जायचे की पुन्हा सत्र न्यायालयात जायचे, याबाबत सूचना घेण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत द्या, अशी विनंती शिंदे यांनी खंडपीठाला केली. आरोपीचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर  यांनी सरकारच्या विनंतीवर आक्षेप घेतला. ही याचिका नाहक प्रलंबित ठेवली आहे.

मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याविरोधात नवीन पुरावे सापडल्याचा दावा राज्य सरकारनेउच्च न्यायालयात गुरुवारी केला. आरोपीविरोधात नवीन पुरावे सापडले असून, पुढील कायदेशीर कारवाई ठरविण्यासाठी विधी व न्याय विभागाकडून सूचना घेणे आवश्यक आहे, असे सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी न्या. अजय गडकरी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाला सांगितले.नवीन पुरावे हाती लागल्याने हे प्रकरण उच्च न्यायालयात जायचे की पुन्हा सत्र न्यायालयात जायचे, याबाबत सूचना घेण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत द्या, अशी विनंती शिंदे यांनी खंडपीठाला केली. आरोपीचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर  यांनी सरकारच्या विनंतीवर आक्षेप घेतला. ही याचिका नाहक प्रलंबित ठेवली आहे. सरकारची याचिका फेटाळण्यास योग्य आहे. कोणतेही नवीन पुरावे सापडलेले नाहीत. त्यांना जर नवीन पुरावे सापडले असतील तर त्यांनी ही याचिका मागे घ्यावी, असा युक्तिवाद इचलकरंजीकर यांनी केला.न्यायालयाने सरकारी वकिलांना तीन आठवड्यांची मुदत देत याचिकेवरील सुनावणी तहकूब केली. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूर येथे पानसरे यांच्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्या. २० फेब्रुवारी रोजी त्यांचा मुंबईतील रुग्णालयात मृत्यू झाला. गेल्याच महिन्यात कोल्हापूर न्यायालयाने तावडेसह दहाजणांवर आरोप निश्चित केले. सत्र न्यायालयाने तावडे याची जामिनावर सुटका केली. मात्र, या सुटकेचा राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेHigh Courtउच्च न्यायालयState Governmentराज्य सरकार