शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी वीरेंद्रसिंह तावडेविरोधात आणखी पुरावे, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 10:50 IST

नवीन पुरावे हाती लागल्याने हे प्रकरण उच्च न्यायालयात जायचे की पुन्हा सत्र न्यायालयात जायचे, याबाबत सूचना घेण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत द्या, अशी विनंती शिंदे यांनी खंडपीठाला केली. आरोपीचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर  यांनी सरकारच्या विनंतीवर आक्षेप घेतला. ही याचिका नाहक प्रलंबित ठेवली आहे.

मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याविरोधात नवीन पुरावे सापडल्याचा दावा राज्य सरकारनेउच्च न्यायालयात गुरुवारी केला. आरोपीविरोधात नवीन पुरावे सापडले असून, पुढील कायदेशीर कारवाई ठरविण्यासाठी विधी व न्याय विभागाकडून सूचना घेणे आवश्यक आहे, असे सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी न्या. अजय गडकरी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाला सांगितले.नवीन पुरावे हाती लागल्याने हे प्रकरण उच्च न्यायालयात जायचे की पुन्हा सत्र न्यायालयात जायचे, याबाबत सूचना घेण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत द्या, अशी विनंती शिंदे यांनी खंडपीठाला केली. आरोपीचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर  यांनी सरकारच्या विनंतीवर आक्षेप घेतला. ही याचिका नाहक प्रलंबित ठेवली आहे. सरकारची याचिका फेटाळण्यास योग्य आहे. कोणतेही नवीन पुरावे सापडलेले नाहीत. त्यांना जर नवीन पुरावे सापडले असतील तर त्यांनी ही याचिका मागे घ्यावी, असा युक्तिवाद इचलकरंजीकर यांनी केला.न्यायालयाने सरकारी वकिलांना तीन आठवड्यांची मुदत देत याचिकेवरील सुनावणी तहकूब केली. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूर येथे पानसरे यांच्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्या. २० फेब्रुवारी रोजी त्यांचा मुंबईतील रुग्णालयात मृत्यू झाला. गेल्याच महिन्यात कोल्हापूर न्यायालयाने तावडेसह दहाजणांवर आरोप निश्चित केले. सत्र न्यायालयाने तावडे याची जामिनावर सुटका केली. मात्र, या सुटकेचा राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेHigh Courtउच्च न्यायालयState Governmentराज्य सरकार